शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

सलीम, योगेंद्र आणि समाजवादी यादवी

सलीम, योगेंद्र आणि समाजवादी यादवी
योगेंद्र यादव यांची एक मुलाखत पाहून अनेक प्रतिक्रिया ते मुसलमान आहेत व आपली ओळख लपवून हिंदू म्हणून भासवतात; मुळात ते मुस्लीमच आहेत अशा अर्थाच्या आल्या. कुठल्याही गोष्टीवर व्यक्त होताना त्याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. 

योगेंद्र यादव यांचे आजोबा रामसिंग हे वॉर्डन होते. १९३८साली मुसलमानांती त्यांचा गळा चिरला. त्यावेळेस त्यांचे वडील देवेंद्र यादव आठ वर्षांचे होते. पुढे ते इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक झाले. त्यांची विचारसरणी समाजवादी असल्याने त्यांनी आपल्या मुलांची नावे इस्लामी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या मुलाचे नाव सलीम ठेवले. शाळेत असताना हिंदू असूनही नाव सलीम कसे, यावरून सोबतचे विद्यार्थी विचारू लागले म्हणून त्यांनी आपले नाव बदलून योगेंद्र ठेवले. योगेंद्र यादव हे हिंदूच आहेत, मुसलमान नाहीत. 

आता खरा विचार करण्यासारखा मुद्दा; हे समाजवादी ‘संतुलन’, ‘सामाजिक’ सलोखा राखण्यासाठी म्हणून चुकीच्या व खोट्या गोष्टींचा आधार का घेतात?

मुसलमानांनी आपल्या वडिलांचा गळा चिरला म्हणून त्यांच्याविषयी आकस निर्माण होऊ नये म्हणून संतुलन राखण्यासाठी आपल्या मुलांची नावे इस्लामी ठेवणे, हा उपाय होऊ शकतो का? कुठल्याही समाजवाद्याने आपल्या मुलांची नावे इस्लामी ठेवली म्हणून मुसलमान गळे कापायचे थांबले नाहीत, थांबणार नाहीत. 

असेच दुसरे उदाहरण शरद पवारांचे. ते मुख्यमंत्री असताना मुंबईत झालेले सर्व बॉम्बस्फोट हिंदू जास्त प्रमाणात राहत असलेल्या वस्त्यांमध्ये झाले. शरद पवारांनी धावत पळत जाऊन न झालेला बॉम्बस्फोट मुस्लीमबहुल वस्तीत झाला म्हणून सांगितले आणि बॉम्बस्फोट करणारे मुस्लीम नाहीत हे सांगण्यासाठी ते लंकेचे असल्याचा निर्देश केला. बॉम्बस्फोट व्हायचे थांबले? दिल्लीतले उदाहरण ताजे आहे. 

समस्या इस्लाममध्येच आहे, हे जाणीवपूर्वक लपवून समाजवादी कुठला समाज घडवतात किंवा ‘सामाजिक सलोखा’ राखतात? उलट, योगेंद्र यादवांसारखे विचारवंत व शरद पवारांसारखे राजकारणी इस्लामी दहशतवादालाच पोसतात. ‘सामाजिक सलोखा’ राखण्यासाठी खोट्याचा आधार घ्यावा लागतो, हाच समाजवादाचा पराभव आहे. 

हेच समाजवादी, साम्यवादी, पुरोगामी विचारवंत इस्लामचे रक्षणकर्ते आहेत. खुद्द इस्लामी आक्रमकांना जेवढे भारताचे नुकसान करणे शक्य झाले नाही, तेवढे नुकसान हे लोक करत आहेत. या विचारवंतांनी ‘बहुसंख्य’ व ‘बहुजन’ अशी शोषक-शोषित विभागणी याचे उत्तम उदाहरण आहे. स्वत: राज्यकर्ते असताना भूमी उपलब्ध असूनही, मुसलमानांनी व ख्रिश्‍चनांनी देवळे का पाडली? असा प्रश्‍न ते कधीच विचारत नाहीत. विचारणारही नाहीत. हिंदूंना कट्टर, धृवीकरणी, अतिउजवे, घातक राष्ट्रवादी, फासिस्ट ठरवण्यातच यांची बुद्धी आणि बळ खर्ची पडते. इस्लामी दहशतवादाची व ख्रिस्ती विस्तारवादाची ढाल बनत आहोत हे त्यांच्या लक्षांत येत नाही. इतिहास पाहिला तर इस्लामी सत्तारूढ होतात, तेव्हा यांचेच गळे पहिल्यांदा कापले जातात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा