गुरुवार, १८ जून, २०२६

हिंदू बहुत ही डरपोक कौम है!

ज्या विचारसरणीने इतिहासात हिंदूंच्या स्वसंरक्षणाच्या व प्रतिकाराच्या अधिकाराला नाकारले आणि त्यांना विनाकारण बळी पडू दिले, तीच विचारसरणी आज आधुनिक काळात हिंदू सण, परंपरा किंवा त्यांच्या स्वसंरक्षण करण्याच्या कायदेशीर अधिकारांना 'उग्र आणि हिंसक' ठरवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहे. स्वत:ला "पॉलिटकली करेक्ट"  ठेवणारा हिंदू याला साधा वैचारिक प्रतिकारही करण्याच्या स्थितीत उरला नाही. त्यामुळे, ही वाळवी केवळ हिंदू समाजच नव्हे तर संस्कृतीही पोखरल्याशिवाय थांबणार नाही!

'सत्य हिंदी' या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 'बात बोलेगी' या कार्यक्रमात "हिंदू पहले से हिंसक थे या अब हो गए?"   या मथळ्याखाली एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. ज्येष्ठ पत्रकार मुकेश कुमार सिंग यांनी 

प्रख्यात विचारवंत, लेखक, सामाजिक विश्लेषक आणि दिल्ली विद्यापीठातील हिंदीचे प्राध्यापक अपूर्वानंद झा यांची मुलाखत घेतली आहे.  यात अपूर्वानंद झा म्हणाले, 

“हिंदूंना इतके कट्टर झाले आहेत,  की हिंदूंच्या प्रत्येक घरातील हिंदू हा संभाव्य खुनी किंवा संभाव्य बलात्कारी आहे. प्रत्येक हिंदू प्रत्यक्षात किंवा स्वप्नांत एखाद्या मुस्लिम स्त्रीवर बलात्कार करत असतो. आणि याला उचित मानले जाते. ”

मुकेश कुमार सिंग व अपूर्वानंद झा हे दोघेही डाव्या विचारांचे उदारमतवादी (हाही एक विनोदच आहे) आहेत. प्रतिकार करणारा हिंदू यांना कधीच नको. इतिहासातही जिथे जिथे प्रतिकार केला तिथे तिथे सुरुवात कुणी केली व प्रतिकार केलाच नसता तर काय झाले असते, हे कधी सांगितलेच जात नाही.  प्रतिकार केला नाही, तर "हिंदूंचा नरसंहार" असा शब्द वापरत नाहीत व केलाच "जातीय दंगली" असा शब्द वापरला जातो. 

नौखालीचा व काश्मीरचा हिंदू नरसंहार झाला कारण हिंदूंनी प्रतिकारच केला नाही! परिणामी नरसंहार व जीव वाचवण्यासाठी पलायन झाले. नौखालीत तर नोव्हेंबर १९४६ ते मार्च १९४७ या काळात गांधीजी उपस्थित असताना  हिंदूंचा नरसंहार झाला आहे. तो एकतर्फी असल्याने त्याला "जातीय दंगली" म्हणता येत नव्हते म्हणून इतिहासाच्या पुस्तकातून दाबून टाकण्यात आले. पाठ्यपुस्तकातही आले नाही व कधी शिकवलेच नाही. तिथे त्यावेळेस मुस्लीम जमावाने केलेल्या बलात्कारातून गरोदर राहिलेल्या महिलांना अहिंसक मार्गाने प्रतिकार करण्याचा सल्ला देताना गांधीजी म्हणाले,  

"जर एखाद्या महिलेवर बलात्काराचा प्रसंग आला आणि ती स्वतःचा बचाव करू शकत नसेल, तर तिने दात आणि ओठ घट्ट दाबून मृत्यू पत्करावा" 

असा सल्ला देणारे गांधी त्यानंतर दिल्लीत झालेल्या प्रार्थनासभेत म्हणाले, 

"जर मुसलमानांनी सर्व हिंदूंना मारून टाकले, तरी हिंदूंनी हिंसेचा मार्ग पत्करू नये, तर शांतपणे मृत्यूला सामोरे जावे. जर त्यांनी असे केले, तर हिंदू धर्म अमर होईल आणि त्या बलिदानातून आपण एका नव्या भारताचा किंवा नव्या विश्वाचा उदय पाहू."

प्रत्येक हिंदू घरातील हिंदू कधीच हिंसक नव्हता व होणारही नाही. तो फार तर आपल्याच भावकीत कोर्टाच्या पायर्‍या झिजवून  वकिलांचे बंगले उभारण्यास मदत करेल. म्हणूनच "प्रत्येक हिंदू हिंसक, बलात्कारी झाला आहे" हे विधान राजकीय आणि इस्लामी कट्टरतेला, दहशतवादाला कव्हर देणारे संरक्षक कवच आहे. याविरुद्ध कुणी बोलणार नाही व त्याविरुद्ध काहीही होणार नाही. उलट, झुंडशाही सक्रिय होईल. मनुवादी, संघोटे, अंधभक्त वगैरे म्हणत हल्ला एक झुंड करेल व दुसरी झुंड मुस्लीम लांगूलचालन करणारे, गुलाम वगैरे म्हणत प्रतिहल्ला चढवेल. मूळ मुद्दा बाजूलाच राहील. जसा प्रत्येक हिंदू हिंसक व बलात्कारी नाही, तसाच प्रत्येक मुसलमान व ख्रिश्चनही नाही. तरीही हे नरसंहार का घडले, हा मूळ प्रश्नच बाजूला पडत आहे. ते घडले, घडत आहेत व घडत राहतील, म्हणून हिंदूंनी मुसलमानांचा, ख्रिश्चनांचा द्वेष करणे चुकीचे आहे. तसेच यामागचे मूळ कारण व भेद लक्षांत न घेता राज्यघटनेने सर्व पंथीयांना प्रचार व प्रसाराचा समान घटनात्मक अधिकार देणेही चुकीचेच आहे. वास्तविक प्रत्येक पंथ आणि राज्यव्यवस्था यांचा काही संबंध नसणे ही इहवादी भूमिका सोडून भारताने प्रत्येक पंथाला चुचकारणारी "सेक्युलर" व समाजवादी विचारसरणी स्वीकारली. सांस्कृतिक मार्क्सवादाला शिक्षण क्षेत्रावर अनिर्बंध सत्ता गाजवू दिली. 

ज्या विचारसरणीने इतिहासात हिंदूंच्या स्वसंरक्षणाच्या व प्रतिकाराच्या अधिकाराला नाकारले आणि त्यांना विनाकारण बळी पडू दिले, तीच विचारसरणी आज आधुनिक काळात हिंदू सण, परंपरा किंवा त्यांच्या स्वसंरक्षण करण्याच्या कायदेशीर अधिकारांना 'उग्र आणि हिंसक' ठरवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहे. स्वत:ला "पॉलिटकली करेक्ट"  ठेवणारा हिंदू याला साधा वैचारिक प्रतिकारही करण्याच्या स्थितीत उरला नाही. त्यामुळे, ही वाळवी केवळ हिंदू समाजच नव्हे तर संस्कृतीही पोखरल्याशिवाय थांबणार नाही! 



गुरुवार, ११ जून, २०२६

गोव्यात मराठी ब्राह्मणांनी आणली?

सचिन मदगे यांनी सप्रमाण चुकीचे ठरवूनही नंतर चार वर्षांनी पुन्हा पूर्वी मारलेल्या त्याच ऐतिहासिक लोणकढी थापांसारखाच ‘मराठी गोव्याची भाषा नाही’, हे सिद्ध करण्याचा उदय भेंब्रेंचा हा प्रयत्न आहे. मराठी ही कुठल्याही ब्राह्मणांनी बाहेरून आणलेली भाषा नाही. मराठी ही गोव्याचीच भाषा आहे!

केलेले दावे सप्रमाण खोडून काढल्यानंतर तेच दावे पुन्हा चार पाच वर्षांनी करण्याची खोड असलेल्या उदय भेंब्रे यांनी ‘गोव्यात मराठी ब्राह्मणांनी आणली’ केलेला हा दावा चुकीचा आहे. यातून त्यांनी ‘मराठी ही गोव्याबाहेरची भाषा’ हे सिद्ध करण्याचा खटाटोप केला आहे. 

संपूर्ण लेखात त्यांनी मांडलेले सिद्धांत दिशाभूल करणारे आहेत. २०१९साली राखीगडी संशोधनातून ‘सर्व भारतीयांचे पूर्वज एकच आहेत’ हे सप्रमाण सिद्ध झालेले असतानाही ते ‘प्रोटो-ऑस्ट्रोलॉइड’ सिद्धांत पुढे रेटतात. नाकाची लांबी, त्वचेचा रंग यावरून डिक्सननी मांडलेला व गुहा यांनी पसरवलेला सिद्धांत भेंब्रे मांडतात. आर्य आक्रमणाचा पूर्णपणे खोटा व मुद्दाम पसरवलेला सिद्धांत आता पटवून देता येत नाही, त्यामुळे शब्दांचे खेळ करत त्याला ‘आर्यन मायग्रेशन’ केले आहे. पण, त्याचा आधार घेतल्याशिवाय वर्गीकृत संघर्षाची बिजे पेरताच येत नाहीत. त्यामुळे, ‘आर्य उत्तरेतून आले’, असे ते मिशेल दानिनोचा संदर्भ देऊन सांगतात. ‘आर्य म्हणजे सारस्वत’ अशीही पुस्ती जोडतात. मुळात आर्य हा शब्द वंशवाचक, जातिसूचक नाही. हे ‘मायग्रेशन’ रेटण्यामागे एक फार मोठे कारण आहे. जसे सगळे गोव्यात ‘आले’ तसेच पोर्तुगीजही ‘आले’, हा सिद्धांत मांडून दोन गोष्टी साध्य केल्या जातात. एक या सर्वांची संस्कृती भिन्न आहे आणि दुसरी ख्रिश्‍चन अत्याचार सामान्य केले जातात. त्यातून ‘आदिवासींची मूळ संस्कृती  पहिल्यांना हिंदूंनी नष्ट केली व नंतर ख्रिश्‍चनांनी केली; त्यामुळे ख्रिश्‍चनांना दोष द्यायचा असेल तर तो हिंदूंनाही द्यावाच लागेल’, हा विचार रुजवता येतो. ‘सगळ्यांचे पूर्वज एकच होते, निसर्गपूजक संस्कृतीही एकच होती’, हा विचार मान्य केला तर शोषक आणि शोषित या दृष्टिकोनातून इतिहासाची मांडणी करता येत नाही. भेंब्रे यांनी मांडलेल्या ‘मायग्रेशन’ सिद्धांताप्रमाणे ‘सगळेच आले’, हे गृहीत धरले तर सर्वांत प्रथम आले ते फार तर, ‘आधीवासी’ (आधी येऊन राहिलेले) ठरतात; ‘आदिवासी‘ किंवा ‘मूलनिवासी’ नाही.  

भाषेचे गट पाडून त्याची फाडणी पुढे वांशिक गटापर्यंत करण्यात सगळ्या ब्रिटिश, मिशनरि भाषाविद्वानांनी यश मिळवले आहे. त्यांचे कार्य इमानेइतबारे समाजवादी, साम्यवादी व पुरोगामी विचारवंत पुढे नेत आहेत. उदय भेंब्रे यांनी कोकणस्थ, कर्‍हाडे, कोकणस्थ व देशस्थ या महाराष्ट्रातून येऊन इथे स्थायिक झालेल्यांच्या यादीत इथले पद्देही बसवले आहेत. जर पद्दे नंतर आले तर ते गावकारीत कसे आहेत? जी भटी भाषा पद्दे बोलतात, ती मराठी आहे. याचाच अर्थ कोकणस्थ, कर्‍हाडे, कोकणस्थ व देशस्थ येण्याआधीपासूनच मराठी गोव्यात होती. कर्‍हाटमधून आलेल्या कर्‍हाड्यांची उपशाखा म्हणजे पद्दे हा युक्तिवाद ते कदाचित ते पुढील लेखात करतील. पण, तसे ते नाही. पद्दे जी मराठी बोलतात ती आणि कर्‍हाडे जी मराठी बोलतात, त्यात फरक आहे. जसा इथला वनवासी समाज गोव्यातलाच आहे, तसेच हे पद्देही गोव्यातीलच आहेत. वनवासींबाबत - ‘आदिवासी’ इथले ‘मूलनिवासी’ - हा विचार मांडताना त्यांच्याशिवाय गोव्यातील सखल, सागरी भागात कुणी राहतच नव्हते, असे म्हणणे पटत नाही. 

लिखित साहित्याचा विचार केला तरीही कोकणीपेक्षा मराठीमध्ये साहित्य विपुल प्रमाणात होते. ते ख्रिश्‍चन मिशनर्‍यांनी, पोर्तुगिजांनी नष्ट केले. तरीही प्रशासकीय दस्तऐवज मराठीतूनच होते. तेव्हाही गोमंतकीयांची मुख्यत्वे बोलण्याची भाषा कोकणी व लिहिण्याची भाषा मराठी होती. सारस्वतांकडून स्टीफन्सने कोकणी भाषेची रचना शिकून घेतली व ’आर्ते दा लिंगाओ कॅनारिम्’ हे कोकणीचे पहिले व्याकरण लिहिले. भाषेची व्याकरण लिहिण्याएवढी समृद्धता असतानाही त्याने ‘ख्रिस्तपुराण’ कोकणीतून का लिहिले नाही? त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, कोकणीत छंदोबद्ध, ओवीबद्ध लिखित साहित्य त्यावेळेस उपलब्ध नव्हते व तेवढी शब्दसंपदाही त्यावेळेस उपलब्ध नव्हती. भेंब्रे म्हणतात तसे,  ‘एका ब्राह्मणाने विनंती केली म्हणून मग फादर स्टीफन्स याने मराठीत ख्रिस्तपुराण लिहिले’, केवळ यामुळे नव्हे. स्टीफन्सबद्दल लिहिताना ‘तो मराठीही शिकला, हे नंतर कळून येते’ हे  वाक्य मखलाशीचा उत्तम नमुना आहे. 

ख्रिश्‍चन प्रसारासाठी चर्चमधून कोकणीतून प्रवचने दिली जात असत. ती वाचता यावीत, समजावीत म्हणून पूर्णपणे शुद्ध कोकणी भाषेतील ’डोक्ट्रीना क्रिस्ता’सारखी पुस्तके रोमन लिपीत लिहिली गेली. बहुतांश लोकांना मराठीची वा कोकणीची देवनागरी, गोंयकानडी (किंवा कांदवी)  व मोडी लिपीही माहीत नव्हती तिथे रोमन लिपीत लिहिलेले कोकणी पुस्तक वाटून काहीही लाभ नव्हता. ते पुस्तक मिशनरि शिक्षकांसाठी होते. कोकणीत बोलता यावे, यासाठी रोमन लिपीतून लिहिलेले कोकणी साहित्य होते. मौखिक कोकणी त्यांना ख्रिस्तप्रसारासाठी, संपर्कासाठी महत्त्वाची होती. कोकणीचे एवढे महत्त्व वाटत असते, तर त्यांनी तेच देवनागरीत किंवा मोडीत लिहिले असते. स्टीफन्सनंतरही जे साहित्य लिहिले गेले ते सामान्य लोकांसाठी नव्हते, ते पाद्रींनी कोकणीतून प्रवचने देता यावीत यासाठी रोमन लिपीत लिहिलेले साहित्य आहे. त्यात कोकणीची महत्तता जराही सिद्ध होत नाही, उलट चर्चची उपयुक्तता सिद्ध होते. ‘आदिवासींनी कोकणी आणली’, हा विचार ‘मूळ आदिवासींची भाषा संथाली, मुंडारी, खासी होती’ या विचारला छेद देणारा आहे. 

सचिन मदगे यांनी सप्रमाण चुकीचे ठरवूनही नंतर चार वर्षांनी पुन्हा पूर्वी मारलेल्या त्याच ऐतिहासिक लोणकढी थापांसारखाच ‘मराठी गोव्याची भाषा नाही’, हे सिद्ध करण्याचा उदय भेंब्रेंचा हा प्रयत्न आहे. मराठी ही कुठल्याही ब्राह्मणांनी बाहेरून आणलेली भाषा नाही. मराठी ही गोव्याचीच भाषा आहे! 


रविवार, ३१ मे, २०२६

आदिवासी की वनवासी?

शब्दांना अर्थ असतो म्हणूनच ते जाणीवपूर्वक योजले जातात. असे जाणीवपूर्वक योजलेले शब्द पुढे जाऊन अर्थाला अपेक्षित परिणामही घडवत राहतात. ‘आदिवासी’ हा एक असा शब्द आहे जो पाश्‍चिमात्त्य विद्वानांनी मुद्दाम योजला. हा शब्द भारताच्या प्राचीन वाङ्मयात नाही. इतकेच कशाला इथल्या मूळ म्हणून सांगितल्या जातात त्या मुंडारी व ऑस्ट्रिक भाषांतही तो नाही. भारतातील जंगलात राहणारे आणि मैदानी भागात राहणारे लोक वेगवेगळ्या वंशाचे व संस्कृतीचे आहेत, असा विचार पेरायला पाश्‍चिमात्त्य विद्वान व मिशनरि यांनी सुरुवात केली, त्यातून योजलेला शब्द म्हणजे ‘आदिवासी’.

शब्दांना अर्थ असतो म्हणूनच ते जाणीवपूर्वक योजले जातात. असे जाणीवपूर्वक योजलेले शब्द पुढे जाऊन अर्थाला अपेक्षित परिणामही घडवत राहतात. ‘आदिवासी’ हा एक असा शब्द आहे जो पाश्‍चिमात्त्य विद्वानांनी मुद्दाम योजला. हा शब्द भारताच्या प्राचीन वाङ्मयात नाही. इतकेच कशाला इथल्या मूळ म्हणून सांगितल्या जातात त्या मुंडारी व ऑस्ट्रिक भाषांतही तो नाही. भारतातील जंगलात राहणारे आणि मैदानी भागात राहणारे लोक वेगवेगळ्या वंशाचे व संस्कृतीचे आहेत, असा विचार पेरायला पाश्‍चिमात्त्य विद्वान व मिशनरि यांनी सुरुवात केली, त्यातून योजलेला शब्द म्हणजे ‘आदिवासी’. 

अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात ’ॲबओरिजिनल्स’,  ’इंडिजिनस’ अशी संकल्पना होती, कारण तिथे युरोपियन लोकांनी बाहेरून जाऊन स्थानिक लोकांना व संस्कृतीला संपवले होते. भारतात तशी परिस्थिती नव्हती. येथील सर्वांचे पूर्वज व संस्कृती एकच होती. परंतु, ब्रिटिश प्रशासकांनी आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी पाश्चात्त्य सिद्धांतांची हुबेहूब नक्कल करून भारतामध्येही ’मूळ रहिवासी विरुद्ध नंतर आलेले आक्रमक’ असा चुकीचा विखार पेरला. त्या ’ॲबओरिजिनल्स’ शब्दाचे व त्याच्या अर्थासह संकल्पनेचे भारतीय रूप म्हणजे ‘आदिवासी’ व ‘मूलनिवासी’. 

’आदिवासी’ हा शब्द पहिल्यांदा १९३०च्या दशकात (साधारण १९३० ते १९३५ दरम्यान) अधिकृतपणे वापरात आला. प्रसिद्ध समाजसुधारक ठक्कर बाप्पा यांनी १९३०च्या दशकात जंगलात आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांसाठी सामूहिकरीत्या ’आदिवासी’ (आदि = सुरुवातीचे, वासी = रहिवासी) हा शब्द पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर प्रचलित केला. त्याच काळात आजच्या झारखंडमधील (तेव्हाचा बिहार) ’छोटा नागपूर’ भागातील वनहक्कांसाठी लढणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांनी स्वतःची राजकीय ओळख निर्माण करण्यासाठी हा शब्द स्वीकारला. त्यातून ’आदिवासी महासभे’चा उदय झाला. ’आदिवासी महासभे’चे नेते जयपाल सिंह मुंडा यांनी राज्यघटनेत ’आदिवासी’ हा शब्द वापरण्याची मागणी केली होती. परंतु, घटनासमितीने ती नाकारली. ठक्कर व मुंडा हे दोघेही आदिवासी शब्द वापरत असले तरी त्यांच्यात एक वैचारिक फरक होता. आदिवासी हे हिंदू संस्कृतीचाच भाग असल्याचे ठक्करबाप्पांचे मत होते, ‘आम्ही हिंदू नाही आणि कधीच नव्हतो’, मुंडा यांचे मत होते. आदिवासींना बळजबरीने हिंदू ठरवणे किंवा त्यांच्यावर हिंदू रितीरिवाज लादणे म्हणजे आदिवासींची मूळ निसर्गपूजक संस्कृती नष्ट करणे असे मुंडांचे म्हणणे होते. मुंडा हे आदिवासी होते, हे सांगितले जात असले तरी ते मिशनरि संस्कृतीत वाढलेले ख्रिश्‍चन होते. ख्रिश्‍चन पंथाने जगभर निसर्गपूजक संस्कृती संपवल्या हे मुंडा यांना माहीत नव्हते काय? निश्‍चितच व चांगलेच माहीत होते. तरीही स्वत:स ख्रिश्‍चनिटीपासून दूर न करता त्यांनी कायम वनात, जंगलात राहणाऱ्यांना निसर्गपूजक हिंदू संस्कृतीपासून तोडण्याचे काम केले. 

वनात राहणारे, जंगलांच्या पायथ्याशी राहणारे, सखल किंवा मैदानी भागात राहणारे व समुद्रकिनारी राहणारे यांत भौगोलिक परिस्थितीप्रमाणे वागण्याबोलण्यात भेद आहेत; पण त्यांची संस्कृती एकच आहे. हिंदू ही जगातली एकमेव जिवंत निसर्गपूजक संस्कृती आहे. सगळ्या धारणा, विचार, सण, उत्सव, संकेत हे एकाच निसर्गपूजक संस्कृतीतून आलेले आहेत. राखीगढीच्या जनुकीय संशोधनात सर्व भारतीयांचे मूळ एकच असल्याचे व त्यात सातत्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, ना मानवी वेगळेपण आहे ना संस्कृतीचे वेगळेपण आहे; भेद आहे तो त्याच्या भौगोलिक रचनेनुसार आलेला फरक आहे. हेच फरक, संघर्षबिंदू (फॉल्टलाइन) शोधून, ते मोठ्या करून संपूर्ण जगातील  निसर्गपूजक संस्कृती नष्ट करणाऱ्या ख्रिश्‍चनिटीला भारतात ते का पूर्णपणे जमले नाही? त्यामागे मुख्य कारण म्हणजे तात्त्विक व वैचारिक बैठक. ज्या निसर्गपूजक संस्कृती संपल्या ते केवळ निसर्गपूजक होते, त्यामागचा विचार विभिन्न स्तरावर मौखिक किंवा लिखित स्वरूपात रुजला नव्हता. आपली संस्कृती टिकून राहिली कारण आपल्याकडे ती वैचारिक बैठक होती व अजूनही आहे. 

ही वैचारिक बैठक नष्ट करण्यासाठी खूप कष्ट लागतात, सातत्य लागते आणि शेकडो वर्षे द्यावी लागतात. त्यांची ती तयारी होती. म्हणून त्यांनी भाषेची वर्गवारी केली व तिला वांषिक वर्गवारीपर्यंत आणून जोडले. त्यातूनच अशी स्थानिक माणसे शोधून काढली व वाढवली जी हा भेद मोठा करत राहतील. अशा लोकांना जातीय, सामाजिक अस्मिता यांचे प्रतीक बनवले. त्यामुळे, आता त्यांना विरोध म्हणजे समाजाला, जातीला विरोध ही भावना दृढ झाली. जे वनवासी लोकांबाबत केले गेले, तेच आर्य-द्रविड, दलित-सवर्ण(तथाकथित) आणि शीखांबाबतही केले गेले. परिणामी सगळे हिंदू संस्कृतीपासून स्वत:ला वेगळे सिद्ध करू लागले. 

ब्रिटिश राजवटीत जेव्हा संथाल परगणा आणि छोटा नागपूर भागात नवीन जमीन महसूल व्यवस्था (कायम धारा पद्धत) लागू झाली, तेव्हा जंगल व जमिनी बळकावण्यासाठी बाहेरून लोक आले. यामध्ये हिंदू जमीनदार आणि सावकार (महाजन) जसे होते, तसेच मुस्लिम व्यापारी, ब्रिटिश अधिकारी आणि नंतर आलेले ख्रिश्चन मिशनरीसुद्धा होते. या सर्वांसाठी ‘दिक्कू’ हा शब्द वापरात आला. जर निसर्गपूजक संस्कृतीवर हिंदू संस्कृतीने आक्रमण केले असते, तर हा शब्द हजारो वर्षांपूर्वीच यायला हवा होता. पण, तो आधुनिक आहे. यावरूनच ‘हिंदू संस्कृती लादली’ हा विचार टिकत नाही. संथाली आणि मुंडारी भाषेत स्वतःच्या समूहाला ’होर’ किंवा ’होडोपोन’ (माणूस किंवा मानव) म्हणतात. द्रविडी भाषांत डोंगरावर राहणाऱ्यांना ’मळैवासी’ (डोंगरावरील रहिवासी) किंवा ’कुळ’, तर जंगलात राहणाऱ्यांना ’काडूवासी’ (वनात राहणारे) म्हटले जायचे. ऑस्ट्रिक (मुंडा) भाषा समूहातील (उदा. संथाली, मुंडारी, हो) लोक स्वतःला किंवा इतरांना ओळखण्यासाठी ‘आदिवासी’सारखा कालवाचक शब्द (आधी-नंतर) कधीच वापरत नाहीत. द्रविड भाषांमधील मूळ शब्दमूळ प्रोटो-द्रविड किंवा प्राचीन तमिळ, कन्नड, तेलुगू भाषांमध्येही ’आदिवासी’ या संकल्पनेला समांतर शब्द नाही. 

’वनवासी’ हा स्थानवाचक शब्द ’स्थान’ किंवा ’भूगोल’ दर्शवतो. याचा अर्थ होतो-’जंगलात किंवा वनात राहणारे’ . हा शब्द कुठेही कोण आधी आले आणि कोण नंतर आले हा काळाचा किंवा वंशाचा भेद करत नाही. तो संपूर्ण भारतीय समाज हा एकच आहे आणि त्यातील काही लोक वनात राहतात, हे सत्य हा शब्द स्पष्ट करतो. ’आदिवासी’ हा कालवाचक किंवा आक्रमण सूचक ओळख सांगणारा शब्द आहे. ’आदि’ म्हणजे सर्वात पहिले. हा शब्द वापरल्याने नकळतपणे एक असा संदेश जातो की, हे लोक ’पहिले’ आहेत आणि बाकीचे सर्व हे ’नंतर आलेले’ किंवा ’बाहेरचे’ आहेत, ही एकाच संस्कृतीच्या लोकांमध्ये ’परकेपणाची’ भावना निर्माण होते. एका प्रदेशात, एका कालखंडात फक्त ‘आदिवासी’च राहत होते व अन्य कुणीच नव्हते, हे न पटणारे आहे. 

या सगळ्यात एक अत्यंत घातक विचार रुजवला जातो. तो म्हणजे इस्लामी व ख्रिस्ती विचार रुजवण्यासाठी जे अत्याचार करण्यात आले, त्यांना सामान्य करणे किंवा नाहीसे करणे यासाठी. ख्रिश्‍चनांना व मुसलमानांना दोष द्यायचा असेल तर हिंदूंना तो स्वत:लाही द्यावा लागेल; कारण आदिवासींना पहिल्यांदा हिंदू करण्यात आले, नंतर मुसलमान किंवा ख्रिश्‍चन. सगळेच बाहेरून आलेले, सगळ्यांनीच आमच्यावर अन्याय केला, हा घातक विचार रुजवला जातोय. त्यासाठी तेव्हा योजलेला ‘आदिवासी’ शब्द आता अत्यंत उपयुक्त व साहाय्यक ठरतोय. त्यामागचा अर्थ व हेतू आता फलद्रूप होत आहे. 


मंगळवार, २६ मे, २०२६

मराठीला गोव्याची राजभाषा का करायची?

कोकणी व मराठी हे दोन्ही गोमंतकीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. संस्कृती, अस्मिता यांचा उद्घोष करताना, मराठीला डावलणे कोकणीच्याही हिताचे नाही. मराठी राजभाषा झाल्याने स्थानिक संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणून तिचा योग्य सन्मान होईल. गोमंतकीय संस्कृतीत कोकणीसोबत मराठीचा जो मान आहे तो राखला जावा, यासाठी मराठी राजभाषा झाली पाहिजे. गोव्यात मराठीतून अधिक लिहिले, वाचले जाते म्हणून कोकणीचे आजवर काहीही नुकसान झाले नाही. तसेच मराठी राजभाषा झाल्यानेही कोकणीचे नुकसान होणार नाही. उलट, आपल्याच संस्कृतीच्या घटकाचा मान राखल्याचे समाधान मिळेल.
राजभाषा म्हणून जे काही मिळायचे, ते मराठीलाही मिळते मग मराठीला गोव्याची राजभाषा का करायची, हा प्रश्‍न अनेकांना पडतो. गोव्यातली मराठी खूप प्राचीन आहे, तिला लिखित व मौखिक दोन्ही परंपरा आहेत, हे सत्यच आहे. ‘राजभाषा’ ही मुख्यत: लिखित स्वरूपात वापरली जाणारी शासकीय भाषा या अर्थी तिचा वापर होतो. राजभाषेचा संबंध बोलण्याशी कमी व लिहिण्याशी आणि लिहिलेले वाचण्याशी अधिक येतो. या निकषावर पाहिल्यास मराठी राजभाषा होण्यात कोणतीच अडचण नाही. कोकणी ही बोलण्याची आणि मराठी ही लिहिण्यावाचण्याची भाषा आहे, याबद्दल कुठल्याच गोमंतकीयाच्या मनात कसलीच शंका नाही. सर्वाधिक लिहिली व वाचली जाणारी स्थानिक भाषा असूनही तिला राजभाषा न करणे, हा मराठीवर केलेला अन्यायच आहे. त्याहीपेक्षा, मराठीचा गोव्याच्या अस्मितेशी असलेला संबंध नाकारणे हा जास्त मोठा अपमान आहे. आम्हीच केलेली आमच्याच भाषेची ती अवहेलना आहे.

मराठी ही महाराष्ट्राची व कोकणी ही गोव्याची, असे सरळ ‘एक घाव दोन तुकडे’ केले जातात. पण, थोडे बारकाईने पाहिल्यास गोव्यातील मराठी व महाराष्ट्रातील मराठी यात बराच फरक आहे. साधे उदाहरण द्यायचे झाल्यास, मराठी भाषिक गोमंतकीय कधीच ‘नारळाचे झाड’, ‘पोफळीचे झाड’ असे म्हणत नाही व लिहीतही नाही. तो सरळ ‘माड’ आणि ‘माडी’ असे शब्द वापरतो. स्थानिक असलेली अनेक फळे, भाज्या यांना कोकणीत व मराठीत समान शब्द वापरले जातात. स्थानिक भूमीशी संबंधित अनेक शब्द महाराष्ट्रातील मराठीस नवखे आहेत. गोव्याच्या मराठीतील अनेक शब्दांचे लिखित रूप व उच्चारण वेगवेगळे आहे. हे पाहता गोव्यातली मराठी ही गोव्याची अस्मिता नाही, असे कसे बरे म्हणता येईल? कोकणी व मराठी दोन्ही भाषा गोव्याच्या अस्मिता आहेत. 

मराठी राजभाषा केल्यास गोमंतकीयांच्या जागा महाराष्ट्रीय लोक हिरावून घेतील, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी एक सोपा उपाय आहे. नोकरीसाठी अर्ज करताना जे निवासाचे प्रमाणपत्र (रेसिडेन्स सर्टिफिकेट) घेतले जाते, त्यात ‘या व्यक्तीचे पूर्वज १९६१पूर्वी गोव्याचे निवासी होते’ हे प्रमाणित केलेले असणे अनिवार्य करावे. त्यासाठी तेर्म किंवा तेव्हापासून आजवरचा कालावधी गोव्यातच स्थायिक असल्याचा पुरावा घ्यावा. सरकारकडेच १९६३सालची जनगणना आहे, त्यालाच प्रमुख आधार बनवावे. याशिवाय जमिनीचे कागदपत्र, गावकारी-कोम्युनिदाद दस्तऐवज, पोर्तुगीज शासकीय कागदपत्रे वगैरेंचा आधार घेता येणे शक्य आहे. गाव हे एक लहान युनिट पकडल्यास त्यात कोण कुठून कधी आला होता, याची मौखिक परंपरा असते, त्याचाही आधार घेता येणे शक्य आहे. एकूण मूळ महत्त्वाचा मुद्दा काय, की केवळ मराठी राजभाषा झाली म्हणून महाराष्ट्रातील मराठी भाषिकांनी गोमंतकीयांचा हक्क हिरावून घेऊ नये. 

वास्को हे प्रातिनिधिक उदाहरण घेतल्यास एक दोन महिन्यात रेशन कार्डापासून आधारकार्डापर्यंत सगळी प्रमाणपत्रे करून देणारे अधिकारी गोमंतकीयच नव्हते का? तेव्हा नोकरीचा हक्क हिरावला जाण्याची भीती कुठे गेली होती? आजही नजीकच्या काळात गोव्यात आलेल्यांना व्यवसायाची सर्व सुविधा, कागदपत्रे बिनदिक्कत कशी मिळतात, हे एक उघड रहस्य आहे. मराठी राजभाषा झाल्याने होणाऱ्या कथित नुकसानापेक्षा हे प्रत्यक्षात झालेले व होत असलेले नुकसान खूप आहे. 

मराठीला राजभाषा करून करणार काय, हा एक प्रश्‍न असतो. हाच प्रश्‍न कोकणीबाबत, ‘राजभाषा होऊनही काय मिळाले?’ असा उपस्थित होतो. भाषा म्हणून विकास होण्याचा मार्ग खरे तर खुला झाला होता. पण, काही मोजक्या लेखकांचा पारितोषिकांनी भरलेला दिवाणखाना, या व्यतिरिक्त कोकणी भाषेची भरीव प्रगती अभावानेच आढळते. किती कोकणी लेखक भाषेसाठी कार्य करतात? व्याकरण, व्युत्पत्ती, कोश तयार करण्यासाठी किती लोक धडपडतात? भाषा म्हणून पाहायचे झाल्यास मराठीत जशी या गोष्टींची निरंतर परंपरा व एकवाक्यता आहे, तशी कोकणीत नाही. काही मोजकीच माणसे आहेत, जे मूळ कोकणी शब्द कोणते याचा शोध घेत गावोगावी जाऊन जुन्या पिढीतील लोकांशी संवाद साधतात. विस्मृतीत गेलेले किंवा वापरात नसलेले कोकणी शब्द व त्यांचे अर्थ शोधत हिंडतात. हे व्यापक स्तरावर होणे अपेक्षित आहे. नवीन लेखक, वाचक घडवणे हा प्रस्थापित कोकणी लेखकांचा नित्यक्रम असला पाहिजे. मराठीत तसे प्रयत्न सातत्याने झाले आहेत व आजही होत आहेत. कोकणीस अजून बराच पल्ला गाठायचा आहे; तो गाठण्यासाठी वापरायची शक्ती मराठी राजभाषा होण्यापासून रोखण्यात वापरली जाते. 

कोकणी व मराठी हे दोन्ही गोमंतकीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. संस्कृती, अस्मिता यांचा उद्घोष करताना, मराठीला डावलणे कोकणीच्याही हिताचे नाही. मराठी राजभाषा झाल्याने स्थानिक संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणून तिचा योग्य सन्मान होईल. गोमंतकीय संस्कृतीत कोकणीसोबत मराठीचा जो मान आहे तो राखला जावा, यासाठी मराठी राजभाषा झाली पाहिजे. गोव्यात मराठीतून अधिक लिहिले, वाचले जाते म्हणून कोकणीचे आजवर काहीही नुकसान झाले नाही. तसेच मराठी राजभाषा झाल्यानेही कोकणीचे नुकसान होणार नाही. उलट, आपल्याच संस्कृतीच्या घटकाचा मान राखल्याचे समाधान मिळेल. 

सोमवार, २५ मे, २०२६

समता, समानता आणि भारत

संस्कारांचा, देवळासारख्या संस्कृतीच्या मानबिंदूंचाही आम्ही बाजार मांडला आहे. भारतीय समाजातील पारंपरिक सामूहिक ताकद, परस्परावलंबित्व आणि आत्मसन्मान नष्ट करून, प्रत्येक भारतीयाला एक वैयक्तिक आणि वैचारिकदृष्ट्या गुलाम बनलेला पाश्चात्य ग्राहक बनवण्याचे पाश्‍चात्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. संस्कृती संपवण्याचे ख्रिश्‍चनिटीचे ध्येय हिंदूच पूर्ण करतील; तेही समता, समानता ही त्यांनीच दिलेली शस्त्रे वापरून.

मागील काही लेखांमध्ये, ‘भारताची संस्कृती संपवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सर्वांत यशस्वी ठरली ती ख्रिश्‍चनिटी’, असे म्हटले होते. आता त्याचे काही अन्य कंगोरे आणि परिणाम यावर विचार करू. संस्कृती, समाज आणि उद्योग यांचा नाश करण्यासाठी ‘समता व समानता‘ या दोन शस्त्रांचा वापर प्रामुख्याने ब्रिटिश प्रशासक, युरोपीय विचारवंत आणि ख्रिश्चन मिशनरि यांनी पद्धतशीरपणे केला. 

ईस्ट इंडिया कंपनीला प्रारंभी (निदान कॅलिको ॲक्ट होण्यापूर्वी तरी) केवळ व्यापार करण्यात स्वारस्य होते. म्हणून त्यांनी मिशनरिंवर बंदीस मान्यता मिळवली होती. त्यामुळे, डच राज्य करत असलेल्या सेरामपूर येथे मिशनरि कार्य सुरू झाले. इथेच समता व समानतेचे बीज रोवणारे ‘सेरामपूर त्रिकुट’ (विल्यम कॅरी, जोशुआ मार्शमन आणि विल्यम वॉर्ड) सक्रिय झाले. त्यांनी ‘देवासमोर सर्व माणसे समान आहेत’ हा खिश्‍चनिटीचा सिद्धांत (जो पाश्‍चिमात्य देशातही त्यावेळी लागू नव्हता) छापून पसरवला व शाळा उघडून शिकवायला सुरुवात केली. हेच कार्य अलेक्झांडर डफ या स्कॉटिश मिशनरीने केले व चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज या अँग्लिकन मिशनऱ्याने भारतातील गरिबांच्या आणि कामगारांच्या समान हक्कांसाठी बोलणे सुरू केले. थॉमस मेकॉले व हेन्री विवियन डेरोझिओ यांनी हे विषारी बियाणे इथे रुजेल अशी भूमी तयार केली. त्याला वैचारिक बैठक विल्यम जोन्स आणि मॅक्स म्युलर यांनी दिली. 

भारतीय समाजव्यवस्था पूरकता आणि परस्परावलंबित्व यावर आधारित होती. समाजाचा प्रत्येक घटक, अन्य घटकांस व समाजास पूरक आणि परस्परांवर अवलंबून होता. या प्रत्येक घटकाला कर्तव्य आणि जबाबदारी यांची जाणीव होती. समतेचा आणि समानतेचा उद्घोष करणारे आजचे विचारवंत जात ही व्यावसायिक ओळख होती, प्रत्येक जात इतरांना पूरक व्यवसाय करणारी होती आणि इतरांवर अवलंबून असणारी होती हे सांगत नाहीत. ते सांगितले तर विषमतेच्या आणि शोषक-शोषित या गृहीतकांना बाधा येते. जेव्हा चलन अस्तित्वात नव्हते, वस्तूच्या बदल्यात वस्तू किंवा शेतसारा असायचा, तेव्हा उच्चनीचता कशी संभवते? याचे उत्तर त्यांच्याकडे नसते. मग, ते कुणालाही कोणतेही काम करण्याची मुभा व सामाजिक प्रतिष्ठा याकडे वळतात. भारतीय समाजव्यवस्थेत प्रत्येकाला त्याच्या स्थानी, तेवढ्यापुरता मान होता. प्रत्येकाला आपापल्या जागी एक निश्‍चित आणि आदराचे स्थान होते. ज्यांना त्याकाळी अस्पृश्य व आजकाल ‘शोषित’ म्हटले जाते, त्यांनाही देवस्थानाच्या कार्यात, सण-उत्सवात मान होता. पण, तो प्रांगणापर्यंत होता, देवळात नव्हता. आणखी एक महत्त्वाचा दोष म्हणजे, जातीचा व्यवसाय न करणाराही त्याच जातीचा उरणे. आचमनही माहीत नसलेला केवळ ब्राह्मण जातीत जन्मला म्हणून ‘भट’ होतो व जन्मल्यापासून कधीही चामडे न सोललेला माणूस ‘चर्मकार’ होतो आणि त्या त्या जातीचे गुणदोष भोगतो. 

अस्पृश्यतेचा जन्म अतिशुचितेतून होतो. या अस्पृश्यतेची आजची वर्णनेही याच समतेच्या, समानतेच्या दृष्टिकोनातून आहेत. त्यांची घरे गावच्या वेशीजवळ असत किंवा मुख्य वस्तीपासून दूर असत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यवसायाचे ठिकाण व निवासाचे ठिकाण एकच असणे. आजच्यासारखे दुकाने, कारखाने तेव्हा नव्हते; सुतार, कुंभार, लोहार, चर्मकार आपापली कामे घरीच करत असत. दुर्गंधी, स्वच्छता(हायजीन) या कारणांसाठी त्यांची घरे मुख्यवस्तीपासून दूर असत. त्यांचे शोषणच करायचे असते तर देवळाच्या प्रांगणात तरी प्रवेश का दिला असता? या व्यवस्थेमुळे प्रत्येक गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण होता. संरक्षण व काही प्रमाणात न्याय, वगळता एकही गाव राजावर अवलंबून नव्हता. सत्ता कुणाचीही असली तरी फरक पडत नसे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समूहभावना जाज्वल्य होती.

प्रत्येक जातीला त्यांचे व्यावसायिक शिक्षण व कौशल्य घरीच शिकण्याची व्यवस्था होती. त्यामुळे, ‘शिक्षणापासून वंचित ठेवले’ वगैरे थोतांडही आजच्या शिक्षणपद्धतीच्या फूटपट्ट्या लावून पसरवले जाते. ‘सर्वांना सर्व शिक्षण’ या समता, समानतेच्या गृहीतकावर आधारित शिक्षण व्यवस्थेमुळे, मुलाकडे उपजत कोणते गुण, कौशल्य आहे व त्याचा नैसर्गिक कल कुठे आहे, याचा अभ्यासच केला जात नाही. हा अभ्यास पूर्वी गुरुकुलात केला जात असे. आज विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमागेही हे एक महत्त्वाचे कारण आहे. परंपरेने चालत आलेले कौशल्य व ज्ञान एका जातीतच एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे दिले जायचे. त्यामुळे, जात हे ‘स्पेशलाइझेशन ऑफ वर्क’ होते. याचा परिणाम म्हणजे ब्रिटिश आले तेव्हा व यायच्या आधी भारत तयार उत्पादने बाहेरच्या देशांना विकायचा. धातू, वस्त्र, रसायने यातील अनेक दर्जेदार उत्पादनांसाठी जग भारतावर अवलंबून होते. जगाला आपण तयार उत्पादने विकायचो;  आता जगाची सेवा करतोय. कच्चा माल व पक्की बुद्धी जगाला पुरवतो आणि जग आपल्याला त्यातून तयार केलेली उत्पादने विकते. 

ब्रिटिश अधिकारी व ख्रिश्‍चन मिशनरि यांनी हे समतेचे, समानतेचे विचार पसरवायला सुरुवात केली व प्रत्येक गोष्टीला शोषक व शोषित यातच विभागणी करण्याची विचारसरणी रुजवली. त्याला भारतीय समाजातून पहिला पाठिंबा बंगालमध्ये राममोहन रॉय यांनी दिला आणि नंतर जोतिबा फुले यांनी. रॉय यांनी पाश्‍चात्य शिक्षणाचा पाया घालण्याचे काम केले. महाराष्ट्रात फुलेंनी व दक्षिणेत ई. रामासामी यांनी आर्य आक्रमणाचा सिद्धांत सामाजिक स्तरावर प्रत्यक्षात आणला. दक्षिणेत त्याला राजकीय यश मिळाले. महाराष्ट्रात डझनभर मती असलेले राजकारणी आजवर त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा यथेच्छ प्रयत्न करतात. दक्षिणेतील राजकीय यशापेक्षाही महाराष्ट्रात झालेले सामाजिक नुकसान कैक पटीने मोठे व भरून निघू शकत नाही, असे आहे. सगळ्यांत मोठे झालेले सांस्कृतिक, सामाजिक व व्यावसायिक नुकसान त्यांच्या लक्षांत येत नाही. आपल्याच देवदेवतांना, संस्कृतीला आणि पूर्वजांना यथेच्छ शिव्या दिल्या जातात. प्रत्येक देव, संत आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची व्यक्ती यांचे वर्गीकरण जातीत झाले आहे. जातींचे वर्ग आणि वर्गांच्या झुंडी तयार झाल्या आहेत. समाजामध्ये जबाबदारीऐवजी हक्क फार महत्त्वाचे झाले आहेत. आधी जे ‘गावचे’ असायचे ते आता स्वत:च्या कुटुंबाचेही उरले नाहीत. समाज उभा आडवा फाटला आहे. हजारो वर्षांच्या परंपरेने टिकवून ठेवलेले व्यावसायिक कौशल्य, ज्ञान केव्हाच संपले आहे; इतकेच नव्हे तर ते व्यवसायही नष्ट झाले आहेत. ज्या जातिगत व्यवसायांचा अभिमान बाळगला जायचा, त्याचीच आता लाज वाटू लागली आहे. जातींचा इतरांनी केलेला उल्लेख ‘ॲट्रॉसिटी’ व अपमान वाटतोय, तर स्वत:च्याच जातीला मागास म्हणवून घेण्यात अभिमान वाटतोय. स्वत:च्या जातीला ‘मागास म्हणा’ म्हणून आंदोलने केली जात आहेत. सर्वांत मोठा विरोधाभास म्हणजे हेच लोक तोंडाने समतेच्या आणि समानतेच्या गोष्टी करत आहेत. 

राज्यघटनेने नसलेली पांथिक समता अनिवार्य केली आणि व्यवस्थेने पाळायची नागरी समता ऐच्छिक केली. त्यामुळे हक्क, अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य यांचा इतका गवगवा झालाय, की त्यातून आपली झोपण्याची खोलीही सुटलेली नाही. अगदी नवरा बायकोचे नाते पूरक असण्याऐवजी समता व समानतेत अडकले आहे. लग्न एक संस्कार होता, तो आता करार झाला आहे; त्याहीपुढे जाऊन बाजार झाला आहे. संस्कारांचा, देवळासारख्या संस्कृतीच्या मानबिंदूंचाही आम्ही बाजार मांडला आहे. भारतीय समाजातील पारंपरिक सामूहिक ताकद, परस्परावलंबित्व आणि आत्मसन्मान नष्ट करून, प्रत्येक भारतीयाला एक वैयक्तिक आणि वैचारिकदृष्ट्या गुलाम बनलेला पाश्चात्य ग्राहक बनवण्याचे पाश्‍चात्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. संस्कृती संपवण्याचे ख्रिश्‍चनिटीचे ध्येय हिंदूच पूर्ण करतील; तेही समता, समानता ही त्यांनीच दिलेली शस्त्रे वापरून. 


वाळवी लागलेली संस्कृती कुठवर टिकेल?


उदयनिधी स्टॅलिन जे म्हणाला, ते आजवर चालत आलेल्या व पुढेही सुरू राहणार्‍या शृंखलेचा केवळ एक बिंदू आहे. वैदिक सनातन हिंदू संस्कृती संपवण्याचा प्रयास आजकालचा नाही; त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. इस्लामी आक्रमणे नृशंस होती. पण, त्यांचा प्रभाव संस्कृती संपवण्याइतका घातक नव्हता. ख्रिश्‍चनिटी त्यात फारच पुढारलेली व शिस्तबद्ध आहे. ख्रिश्‍चनिटी व समाजवादी-साम्यवादी हे दोन्ही ‘कल्ट’ आहेत. संस्कृती संपवण्याची त्यांची पद्धत सारखी आहे. एरव्ही भारताबाहेर त्यांचे एकमेकांत पटत नाही. पण, भारतात एकवाक्यता असते; इथे ते हातात हात घालून फिरतात. जगभरातही जिथे जिथे निसर्गपूजक संस्कृती संपवल्या तिथे तिथेही ते तसेच वागले आहेत.
 
जिथे ख्रिश्‍चनिटीचा उदय झाला तिथेही तो स्थानिक मूर्ती फोडूनच झाला. पण, बळ असेपर्यंतच यश मिळू लागले. मग, एका नव्या नीतीचा उदय झाला. संघर्षबिंदू (फॉल्टलाइन) शोधण्याचा; त्या शोधायच्या, वाढवायच्या व त्यांना सोडून द्यायचे. तेच एकमेकांत लढून लढून मरतात आणि उरलेले ख्रिस्ती होतात. संस्कृतीही संपते आणि आपले हातही रक्ताने माखत नाहीत, अशी ही संपूर्ण योजना चर्चने राजसत्तेतून राबवली. त्यासाठी स्थानिकांचाच वापर केला. त्यांना मोठे केले.
 
ओफोन्सो (प्रथम) या मध्य आफ्रिकेतील कॉंगो राजाने स्वतःच्या पूर्वजांच्या संस्कृतीला ’सैतानी’ आणि ’अंधश्रद्धेचे जाळे’ घोषित केले. त्याने कॉंगोच्या पारंपारिक देवदेवतांच्या मूर्ती, चिन्हे आणि प्रार्थनास्थळे जाहीरपणे शिव्या शाप देत जाळून, फोडून टाकली. हा राजा तेथील व पाश्‍चात्य पाठ्यपुस्तकांत आता आफ्रिकेचा ‘पहिला प्रबुद्ध आणि आधुनिक राजा’ म्हणून शिकवला जातो. कॉंगोला ’रानटी’ अवस्थेतून बाहेर काढणारा ‘महान सुधारक’ म्हणून तो शिकवला जातो. ऍझ्टेक संस्कृतीतील देवतांना गलिच्छ भाषेत शिव्या देऊन सैतान संबोधण्याचे काम करणारा हुआन डिएगो, आज तेथील अभ्यासक्रमात ’स्थानिक लोकांमध्ये शांतता आणि ख्रिश्चन प्रेमाचा प्रसार करणारा महान दूत’ म्हणून गौरवला जातो. उत्तर अमेरिकेतील ’माटोआका’ नामक स्त्री नंतर ’रेबेका’ झाली. तिने स्वतःच्या टोळीच्या पारंपारिक धार्मिक समजुती आणि देवांना ’अंधार पसरवणारे’ आणि ‘रानटी’ ठरवून त्यांचा त्याग केला. आजही अमेरिकन शाळांमध्ये तिला ’एक महान नायिका’ म्हणून शिकवले जाते. हॉलिवूडमध्ये तिच्यावर चित्रपटही काढण्यात आले. हॉन्ग झिक्वुआन याने चीनमधील पारंपारिक बौद्ध, कन्फ्युशियन आणि ताओइस्ट संस्कृतीला ’सैतानी’ म्हटले. त्याने त्याच्या लाखो अनुयायांच्या मदतीने चीनमधील प्राचीन बौद्ध मंदिरे, कन्फ्युशियन पुतळे आणि ग्रंथ जाळून खाक केले, कोट्यवधी लोक मारले. आंतरराष्ट्रीय स्तरावर याला प्रारंभिक काळात चीनला जुन्या सरंजामशाहीतून आणि अंधश्रद्धेतून मुक्त करू पाहणारा क्रांतिकारक आणि सुधारक म्हणून प्रसिद्ध करण्यात आले.
 
हेच कार्य भारतीय संस्कृतीला नावे ठेवणार्‍यांना जागतिक पातळीवर व भारतीय अभ्यासक्रमात महान ठरवण्यात आले. त्यांच्याच बगलबच्च्यांकडून त्यांना ‘राजा’, ‘महात्मा’ आणि ‘पेरियर’ अशा पदव्या बहाल करवण्यात आल्या. ऑक्सफर्ड, केंब्रिज, हॉर्वर्ड या जागतिक विद्यापीठांमध्ये या ’सुधारकांवर’ पीएचडी आणि संशोधनासाठी मोठा निधी दिला गेला. हाच अभ्यासक्रम पुढे भारतासारख्या देशांच्या पाठ्यपुस्तकांत जसाच्या तसा उतरवला गेला.
 
भारतात त्यांना मारण्यासाठी एक न निखळणारी पाचर मिळाली; ‘सामाजिक अस्मिता’! स्वत:च्याच संस्कृतीतील देवतांना अभद्र, गलिच्छ आणि हीन शिव्या हासडणार्‍यांना व त्यांच्या सामाजिक कार्याला समाजाच्या अस्मितेशी घट्ट बांधून टाकले. आज पुरोगामी म्हणून टिकून राहण्यासाठी आपल्याच देवदेवतांना हीन पातळीवर जाऊन टीका करण्याच्या त्यांच्या कृत्याकडे डोळेझाक तरी करावी लागते, किंवा त्याचे समर्थन तरी करावे लागते. चुकीच्या सामाजिक चालीरीतींवर प्रहार करण्यासाठी देवदेवतांची अभद्र निंदा का करावी लागते, या प्रश्‍नाचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नसते. जातिभेद, उच्चनीचता संपवून समता, समानता आणायची होती म्हणून त्यांनी तसे केले, असे समर्थन पुरोगामी विचारवंत करतात. पण, तशी निंदानालस्ती न करताही सामाजिक सुधारणा करणारे स्वामी दयानंद सरस्वती, ईश्‍वरचंद्र विद्यासागर, नारायण गुरू असे असंख्य समाजसुधारक भारतातील प्रत्येक राज्यांत होते. त्यांची नावे पाठ्यपुस्तकात येणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. एकाच जातीवर सगळे खापर फोडायचे, आत्यंतिक जातीय द्वेष पसरवायचा आणि त्यालाच जातिभेद, उच्चनीचता संपवण्याचे महान कार्य म्हणायचे. या समाजसुधारकांनी केलेल्या जातीयद्वेषाचा उल्लेख केला तरी, तसे करणाराच जातीयवादी ठरतो. आपल्या संस्कृतीवर, देवांवर केलेल्या गलिच्छ टीकेस, ‘गलिच्छ आहे’ असे म्हणतो तोच आज ‘कम्युनरल’ ठरतो.

चर्च, मिशनरि, वसाहतवादी आणि आधुनिक काळात समाजवादी-साम्यवादी विचारवंतांनी अभेद्य करून ठेवलेल्या ‘समाजसुधारकां’च्या विचारांवर टीका करणारा ‘मनुवादी’, प्रतिगामी, समतेचा विरोधक वगैरे ठरवला जातो. इतकेच नव्हे तर तो त्या संपूर्ण समाजाचा विरोधक ठरवला जातो. या माणसांचे कार्य मोठे नाही का? निश्‍चितच आहे, पण आपल्याच संस्कृतीला, देवदेवतांना हीन ठरवून ही माणसे महान झाली आहेत. हीच शृंखला पुढे सुरू आहे आणि संस्कृती संपेपर्यंत सुरूच राहणार आहे. दक्षिण भारत स्वतंत्र द्राविडी अस्मितेपायी आणि महाराष्ट्रासह उत्तर भारत समता-समानतेच्या वेडापायी आपलीच संस्कृती संपवत आहे. या वाळवींनी पोखरलेली संस्कृती किती तग धरते, तेच पाहत राहणे आपल्या हाती आहे. ते पाहण्याआधीच या जन्मी तरी निदान डोळे मिटावेत हीच इच्छा!

केवळ उदयनिधीच हे म्हणतोय का?


मंगळवार दि. १२ मे रोजी तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून आपले पहिले भाषण करताना उदयनिधी स्टॅलिनने त्याच्या जुन्या विधानाचाच पुनरुच्चार केला आहे. ‘सनातन धर्म हा नक्कीच नष्ट केला पाहिजे’, असे जे तो काल म्हणाला तेच त्याने ‘सनातन निर्मूलन परिषदे’त २०२३मध्ये म्हटले होते. सनातन हा डेंग्यू, मलेरिया आहे; त्यामुळे त्याला नष्ट केलेच पाहिजे असे तो म्हणाला होता. आता डेंग्यू मलेरिया थेट नष्ट करता येत नाही, त्यासाठी तो पसरवणारे डास मारावे लागतात. सनातन नष्ट करण्यासाठी सनातन धर्माचे वाहक, मानणारे मारावे लागतील, हा थेट इशारा होता. त्यामुळे, त्याला जे म्हणायचे होते तो थेट हिंदूंचा नरसंहारच होता; अन्य काहीही नव्हते. पण, निर्णय देणाऱ्या न्यायालयास ते तसे काही वाटलेच नाही. ‘तो जे बोलला होता ते ‘हेट स्पीच’ आहे व त्यासाठी तो दोषी आहे’ हेही आजतागायत न्यायालयाने मान्य केले नाही.

हिंदू म्हणजे सांप्रदायिक, अत्यंत नीच, घाणेरडा, अविकसित, सुधारणा न झालेला किंवा मान्य नसलेला समाज आहे, हे भारतीय राज्यघटनेचे अलिखित मत आहे. केवळ राज्यघटनेचेच नव्हे तर त्याअंतर्गत झालेल्या कायद्यांचे, कायदा करणाऱ्यांचे आणि त्याचे पालन करावयास लावणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचेही तेच अलिखित मत आहे. एवढेच कशाला, भारतीय शिक्षणव्यवस्थाही तेच मानते.

राज्यघटनेस केवळ सामाजिक सुधारणा अपेक्षित असती, तर कलम २५ (२ ब)मध्ये ‘हिंदू’ हा शब्दच आला नसता. 'सामाजिक सुधारणा' या गोंडस नावाखाली सरकारला हिंदू संस्थांमध्ये बदल करता आले नसते. कायद्याबाबत बोलायचे झाल्यास हिंदू वगळता अन्य एकाही पर्सनल लॉ बोर्डाचा एकही कायदा आजतागायत संपूर्णपणे कोडिफाय झालेला नाही. अगदी लग्नाचे वय ठरवणारा कायदाही मुस्लीम पर्सनल लॉ रद्दबातल ठरवत नाही. असे असंख्य कायदे आहेत जे लागू होतात असेही ठामपणे म्हणता येत नाही आणि लागू होत नाहीत, असेही ठामपणे म्हणता येत नाही. यालाच ‘ग्रे एरिया’ म्हणतात. हा इतकी वर्षे मुद्दाम ‘ग्रे’ ठेवण्यात आला आहे. हिंदूंचे सरळ ब्लॅक आणि व्हाईट करून टाकले आहे.

शिक्षणात सामाजिक त्रुटी सांगताना बालविवाह, केशवपन वगैरे हजारो गोष्टी केवळ हिंदू धर्माबद्दल घृणा व नकारात्मक भाव निर्माण करणाऱ्या शिकवल्या जातात. आजही मुस्लिमांत बालविवाह आहे व तो कायदेशीर आहे, हे शिकवले जात नाही.

अशा असंख्य गोष्टी आहेत, ज्या माध्यमातून सनातन हिंदू धर्म संपवण्याचे काम स्वतंत्र भारतातील लोकशाहीने पद्धतशीरपणे केले आहे व करत आहे. समता, समानता ही शस्त्रे त्यासाठी प्रभावीपणे वापरली जात आहेत. उदयनिधी तेच थेट मांडले होते व काल पुन्हा मांडले आहे. तो किमान थेट बोलण्याची हिंमत दाखवतो, भारतीय लोकशाही तीही दाखवीत नाही. उदयनिधीसारख्या लोकांसाठी हिंदू हा कुत्र्याच्या मौतीने मरण्यायोग्य किंवा किड्यामुंग्यांप्रमाणे संपवण्यायोग्य समाज आहे. प्रश्‍न त्याचा किंवा लोकशाहीचा नाहीच. प्रश्‍न आहे तो हिंदूंचा.

हिंदू स्वत:स काय समजतात, हा खरा प्रश्‍न आहे!

जगभरातील संस्कृतींना अवघ्या काही वर्षांत जमीनदोस्त करणाऱ्या ख्रिश्‍चनिटीला व इस्लामला सनातन वैदिक हिंदू धर्म संपवता आला नाही व इतकी वर्षे लोकशाहीसही ते जमले नाही. जगभरात केवळ एकच शक्ती हिंदू धर्माला संपवेल, ती म्हणजे स्वत: हिंदू. त्यामुळे, हिंदू स्वत:स काय समजतात या प्रश्‍नाच्या उत्तरावरच हिंदूंचे अस्तित्व टिकणे किंवा संपणे अवलंबून आहे.

वर्तमानपत्रात सर्वांत कमी काय वाचले जाते, अग्रलेख??

वर्तमानपत्रात सर्वांत कमी काय वाचले जाते, अग्रलेख??

परवाच एक मित्राने विचारले,

‘तुला माहिती आहे का, की वर्तमानपत्रात सर्वांत कमी काय वाचले जाते?’
‘नाही.’
‘काय? तुला माहीत नाही? पत्रकार ना तू! (हे एक अत्यंत अवघड प्रकरण आहे. पत्रकाराला सगळे माहीत असलेच पाहिजे असा या लोकांचा आग्रह. पत्रकार असण्याचा मानही, अपमान करण्यासाठीच दिला जातो.)
शरणागती पत्करत म्हटले, ‘नाही बाबा, खरेच माहीत नाही. तू सांग.’
तो म्हणाला, ‘अग्रलेख’
‘काय?’ मी उडालोच.
कुठल्या तरी सर्व्हेची कसली तरी आकडेवारी तोंडावर फेकत तो विजयी चेहर्‍याने विचारता झाला, ‘कळालं?’

त्याच्या डेटाने पुरवलेल्या ‘शास्त्रीय’ माहितीपुढे माझ्यासारख्या प्रतिगाम्याने वाद घालण्यात काही अर्थ नव्हता. गप्प बसलो.

हे आकड्यांचे खेळ करून आपल्याला हवे ते म्हणणे रेटण्याचा ‘साइंटिफिक’ खेळ अनेक ठिकाणी खेळला जातोय. हेच निकष लावायचे तर डॉन ब्रॅडमन, सुनिल गावस्कर, सचिन तेंडुलकर वगैरे फलंदाज अतिशय निकृष्ट दर्जाचे ठरतील. कायम शेवटी खेळायला येणारा फलंदाज, जो कमी चेंडू खेळून जास्त - म्हणजे चारपाच - धावा काढतो, तो सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरेल. अंक किंवा आकडे हे कमीत कमी कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी आंघोळ करणार्‍या नव्यानेच यौवनात प्रवेश केलेल्या मदालसेसारखे असतात; ते जे दाखवतात ते आकर्षक असते, लपवतात ते महत्त्वाचे असते!
अग्रलेखाचे महत्त्व तो किती लोक वाचतात, यावर ठरूच शकत नाही. अग्रलेख ही वर्तमानपत्राची भूमिका असते आणि दररोज घ्यावी लागते. ज्याला ‘बिटविन द लाइन्स’ म्हटले जाते ते प्रखरपणे सांगावे लागते. ते संपादकाचे वैयक्तिक मत नसते, ते वर्तमानपत्राचे मत असते. एखादा संपादक उजव्या विचारांचा असला, आणि वृत्तपत्र डाव्या विचारसरणीकडे झुकणारे असले; तरी त्याला स्वत:चे मत मांडता येत नाही. त्यासाठी त्याने वेगळा लेख लिहिला तरी चालतो; पण, अग्रलेखात ते घुसडणे पाप असते.

‘एखादी महत्त्वाची गोष्ट घडली तरच अग्रलेख लिहावा, अन्यथा लिहूच नये’ हा विचारच चुकीचा आहे. घटनेची बातमी होताना, त्यात हेतू किंवा भूमिका येता कामा नये. ती अग्रलेखात येणे अवश्यमेव असते. हडफड्यात घडलेल्या अग्नितांडवाची बातमी अग्रलेखापेक्षाही विस्तृत व जास्त माहिती देणारी असते. पण, त्यामागचा विचार, मत मांडण्याचे काम अग्रलेखाने करावयाचे असते. ते सर्वांसाठी असते. सामान्य वाचकांपासून सरकारपर्यंत सर्वांना त्यात घटनेचा बोध असतो.

लता मंगेशकर यांच्या स्वरकारकिर्दीस पंचवीस वर्षे झाली तेव्हा, त्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या, लेखही छापून आले. पण, ‘मराठा’मध्ये त्या दिवशी आचार्य अत्रे यांचा जो अग्रलेख आला होता त्याला तोड नाही. शीर्षकापासूनच सुरुवात, ‘स्वरलता’! अग्रलेखाची सुरुवातच वाचण्यासारखी व लता मंगेशकर म्हणजे काय याचे मूर्तिमंत शब्दरूप साकारणारी होती. ‘पक्ष्याचं कूजन, वाहणारा झरा, मोराचं नृत्य, पहिल्या पावसातल्या मातीचा गंध, यांना विशेषण लावण्याच्या फंदात पडू नये. त्याचप्रमाणे सच्चा प्रामाणिक सूर, याला फक्त ‘लता’ म्हणावं. अतिपरिचयानेसुद्धा ज्याची अवज्ञा झाली नाही, अशी एकच गोष्ट म्हणजे लताचा निखळ, मुक्त सूर!’ असा प्रारंभ केल्यानंतर अग्रलेखात पुढे मानवी ध्वनिसिद्धीच्या प्रांतातील अद्भुत चमत्कार असलेल्या लतादीदीच्या कंठाची मुक्तकंठाने स्तुती करताना अत्रे लिहितात, ‘उर्वशीच्या नुपूरांची रुणझूण, सरस्वतीच्या वीणेचा झंकार आणि कृष्णाच्या मुरलीची साद, हे सर्व एकवटून साक्षात विधात्यानेच लताचा कंठ घडवलेला असावा!’ लताच्या मृदू कंठाचे अभिवादन केवळ अग्रलेखातच होऊ शकते, वर्तमानपत्रातल्या अन्य कुठल्याही जाड्याभरड्या रकान्यात होऊच शकत नाही. प्रत्येकाची आपली जागा असते व ती तिथे, तशीच सांभाळायची असते!
आजतागायत असंख्य संपादकांनी लिहिलेल्या अग्रलेखातील शब्दसंचितांचे मूल्य कोण किती वाचतो, या आकड्यांत ठरवणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ‘वाचकांचे खिळलेले लक्ष’ हा निकष लावायचा, तर उत्तान, मादकतेने मुसमुसलेल्या अर्धनग्न युवतीच्या भिजलेल्या स्तनाग्रांवरही नजर खिळते, खिळून राहते; पण मग तो ‘हैदोस’ छापायचा का वर्तमानपत्रात? मटक्याचे आकडे छापावे लागतात म्हणून राजीनामा देणारे दिव्य दृष्टी लाभलेले संपादकही पाहिले आहेत आणि कुणीही न सांगता पहिल्या पानावर थेट माफी मागून संपूर्ण अग्रलेखच्या अग्रलेख मागे घेणारे दळभद्री संपादकही पाहिले आहेत. हा गुणदोष त्या संपादकांचा असला, तरी त्यामुळे अग्रलेखांचे महत्त्व यत्किंचितही कमी होत नाही, होणार नाही!

जाहिरात, वितरण या क्षेत्रातली माणसे बातम्यांचे महत्त्व व जागा ठरवू लागल्यापासून वर्तमानपत्रांची पत ढासळत चालली आहे, हे उघड सत्य आहे. या ढासळत चाललेल्या प्रतिष्ठेला कुणी सावरून धरत असेल तर तो अग्रलेख! दहा पैशाच्या दहा चिल्लर गोष्टींनी कदाचित गल्ला भरणारा रुपया होत असेल; पण बंदा रुपया हा शेवटी बंदा रुपयाच असतो. अग्रलेख हा त्या बंद्या रुपयासारखा असतो, त्याचे किंमत चिल्लरीत करू नये!

हे सगळे त्या मित्राला समजावणे आणि त्याने समजणे, दोन्ही कठीणच होते. ‘स्वत:स पत्रकार म्हणवून घेतात, खुर्च्या तापवतात आणि काडीचीही अक्कल नसते, माहिती नसते’, असे मनातल्या मनात म्हणत तो ‘जितं मया’च्या आविर्भावात निघूनही गेला होता. अस्मादिक कायम हरलेल्या चेहर्‍याने त्याची पाठमोरी आकृती पाहत हताश उभे होते.

मंगळवार, ५ मे, २०२६

गोव्यातील मंदिरे व त्यांचे ब्राह्मणीकरण, संस्कृतीकरण

ची जागा हक्काने घेतल्यापासून अन्यायाची जाणीव वाढीस लागली. देवस्थानी किंवा निसर्गस्थानी पाया पडण्यासाठी न जाता हक्क गाजवण्यासाठी माणसे जाऊ लागली.  देव आपल्या भक्तीसाठी आणि देवस्थान सांस्कृतिक जबाबदारीसाठी आहे, असे न वाटता; ज्यांना देव हा पहिल्या मानाच्या पूजेसाठी आणि देवस्थान हे व्यवस्थापनाचा, मालकीचा हक्क गाजवण्यासाठी आहे असे वाटते, त्यांचे देव लवकर भले करो! पुढील काळात देवाला देवळात न जाता बाहेरूनच नमस्कार करण्याची ‘पाळी’ आणण्याचे काम न्यायालयीन पातळीवर सध्या जोरात सुरू आहे. त्यांना यश आल्यास खरोखरच देवाला बाहेरूनच नमस्कार करावा लागेल. मग, ती ‘महाजनकी’, ‘बहुजनकी’, ते अन्याय-अत्याचार यांना काहीच अर्थ उरणार नाही. केवळ हक्कांची जाणीव असलेलेच देवस्थानात उरतील, जबाबदारीची जाणीव असलेले बाहेरूनच नमस्कार करतील!

हा लेख लिहायला घेतला तोवर कुठल्या देवळात कोण महाजन आहेत व का आहेत, हा विचार कधी डोक्यात आलाच नाही. देव महत्त्वाचा, तिथे जाऊन त्याचे दर्शन घेणे महत्त्वाचे आहे. देव तिथे आहे, म्हणून ते देवस्थान इतकेच देवस्थानाला महत्त्व देत आलो. अनेक देवळे अशी आहेत, जिथे एकदा जाऊन आलो, तिथे पुन्हा कधीच पाऊलही टाकणार नाही. बाहेरूनच नमस्कार! कारण, तिथे चाललेले प्रकार शास्त्र सोडूनच द्या, श्रद्धेलाही पायदळी तुडवणारे होते. 

लहान स्वरूपात असलेली देवळे ही गावाची केंद्रस्थाने होती. ती प्रत्येकाची जबाबदारी होती. देवळात प्रवेश नसला तरी तो अन्याय वाटत नसे. देवाला आपल्यासाठी बाहेर यावे लागते याचे दु:ख असे. ‘देव काय तो या एकाच देवळात आहे’, अशी भावना कधीच नव्हती. देवळेही वेगवेगळी होती. ग्रामदेवता, कुलदेवता अशी साधारण झोपडीवजा देवळांची विभागणी होती. बाकी राखणदार, क्षेत्रपाल, निसर्गदेवता या उघड्यावरच असायच्या. त्यांना देवळे नव्हती आणि खरे सांगायचे तर असूच नयेत. राखणदार हा फिरताच हवा, त्याला बंदिस्त करणे अयोग्य आहे. सीमा संपेपर्यंत तो आपले रक्षण करत येतोय, ही भावना तिथून जाणार्‍या प्रत्येकाची असे. दगड, वारूळ या निसर्गरूपात पुजण्यापासून ते मूर्तीरूपात पुजणे हा एकाच संस्कृतीचा भाग होता व आहे. 

जबाबदारीची जागा हक्काने घेतल्यापासून अन्यायाची जाणीव वाढीस लागली. देवस्थानी किंवा निसर्गस्थानी पाया पडण्यासाठी न जाता हक्क गाजवण्यासाठी माणसे जाऊ लागली. पहिले दर्शन घेण्याचा, पहिली पूजा करण्याचा मान महत्त्वाचा ठरला. देवापेक्षाही देवस्थानाला नको इतके महत्त्व प्राप्त झाले. आपले हक्क प्रस्थापित करणे गरजेचे ठरले. अनेक देव जे स्थलांतरित झाले, त्यांची देवळे सुरुवातीस झोपडी किंवा लहान घरांसारखीच होती. कवळे, म्हार्दोळ, मंगेश ही देवस्थानेही तशी लहानच होती. वतने मिळवून, आर्थिक व राजकीय वजन वापरून देवळे भव्य बांधली. ज्यांनी त्यांची पुनर्स्थापना मोठ्या प्रमाणात केली, त्यांचा दबदबा तिथे राहिला. पुढे ‘मझानिया’अंतर्गत त्यांनी आपले वर्चस्व व हक्क अबाधित राहील, अशी सोय राजकीय व वैयक्तिक वजन वापरून केली. यात एक सूक्ष्म फरक व कारण आहे, जे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

गोव्यातील सर्वांत प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांमध्ये सारस्वतांची महाजनकी आहे. यातही कुळावी असलेले सर्व सारस्वत महाजन नाहीत. प्रामुख्याने वत्स, कौशिक आणि भारद्वाज या गोत्रांतील सारस्वतच महाजन आहेत. इतर सारस्वत नाहीत आणि अन्य जातीचेही कुणी नाहीत. असे फक्त सारस्वतांनीच केले आहे का, तर तसेही नाही. श्रीशांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्थानात १२ क्षत्रिय कुळे महाजन आहेत. तिथे अन्य क्षत्रिय कुळांना व अन्य कुणासही महाजन होण्याचा अधिकार नाही. गोव्यातील एकूण साधारण ४५० मंदिरांपैकी, ५०च्या आसपास मंदिरे सारस्वतांच्या व्यवस्थापनाखाली आहेत. उर्वरित ४००हून अधिक मंदिरे ही बहुजन, क्षत्रिय मराठा, दैवज्ञ (शेट), देसाई आणि इतर हिंदू समुदायांची आहेत. या सर्व मंदिरांमध्ये तोच ’मझानिया’ नियम लागू होतो आणि ज्या कुळांनी/कुटुंबांनी मंदिराची स्थापना किंवा पुनर्स्थापना केली, त्यांच्याकडेच प्रशासकीय हक्क (महाजनकी) राहतात. त्यामुळे, तो अन्य लोकांवर, जातींवर अन्याय आहे, अशी भूमिका मांडणे व त्याचे सार्वत्रिकीकरण, सरसकटीकरण करणे चुकीचे आहे. 

काही देवस्थानांच्या महाजनकीत व जमिनींत स्वजातीयांची नावे घुसडण्याचे काम सारस्वतांनी केले आहे, यात काहीच वाद नाही. पण, तो नियम सरसकट देवळांसाठी लावणे चुकीचे ठरेल. प्रत्येक देवस्थान सुटे सुटे घेऊन त्याचा अभ्यास करणे व मांडणी करणे गरजेचे आहे. कुलदेवतेची, ग्रामदेवतेची, स्थानदेवतेची, निसर्गदेवतेची व आधुनिक काळात बांधलेली इष्टदेवतेची मंदिरे अशी त्याची विभागणी करणे गरजेचे आहे. 

मंदिरांबाबत थेट ‘सारस्वतीकरण’ असा शब्द ज्यांना वापरायचा नव्हता, त्यांनी त्याला ‘ब्राह्मणीकरण’ म्हटले. त्यालाच पुढे ‘सांस्कृतिकीकरण’ म्हटले. त्यासाठी ढेरे, भागवत, कोसंबी यांचे दाखले दिले; ज्यांनी या सर्वांची विभागणी शोषक-शोषित या दृष्टिकोनातूनच केली. एकाच संस्कृतीची वेगवेगळी रूपे अशी त्याची वास्तविक मांडणी त्यांनी केली नाही. त्यामुळे, आता ज्याला ‘सांस्कृतिकीकरण’ म्हटले जाते ते कुठल्या तरी उपर्‍या संस्कृतीने केलेले आक्रमण आहे, अशा पद्धतीने ते मांडले जाते. साम्यवादी, समाजवादी विचारांचा पगडा असलेल्या संशोधकांनी जी पाचर मारली, तीच आता पुढे मंदिरे तोडण्यात आणि फोडण्यात उपयोगी पडत आहे. ज्या ‘सांतेर’ या निसर्गदेवतेची मूर्ती आधुनिक काळात झाली, ती कुणी केली? बोडगिणीतल्या अमूर्त देवाला ‘राख रे बाबा’ म्हणत दिवा लावला जायचा, त्याचे मूर्तीरूप व देवस्थान कुणी केले? 

जसे ग्रामीण भागाचे शहरीकरण होताना जे जे बदल होते गेले, तसेच बदल निसर्गदेवतांचे मूर्तीत रूपांतरण होत गेले. जशी त्याची मांडणी केली जाते, तसा हा नंतर आलेल्यांनी आदिवासींवर केलेला अन्याय नव्हता. सांगायचेच झाले तर ज्याला आदिवासींचे मूलस्थान म्हणतात तिथे सांतेर नाहीच. तो एक वेगळा स्वतंत्र व वादाचा विषय आहे. त्याची मांडणी पुढे कधी तरी करेन. 

‘ब्राह्मणीकरण’, ‘संस्कृतीकरण’ हा विचार आता एका घातक वळणावर पोहोचलेला आहे. चर्च, मिशनरि यांच्याशी त्याची तुलना केली जात आहे. ती संस्कृती वेगळी, भिन्न व मूर्तीभंजनाचा जगभर इतिहास असलेली संस्कृती आहे. तिला अन्यायकारी, अत्याचारी म्हणायचे असेल तर मग रोईण किंवा वारूळरूपी सांतेर देवतेची मूर्ती झाली, भट व मंत्र आले यालाही अन्याय, अत्याचार म्हणा अशी ‘समांतर रेषा’ आखली जात आहे. एखादा वकील ‘तू करतोस तेच त्याने तुझ्या पत्नीसोबत केले याला बलात्कार म्हणावयाचे तर तू जे आपल्या पत्नीसोबत करतोस, त्यालाही बलात्कार म्हणावे लागेल’ असा तर्क देऊ लागला तर ते जितके अभद्र असेल तितकेच हेही आहे. 

प्रत्येक देवळाचा स्वतंत्र व वेगळा अभ्यास करून, त्यांची वर्गवारी करून नंतर एखाद्या विधानावर येणे योग्य ठरेल. ‘आदिवासींवर अत्याचार’ अशा पद्धतीने जे सरसकटीकरण केले जाते व त्यातून ख्रिश्‍चनिटीचे अत्याचार सौम्य करण्याचे प्रकार थांबलेच पाहिजेत. जे अशा विचारसरणीला पुढे ढकलतात, ते स्वत: दरवर्षी जांबावलीला जाऊन गुलाल उधळतात, हे लक्षांत घेतल्यास त्यामागचा ‘समाजवाद’ही कळतो. अशांनाच विठ्ठल हा ‘बहुजनांचा देवू’ वाटतो आणि बुद्धमंदिर पाडून विठ्ठलाचे मंदिर उभारल्याचा साक्षात्कारही होतो. 

देव आपल्या भक्तीसाठी आणि देवस्थान सांस्कृतिक जबाबदारीसाठी आहे, असे न वाटता; ज्यांना देव हा पहिल्या मानाच्या पूजेसाठी आणि देवस्थान हे व्यवस्थापनाचा, मालकीचा हक्क गाजवण्यासाठी आहे असे वाटते, त्यांचे देव लवकर भले करो! पुढील काळात देवाला देवळात न जाता बाहेरूनच नमस्कार करण्याची ‘पाळी’ आणण्याचे काम न्यायालयीन पातळीवर सध्या जोरात सुरू आहे. त्यांना यश आल्यास खरोखरच देवाला बाहेरूनच नमस्कार करावा लागेल. मग, ती ‘महाजनकी’, ‘बहुजनकी’, ते अन्याय-अत्याचार यांना काहीच अर्थ उरणार नाही. केवळ हक्कांची जाणीव असलेलेच देवस्थानात उरतील, जबाबदारीची जाणीव असलेले बाहेरूनच नमस्कार करतील!


मंगळवार, २८ एप्रिल, २०२६

लिखित पुरावा नाही, म्हणजे घडलेच नाही?

वाघ्रो, वाघेरी ही नावे आहेत, त्या भागात वाघ नाहीत. पण, कधी तरी ते होते म्हणूनच तर त्याला तसे नाव पडले. आता कुणी असे म्हणेल की ज्या अर्थी तिथे वाघ नाहीत, म्हणजे ते त्या गावाचे नावच नाही, तर कसे व्हायचे? त्याचप्रमाणे हात कात्रो खांबाजवळ हात कापल्याचा उल्लेखच कुठे नाही, म्हणजे तिथे हात कापलेच जात नव्हते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. लोकांच्या स्मरणात नावे त्या जागी घडलेल्या घटनांवरून भीतीने पडतात. त्याला कुठे लिहिलेले असो वा नसो.
गोव्यात अनेक ठिकाणी जाग्यांना 'मानशीर', 'बानार' असे म्हटले जाते. प्रत्यक्षात तिथे मानसही नसते आणि बांधही नसतो. आता तिथे बांध, मानस नाही म्हणून त्या जागेचे ते नाव असूच शकत नाही, असा तर्क कुणी देऊ लागले तर कुणीही ऐकून घेणार नाही. वाघ्रो, वाघेरी ही नावे आहेत, त्या भागात वाघ नाहीत. पण, कधी तरी ते होते म्हणूनच तर त्याला तसे नाव पडले. आता कुणी असे म्हणेल की ज्या अर्थी तिथे वाघ नाहीत, म्हणजे ते त्या गावाचे नावच नाही, तर कसे व्हायचे? त्याचप्रमाणे हात कात्रो खांबाजवळ हात कापल्याचा उल्लेखच कुठे नाही, म्हणजे तिथे हात कापलेच जात नव्हते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्या जागी घडलेल्या घटनांवरून व त्याची जबरदस्त भीती बसल्याने लोकांच्या स्मरणात त्या संदर्भातील नावे घट्ट राहतात. त्याला कुठे लिहिलेले असो वा नसो.

पेलोरिनो नोव्हो (Pelourinho Novo) हा खांब एका प्राचीन हिंदू देवळाचा भाग होता. स्तंभाच्या खालच्या भागावर कन्नड लिपीत "दयादंन्या" असे लिहिलेले आहे. हा शिवालयाचा खांब असावा. आता देवळाचा खांब पेलोरिनो नोव्हो कसा झाला याबाबत कुणीही सांगत नाही. देऊळ पाडून राहिलेल्या खांबाजवळ उभे राहून फर्माने देत असतील की शिक्षा देत असतील, हा तर्काचा भाग आहे. त्यातही पुन्हा पेलोरिनो वेल्हो (Pelourinho Velho) हा जुना स्तंभ बाजारपेठेजवळ होता.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा; पेलोरिनो नोव्हो नावाचा स्तंभ फक्त गोव्यातच होता का? नाही. दमण, दीव व कोचिन येथेही असे स्तंभ होते. पण, त्या स्तंभांना अशी शिक्षा दिल्याचा, जाळल्याचा, हात कापल्याचा संदर्भ असलेले नाव तिथे प्रचलित नाही. हात कातरो असे नाव फक्त गोव्यातच आहे. का? कारण तिथे फक्त आदेशच जाहीर केले जायचे व येथे हात कापले जायचे.

सोमनाथचे मोठे शिवलिंग फोडले, तोडले व त्याचे तुकडे दिल्लीतील जामा मशिदीच्या पायर्‍यांवर बसवले. का? येता जाता त्याला तुडवावे म्हणून. का? तर काफिरांविषयी व त्यांच्या देवांविषयी असलेली आत्यंतिक घृणा. तीच घृणा त्या पंथाचे नसलेल्यांविरुद्ध बाळगणारे ख्रिश्चन व पोर्तुगीज पाडलेल्या स्थानिकांच्याच देवळाच्या खांबाला बांधून स्थानिकांनाच शिक्षा देतील, हात कापतील की कायदेशीर व्यवहारांच्या आणि अधिकृत शासकीय घोषणा देतील याचा विचार तर्काने करावा लागतो.

सगळेच लिहिलेले नसते. लिहिलेले नाही, म्हणजे तसे झालेच नाही असे होत नाही.

रविवार, २६ एप्रिल, २०२६

अथातो संस्कृतिजिज्ञासा

आपली सनातन, वैदिक, हिंदू संस्कृती ही जगातील अनेक निसर्गपूजक संस्कृतींपैकी बहुधा एकमेव जिवंत संस्कृती आहे. आपली संस्कृती का टिकली, याचा विचार करताना जगातील संस्कृती कशा संपल्या, हे समजणे आवश्यक आहे. ते समजले, की मग ‘मिश्र संस्कृती’, ‘एकाच वेळी अनेक संस्कृती भारतात नांदत होत्या’, ‘गंगा-जमना तहजीब’, ‘विविधता मे एकता’, ‘सांस्कृतिक संलयन’ ही सगळी थोतांडे उघडी पडतात.

आपली सनातन, वैदिक, हिंदू संस्कृती ही जगातील अनेक निसर्गपूजक संस्कृतींपैकी बहुधा एकमेव जिवंत संस्कृती आहे. आपली संस्कृती का टिकली, याचा विचार करताना जगातील संस्कृती कशा संपल्या, हे समजणे आवश्यक आहे. ते समजले, की मग ‘मिश्र संस्कृती’, ‘एकाच वेळी अनेक संस्कृती भारतात नांदत होत्या’, ‘गंगा-जमना तहजीब’, ‘विविधता मे एकता’, ‘सांस्कृतिक संलयन’ ही सगळी थोतांडे उघडी पडतात. 

आपली ही निसर्गपूजक संस्कृती संपूर्ण भारतात एकच आहे; फक्त जागा, परिस्थिती, जीवनशैली याप्रमाणे त्यात बदल आहेत व ते स्वाभाविक आहेत. जे जंगलात राहणारा निसर्गात पाहतो, तेच नागरी भागात राहणारा गणपतीच्या मूर्तीत व वर बांधलेल्या माटोळीत पाहतो. निसर्गाची प्रत्येक तत्त्वे व नियम जे निसर्गाच्या एकदम जवळ असलेल्यांना समजले, सृष्टीच्या त्याच नियमांना ‘ऋत’ म्हणत वेदांत वैचारिक बैठक देण्यात आली. तत्त्वांचा आचरणात आणावे व ते टिकून राहावे म्हणून ऋषींनी दिनचर्येत नियम घालून दिले. ऋत व तत्त्व यांना जीवनाच्या प्रत्येक अंगाशी जोडले. साधे उदाहरण देतो; लग्नकार्यात देवक बसवताना प्रत्येक घराण्याचा एखादा वृक्ष किंवा वनस्पती पुजण्याची पद्धत आहे. अगदी जंगलात राहणारा हिंदू जे करतो, तेच नगरात राहणारा हिंदू करतो; कारण संस्कृती एकच आहे, ती जपण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. संस्कृती वेगवेगळ्या नाहीत, संस्कृती एकच आहे. सांतेर म्हणून जे वारूळ पुजले जाते ते वास्तविक त्या वारुळाच्या मातीचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. रक्त थांबवण्यासाठी शीर बंद करणे आणि दर्भ, मुंज, अश्वत्थ (पिंपळ), अर्जुन, अरुंधती, तेजना, लाक्षा (लाक), आणि वंश (बांबू) वनस्पतींसोबत वारुळाच्या मातीचे लेपन करावे असे अथर्ववेदातील आस्रावभैषज्य सूक्तात आहे. आज आपण देवावर पत्री म्हणून मिळेल त्या झाडाची पाने वाहतो; प्रत्यक्षात त्यांची नावे वाचल्यास त्या सर्व वनस्पती आहेत. ज्यांचे रक्षण नागर भागात राहणार्‍यांसाठी या मार्गाने करण्याची रीत ऋषींनी घालून दिली. जे ऋषींनी सांगितले ते ते सर्व कृषीत उतरले आहे. वेदांत एकही ऋचा किंवा मंत्र निसर्गाविरुद्ध नाही. जे निसर्गात राहून माणूस जपायचा तेच यज्ञातून जपले गेले, तेच मूर्तीपूजेतून जपले जाते. वडाची पूजा हे काही नवर्‍याचे सात जन्मांचे बुकींग नाही; पण ते कर्मकांड आहे, म्हणून हजारो वर्षे वृक्षांचे जतन झाले. जातवार देवांची विभागणी केल्यानंतर इतर लोक कुठे देवचार, खेत्री, सिद्ध, ब्रह्मा पुजतात असा प्रश्न आदिवासी व अन्य समाज यातील भेदभाव दाखवण्यासाठी विचारला जाऊ लागला. कुळागरे व शेती असणारे ब्राह्मणदेखील देवचारा रोट ठेवतात. सिद्धा, ब्रह्मा यांची पूजा बांधतात, हे विचारात घेतले नाही. एका व्यवसायातले, एका भागातले, एका समाजातले लोक सर्वसाधारण एकाच पद्धतीची निसर्गपूजा करतात. कारण ते एकाच संस्कृतीचे पाईक आहेत. 

एकाच वेळी एकाच संस्कृतीचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या मार्गाने आपली संस्कृती जतन करतात हे सांगण्याऐवजी सगळ्या साम्यवादी, समाजवादी, पुरोगामी विचारवंतांनी हे सांगायला सुरुवात केली, की आदिवासी इथले मूळ निवासी आहेत. त्यांच्यावर सांस्कृतिक व भौगोलिक आक्रमण झाले. त्यांच्या लोकदैवतांचे वैदिकीकरण झाले. आता तर त्यासाठी अनेक दृष्टींनी सोयीचा असलेला ‘ब्राह्मणीकरण’ असा शब्द वापरला जातो. याची सुरुवात ख्रिश्‍चन मिशनर्‍यांनी केली असली तरी त्याचा प्रचार व प्रसार कोसंबी, ढेरे, बाबर, मांडे, भागवत यांसारख्या साम्यवादी, समाजवादी विचारांचा पगडा असलेल्या संशोधकांनी केली. त्यांना थेट त्या वैचारिक धारणेत न ढकलता आजकाल ‘समन्वयवादी’ म्हटले जाते. यातल्या कुणालाच ही संस्कृती एकच आहे, हे माहीत नव्हते का? निश्‍चितच होते. पण, या एकाच संस्कृतीचे वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी होणारे पालन त्यांनी ‘शोषक’ आणि ‘शोषित’ या चष्म्यातून पाहिले. संस्कृती एकच आहे, असे म्हटले तर त्यांच्या विचारधारेस बाधा येत होती, हे त्यांना नेमके ठाऊक होते. 

जगात सर्वत्र आपल्यासारख्या ज्या निसर्गपूजक संस्कृती होत्या त्या त्यांच्यातले कच्चे दुवे शोधून संपवण्यात आल्या. काही ठिकाणी निसर्गपूजा व्हायची; - सूर्यमंदिरे अनेक ठिकाणी होती - पण, सर्वांजवळ आपल्या संस्कृतीत आहे तशी एकसंध वैचारिक बैठक तेवढी प्रगल्भ नव्हती. 

‘जेव्हा मिशनरी आफ्रिकेत आले, तेव्हा त्यांच्याकडे बायबल होते आणि आमच्याकडे जमीन होती. ते म्हणाले, ’चला आपण प्रार्थना करूया.’ आम्ही आमचे डोळे मिटले. आणि जेव्हा आम्ही डोळे उघडले, तेव्हा आमच्या हातात बायबल होते आणि त्यांच्याकडे आमच्या जमिनी होत्या’, असे जे डेस्मंड टूटो म्हणतात तो एक प्रकार झाला. 

भारतात त्यांनी वापरलेला व प्रभावी ठरलेला मार्ग म्हणजे 'आर्यन इन्व्हेजन'. ते खोटेच होते व ते आता सिद्ध होऊ लागले तशी  तेच 'आर्यन मायग्रेशन' म्हणून खपवले जात आहे.  शिक्षणातून असे काही बुद्धिभेद पेरले, की त्यानंतरच्या अनेक विचारवंत त्यातूनच जन्मले. तोच वारसा पुढे साम्यवादी, समाजवादी, पुरोगामी आणि कल्चरल मार्क्सवाद्यांनी त्याहीपेक्षा जास्त प्रभावीपणे वापरला. 


आपल्या संस्कृतीविषयी अभिमान जागृत व्हावा, अशी कुठलीच सोय शिक्षणपद्धतीत अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही नव्हती. उलट जिथे कुठे भेद करता येईल तिथे तो करण्याची आणि वाढत ठेवण्याची पुरेपूर सोय होती. मुसलमानी आक्रमणे झाली तेव्हा ती तलवारीच्या जोरावर इस्लामीकरणापुरती मर्यादित होती. त्यात मुसलमान हो, मर किंवा काफिर राहण्याचा कर दे इतका तो सरळ मामला होता. चर्च किंवा ख्रिश्‍चनिटी यांनी सुरुवातीस जगभर तेच केले. पण, जगभरातला अनुभव व भारतातला अनुभव यात त्यांना खूप फरक आढळला. इथे केवळ निसर्गपूजा नव्हती तर किमान पंधरा ते पंचवीस हजार वर्षांपूर्वीपासून चालत आली वैचारिक बैठक होती. संस्कृती वैचारिक बैठक जेव्हा समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात झिरपते तेव्हा तिला नष्ट करणे सोपे नसते. ती नष्ट करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबावे लागतात. 

म्हणून परस्पर पूरक व परस्परांवर अवलंबून असलेल्या जातींना एकमेकांविरुद्ध उभे केले. त्यांची सामाजिक उतरंड व उच्चनीचतेचे वैचारिक भेद उत्पन्न केले. त्यासाठी असलेल्या कारणांचा यथेच्छ वापर करण्यात आला. जिथे वैयक्तिक राग होता तो जातिगत रागात कसा परिवर्तित होईल व तो कसा फुलत राहील याची व्यवस्थित सोय मिशनर्‍यांनी केली.  त्याच्यातला राजकीय सामाजिक लाभ ज्यांना समजला त्यांनी तेच हत्यार स्वातंत्र्यानंतरही वापरले. आदिवासी हे हिंदू संस्कृतीचाच भाग आहेत, हे पूर्णपणे माहीत असूनही केवळ मिळणारे लाभ, सुविधा हातच्या जाऊ नयेत म्हणून तसे विचार पसरवले जातात. जे खरोखरच आपली संस्कृती नाही, त्यांना ‘गंगा-जमना तहजीब’, ‘विविधता मे एकता’ आणि ‘मिश्र संस्कृती’ म्हणून हेच वैचारवंत पुढे करतात. जे एकाच संस्कृतीचे आहेत, त्यांच्यात भेद करायचा आणि जे नाहीत त्यांना मिश्र संस्कृती म्हणत एकत्र आणायचे, हा उद्योग हे विचारवंत करतात. जातिभेद संपवण्याच्या नावाखाली राजकारणी तोच पोसतात. जात ही ज्या संस्कृतीची आणि धर्माची(रिलिजन नव्हे) ओळख नाही, तिला मोठे करून यांनी अन्याय केला, त्यांनी वंचित ठेवले वगैरे म्हणत तेच काम करतात. इतकी वर्षे अन्याय केला म्हणत तो निस्तरण्यासाठी पुन्हा तोच अन्याय करतात आणि त्याला ‘सामाजिक न्याय’ म्हणतात. राज्यघटना केवळ हिंदू धर्मात बदल करण्याची मुभा देते. त्याचा अर्थ एक तर हिंदू संस्कृतीत व धर्मात बदल करण्याची गरज आहे, ती परिपूर्ण नाही जशी ख्रिश्चनिटी व इस्लाम आहे. न्यायव्यवस्थेसही जो भेदभाव हिंदू धर्मात दिसतो तो अन्य पंथांत दिसत नाही. आपली संस्कृती, धर्म  संपवणे इस्लामला व ख्रिश्चनिटीला इतकी हजारो वर्षे प्रयत्न करूनही जमले नाही, ते काम आपल्या लोकशाहीचे तीनही स्तंभ प्रभावीपणे करत आहे. स्वयंघोषित चौथा स्तंभ तेच काम ‘चोवीस तास’ करत आहे. तरीही जिवंत असलेल्या संस्कृतीचा अभ्यास जाणिवेने, जिज्ञासेने व मुमुक्षू वृत्तीने केला नाही तर ही संस्कृती कधी ना कधी तरी संपेलच. अर्थात त्यासाठी आम्हीच जबाबदार असू. 

स्वत:च्या संस्कृतीवर झालेले बलात्कार, सांस्कृतिक एकत्रिकरण म्हणून स्वीकारणारा हिंदू समाज हा जगातील एकमेव समाज आहे. 



शुक्रवार, २४ एप्रिल, २०२६

चर्चसाठी मिलाग्रीस की मिराबाई?

चर्चसाठी मिलाग्रीस की मिराबाई?   हा फोटो पाहिला आणि सेक्युलरिजमच्या या अगाध ज्ञानाने मन भरून आले. लोकश्रद्धा, मान्यता यांच्याबद्दल काहीच म्हणणे नाही. मिलाग्रीस म्हणा किंवा मिराबाई म्हणा ती पावते, ही भाविकांची श्रद्धाच आहे. त्याबद्दल काही म्हणणे नाही.  पण, जे लोक या श्रद्धेला सेक्युलर करण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी तिला सेक्युलर चौकटीत बसवताना थोडा नीट विचार करावा.   बाटवलेल्या मिराबाईलाही ख्रिश्चनांसोबत पुजणे हा हिंदूंचा मोठेपणा आहे, ख्रिश्चनिटीचा नाही. आधी चर्चला अधिकृतपणे हे म्हणू द्या की या सहा बहिणी येशू ख्रिस्ताच्या मावश्या एक भाऊ मामा आहे. मग, या आणि हे सेक्युलर ज्ञान लोकांसमोर पाजळा.   स्वत:वर झालेल्या सांस्कृतिक बलात्कारास सांस्कृतिक संलयन मानणारा हिंदू समाज हा बहुधा जगातला एकमेव समाज असावा.   https://www.facebook.com/share/p/1J7ZMLL6vL/

हा फोटो पाहिला आणि सेक्युलरिजमच्या या अगाध ज्ञानाने मन भरून आले. लोकश्रद्धा, मान्यता यांच्याबद्दल काहीच म्हणणे नाही. मिलाग्रीस म्हणा किंवा मिराबाई म्हणा ती पावते, ही भाविकांची श्रद्धाच आहे. त्याबद्दल काही म्हणणे नाही.  पण, जे लोक या श्रद्धेला सेक्युलर करण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी तिला सेक्युलर चौकटीत बसवताना थोडा नीट विचार करावा. 

म्हापशात जिथे सप्तमातृकांपैकी मिराबाईचे मंदिर होते ते पाडून तिथे चर्च बांधण्यात आली. मिराबाईच्या जागी मिलाग्रीस सायबिणीची (मदर मेरी) स्थापना करण्यात आली. हिंदू भाविकांनी आपली श्रद्धा सोडली नाही, त्यांनी 'मिलाग्रीस' या नावातील 'मिरा' हा शब्द उचलला आणि तिला 'मिराबाई' म्हणून पूजणे सुरूच ठेवले. चर्चच्या नोंदीनुसार, १५९४ मध्ये फ्रान्सिस्कन मिशनरींनी तिथे 'सेंट जेरोम' (St. Jerome) चर्च बांधले. तिथे त्यांनी 'मदर मेरी'ची मूर्ती स्थापन केली, जिला 'मिलाग्रीस सायबीण' म्हटले गेले. चर्चच्या मते, तिथे कोणतीही हिंदू देवता नव्हती, तर त्यांनी एका नवीन कॅथोलिक धर्मस्थळाची स्थापना केली होती. म्हापशातील चर्चचे मूळ नाव पोर्तुगीजमध्ये 'Nossa Senhora de Todos os Bens' (सर्व आशीर्वादांची माता) असे होते. मात्र, तिच्याकडून अनेक चमत्कार (Miracles/Milagres) घडल्याने भाविक तिला 'मिलाग्रीस' म्हणू लागले. 

जरी ती मिलाग्रीस सायबीण झाली, तरी तिने तिच्या बहिणींशी असलेले नाते तोडले नाही. आजही शिरगावची लैराई देवी आपल्या बहिणीसाठी (मिलाग्रीस) फेस्ताच्या दिवशी तेलाचा माठ पाठवते आणि मिलाग्रीस सायबीण जत्रेच्या वेळी लैराईसाठी मोगऱ्याची फुले पाठवते. हे सारे लोकांच्या श्रद्धेतून घडते लोक सेक्युलर आहेत म्हणून नव्हे. 

हे सेक्युलर ऐकायला इतके बरे वाटते ना! काय विचारता! पण एकच गोम आहे, ती कुणी पुढे होऊन जरा निस्तरेल का? 

चर्चच्या (कॅथोलिक चर्च) अधिकृत धर्मशास्त्रात किंवा सिद्धांतांमध्ये (Doctrine) मिलाग्रीस सायबिणीच्या इतर सहा हिंदू बहिणींना धार्मिक मान्यता नाही. चर्चसाठी ती 'अवर लेडी ऑफ मिराकल' (Our Lady of Miracles) म्हणजेच येशू ख्रिस्ताची माता 'मरियम' (Mary) आहे, मिराबाई नाही. चर्चच्या धार्मिक विधींमध्ये तिला 'मिराबाई' असे संबोधले जात नाही. येशू ख्रिस्ताच्या या सहा मावशांना  व एका मामाला चर्चची अधिकृत मान्यता मिळवून देता का? 

बाटवलेल्या मिराबाईलाही ख्रिश्चनांसोबत पुजणे हा हिंदूंचा मोठेपणा आहे, ख्रिश्चनिटीचा नाही. आधी चर्चला अधिकृतपणे हे म्हणू द्या की या सहा बहिणी येशू ख्रिस्ताच्या मावश्या एक भाऊ मामा आहे. मग, या आणि हे सेक्युलर ज्ञान लोकांसमोर पाजळा. 

स्वत:वर झालेल्या सांस्कृतिक बलात्कारास सांस्कृतिक संलयन मानणारा हिंदू समाज हा बहुधा जगातला एकमेव समाज असावा. 

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

खट्टराचे काय करायचे?

गौतम खट्टर याने जे वक्तव्य केले त्यावरून वादंग माजलेले आहे. असे जेव्हा होते तेव्हा एक चुकीची गोष्ट सोबत आपोआप घडत जाते. ती म्हणजे; हिंदुत्ववादी आहात तर खट्टरचे समर्थन करा आणि नसाल किंवा ख्रिश्‍चन असाल तर त्याचा विरोध करा, ही विभागणी होते. खट्टर जे काही बोलला त्यातील किती बरोबर, किती चूक याचे विश्‍लेषण करायच्या भानगडीत कुणीच पडत नाही. त्यामुळे, निर्माण होते ती फक्त आणि फक्त झुंडशाही.   आक्रमकता आणि विचार मांडणे यात एक सूक्ष्म रेषा असते. ती ओलांडली की वक्ता अभद्रतेच्या दिशेने वाहवत जातो. ते मुळीच समर्थनीय असत नाही.

गौतम खट्टर याने जे वक्तव्य केले त्यावरून वादंग माजलेले आहे. असे जेव्हा होते तेव्हा एक चुकीची गोष्ट सोबत आपोआप घडत जाते. ती म्हणजे; हिंदुत्ववादी आहात तर खट्टरचे समर्थन करा आणि नसाल किंवा ख्रिश्‍चन असाल तर त्याचा विरोध करा, ही विभागणी होते. खट्टर जे काही बोलला त्यातील किती बरोबर, किती चूक याचे विश्‍लेषण करायच्या भानगडीत कुणीच पडत नाही. त्यामुळे, निर्माण होते ती फक्त आणि फक्त झुंडशाही. 

आक्रमकता आणि विचार मांडणे यात एक सूक्ष्म रेषा असते. ती ओलांडली की वक्ता अभद्रतेच्या दिशेने वाहवत जातो. ते मुळीच समर्थनीय असत नाही. अनेकदा जो मूळ मुद्दा (खरोखच वैध आणि सत्य) असतो त्याचीच हानी होते. भावनेला न दुखावताही सत्य मांडता येते. ते सत्य इतके प्रखर व नाकारता न येण्यासारखे असते, तिथे भावनांचे काहीही अस्तित्व उरत नाही. उलट, भावना असण्यावरच शंका उपस्थित होते. 

प्रान्सिस झेविअर ‘गोंयचो सायब’ किंवा संत नाही, हे सांगण्यासाठी त्याच्या पार्थिवाच्या अवशेषांची अवहलेना करण्याची काहीच गरज नव्हती. याची जाणीव झाल्यानंतर आयोजकांपैकी किंवा आमदार, मंत्री यांपैकी कुणी तरी चिठ्ठी पाठवून भाषण थांबवायला सांगितले. त्याचा उल्लेख खट्टरने केला, तेव्हा प्रेक्षकांतून बोलत राहण्याचा एक आवाज आला, तो अत्यंत चुकीचा होता. यासाठी खट्टर व तो आवाज देणार्‍—या दोघांचीही कठोर शब्दांत निंदाच योग्य आहे. त्याचे समर्थन होऊच शकत नाही. त्यासाठी जी शिक्षा खट्टरला मिळायला हवी, ती बिनदिक्कत दिलीच पाहिजे. कुठल्याच हिंदूने याबाबतीत खट्टरचे समर्थन करू नये.

फ्रान्सिस झेविअरच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी हिंदूंनी जाणे सर्वथैव चुकीचे आहे. हा मुद्दा जो खट्टरने मांडला तो योग्यच आहे. फ्रान्सिस झेविअर ना संत आहे, ना ‘गोंयचो सायब’ आहे. फ्रान्सिस झेवियरने १६ मे १५४५ रोजी पोर्तुगालचा राजा तिसरा जॉन याला पत्र लिहून गोव्यासाठी ‘इन्क्विझिशन’ची मागणी केली व त्याचाच परिपाक म्हणून ते पुढील पाच वर्षांत लादलेही गेले. 

‘मुलांना त्यांच्या पालकांसमोर फटके मारले जात आणि हळूहळू त्यांचे अवयव कापले जात; पालकांनी हे सर्व पाहावे याची खात्री करण्यासाठी त्यांच्या पापण्या कापून टाकल्या जात. शरीराचे हात-पाय अत्यंत काळजीपूर्वक कापले जात, जेणेकरून एखादी व्यक्ती केवळ धड आणि डोके शिल्लक असतानाही शुद्धीवर राहावी. पत्नींसमोर पुरुषांची जननेंद्रिये काढून जाळली जात, महिलांचे स्तन कापले जात आणि पतींना पाहायला लावून तलवारींनी त्यांच्या गुप्तांगावर वार केले जात... आणि हे सर्व दोनशे वर्षे चालले’.

(संदर्भ : पॉल विल्यम्स रॉबर्ट्स, द एम्पायर ऑफ द सोल: सम जर्नीज इन इंडिया, न्यूयॉर्क, १९९७.)

ख्रिश्‍चन करण्यासाठी व ख्रिस्ती झाल्यानंतर ख्रिश्‍चन राहण्यासाठी जो अमानुष, नृशंस नरसंहार झाला त्याची जबाबदारी आजही चर्च घेत नाही. झाडून सगळे विचारवंत त्याचे बिल पोर्तुगीज सत्तेवर फाडतात. शांततेतून आणि सेवेतून ‘शुभवर्तमाना’चा, ख्रिश्‍चनिटीचा प्रसार झाला, हे सांगायला चर्च मोकळी राहते. केवळ गोव्यातच नव्हे तर जगभरात तसे अजिबात घडले नाही. ख्रिश्‍चनिटी पसरली ती क्रौर्याच्या जोरावर.

राजा उन्नी केरळ वर्मा यांनी झेविअर यांना ’वलिया पाद्रे’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. राजाने दिलेल्या देणगीतून (सुमारे २००० पणाम - तत्कालीन चलन) झेविअरने कोल्लम आणि त्रावणकोरच्या किनारपट्टीवर सुमारे ४०-४५ चर्च बांधली. यात कोम्बुथुराई येथील सेंट स्टीफन्स चर्चचाही समावेश होता. हिंदू राजांकडून मदत आणि संरक्षण मिळाल्यानंतर, झेव्हिअरने जोरात ख्रिस्तीकरण आरंभले.  ते करताना त्याला काय वाटत होते याचे वर्णन तो स्वत: १५ जानेवारी १५४५ रोजी रोममधील आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात करतो. 

‘बाप्तिस्म्यानंतर, नवीन ख्रिस्ती लोक आपापल्या घरी परततात आणि नंतर त्यांच्या पत्नी व कुटुंबासह परत येतात जेणेकरून त्यांनाही बाप्तिस्म्यासाठी तयार करता येईल. सर्वांचा बाप्तिस्मा झाल्यानंतर, मी असा आदेश देतो की सर्वत्र खोट्या देवांची मंदिरे पाडून टाकावीत आणि मूर्ती फोडून टाकाव्यात. जे लोक पूर्वी या मूर्तींची पूजा करत असत, त्यांच्याच हस्ते त्या पाडल्या जाण्याचे आणि नष्ट करण्याचे दृश्य पाहून मला जो आनंद होतो, त्याचे वर्णन मी शब्दांत करू शकत नाही’.

मुलांना बाप्तिस्मा देऊन ख्रिश्‍चन करण्याबाबत, त्याने १५४३मध्ये रोममधील ’सोसायटी ऑफ जीझस’ला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो;

‘मला पूर्ण विश्वास आहे की, देवाच्या कृपेने ही मुले त्यांच्या वडिलांपेक्षा खूप सरस ठरतील. ती मुले ईश्वरी कायद्याबद्दल तीव्र प्रेम आणि आपला पवित्र धर्म शिकण्यासाठी व इतरांना शिकवण्यासाठी कमालीची उत्सुकता दाखवतात. मूर्तीपूजेबद्दलचा त्यांचा तिरस्कार विस्मयकारक आहे. ते या विषयावरून मूर्तिपूजकांशी वाद घालतात, आणि जेव्हा त्यांचे स्वतःचे आई-वडील मूर्तीपूजा करतात, तेव्हा ती मुले त्यांना दोष देतात आणि लगेच मला येऊन सांगतात. जेव्हा कधी मला मूर्तीपूजेच्या कोणत्याही कृत्याबद्दल समजते, तेव्हा मी या मुलांच्या मोठ्या टोळीसह त्या ठिकाणी जातो. ही मुले सैतानाचा (मूर्तीचा) इतका अपमान आणि विटंबना करतात, जितका सन्मान आणि पूजा अलीकडे त्यांच्या पालकांनी, नातेवाईकांनी आणि ओळखीच्या लोकांनी केली नसेल. ही मुले मूर्तींकडे धावत जातात, त्या उलथवून टाकतात, खाली आदळतात, त्यांचे तुकडे करतात, त्यांच्यावर थुंकतात, त्यांना तुडवतात, लाथा मारतात आणि थोडक्यात सांगायचे तर, शक्य तितका अपमान करतात’.

(संदर्भ : जोसेफ विकी, डॉक्युमेंटा इंडिका, खंड ४, रोम, १९५६.)

एक माणूस म्हणूनही फ्रान्सिस झेविअरची काय योग्यता होती, त्याने स्वत:च लिहिलेल्या पत्रांवरून समजते. संत आणि सायब होणे दूरच राहिले. फ्रान्सिस झेविअरला संत म्हणणतात किंवा त्याच्या पार्थिव दर्शनासाठी ख्रिस्ती येतात, हा त्यांच्या पंथाचा व श्रद्धेचा भाग आहे. पण, हिंदूंनी त्याच्या पार्थिवाचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी जाणे चुकीचेच आहे. त्याही पुढे जाऊन तो आपल्याच पूर्वजांचा आपण केलेला घोर अपमान आहे. इतके अन्याय अत्याचार सहन करूनही जे ख्रिस्ती झाले नाहीत, त्यांच्या हिंदू धर्मावरील श्रद्धेचा अपमान आहे. 

सोमवार, २० एप्रिल, २०२६

हिंदू धर्म संपवण्याच्या फॅक्टर्‍या...

ख्रिश्‍चनिटी व इस्लाम यांनी पंथप्रसार करण्याचे मध्ययुगीन धोरण केव्हाच बदलले आहे. आधुनिक काळात त्यासाठी पुरोगामी, सेक्युलर लोकशाहींचा यथेच्छ वापर करून घेतला जातो. त्याच पद्धतीने सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा वापर करून घेतला जात आहे.

‘कॉर्पोरेट जिहाद’ असे शब्दप्रयोग करणे, लेन्स्कार्टच्या कर्मचार्‍यांना जाऊन टिळे लावणे यावर समाधान मानल्यास आपण एका मोठ्या संकटाकडे साफ दुर्लक्ष करत आहोत. केवळ टीसीएस, लेन्सकार्ट अशा नव्हे तर जवळपास हजारो मोठ्या कंपन्या ख्रिस्तीकरण व इस्लामीकरण यांच्या जाळ्यात अडकल्या आहेत व त्यातून सुटण्याचा मार्ग सध्या तरी उपलब्ध नाही. एक तर या कंपन्या बंद कराव्या लागतील किंवा काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अन्य पर्याय नाही. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपन्यांसाठी एक संस्थागत यंत्रणा, मानांकने उभी करण्यात आली आहेत, त्यांपैकी एक म्हणजे ईएसजी - एन्व्हिरोन्मेंटल, सोशल, गव्हर्नन्स(पर्यावरण, सामाजिक आणि सुशासन) - नामक एक रचना किंवा फ्रेमवर्क. कंपन्यांना वाढीसाठी व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार मिळण्यासाठी काही मान्यता व रेटिंग असणे गरजेचे आहे. गुंतवणुकदार कुठल्याही कंपनीत हे ईएसजी रेटिंग पाहून गुंतवणूक करते व कंपनीची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होते. यात जो मधला ‘एस’ आहे तो फार घातक आहे. 

या ‘एस’ म्हणजे सोशलमध्ये ‘रेडी इंडेक्स’ हे मानांकन ठरवण्याची जबाबदारी एका संस्थेला देण्यात आली आहे, तिचे नाव आहे  ’रिलिजियस फ्रीडम अँड बिझनेस फाउंडेशन’. ही ब्रायन ग्रिम या माणसाची संस्था आहे जो ‘पॉन्टिफिकल काउन्सिल फॉर सोशल कम्युनिकेशन्स’ या कॅथलिक चर्चच्या म्हणजेच व्हॅटिकनच्या अधिकृत परिषदेचा सल्लागार होता. त्याच्या ’रिलिजियस फ्रीडम अँड बिझनेस फाउंडेशन’ला व्हॅटिकन आणि अनेक कॅथलिक संस्थांचा पाठिंबा आहे.  जेव्हा अशी व्यक्ती जागतिक स्तरावर ’धार्मिक समावेशकता’ ठरवते, तेव्हा ती अब्रह्मिक, ख्रिस्ती पंथाचा प्रसारच करत असते. 

ईएसजीमधील ’एस’ म्हणजेच सामाजिक घटक. कंपन्यांना चांगले रेटिंग मिळवण्यासाठी समाजात ’बदल’ घडवून आणण्याचे उद्दिष्ट दिले जाते. त्यासाठी त्यांना रेडी इंडेक्सच्या माध्यमातून अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यांपैकी एक म्हणजे कंपन्यांमध्ये पांथिक गट तयार करणे. टीसीएसमध्ये जे मुस्लीम गट तयार झाले त्यामागेही हे कारण असण्याची अधिक शक्यता आहे. ’रिलिजिअस फ्रीडम’ या नावाखाली ख्रिश्‍चन आणि मुसलमानांता प्रचार व प्रसार करण्याची छुपी मुभा अधिकृतपणे दिली जाते. आज बहुराष्ट्रीय कंपन्यांवर मोठा दबाव आहे. हा दबाव ग्राहकांचा नसून BlackRock किंवा Vanguardसारख्या मोठ्या गुंतवणूक संस्थांचा आहे. या संस्था ESG स्कोअर बघून गुंतवणूक करतात. जर एखाद्या कंपनीने REDI  इंडेक्स किंवा तत्सम ’वोक’ मानके पाळली नाहीत, तर त्यांचा स्कोअर कमी होतो. स्कोअर कमी झाला की गुंतवणूक कमी होते. ही एक प्रकारची बौद्धिक आणि आर्थिक खंडणी आहे, जिथे कंपन्यांना त्यांच्या देशातील स्थानिक संस्कृतीशी तडजोड करून हा अजेंडा राबवावा लागतो. 

टीसीएसने जागतिक स्तरावर ’धार्मिक समावेशकता’ (Religious Inclusion) या विषयावर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी Faith-based Employee Resource Groups (ERGs)  तयार केले आहेत. लेन्सकार्टने त्यांच्या कामाच्या ठिकाणी ’सर्वसमावेशकता’ वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये लिंग समानता (Gender Equality) आणि एलजीबीटीक्यू+  समुदायासाठीची धोरणे यांचा समावेश आहे. लेन्सकार्टमध्ये Temasek, SoftBank आणि Alpha Wave Global यांसारख्या मोठ्या जागतिक संस्थांची गुंतवणूक आहे. हे गुंतवणूकदार आता कंपन्यांना केवळ नफा नाही, तर त्यांचा ’ईएसजी स्कोअर’ काय आहे, हे विचारतात.

अनेक कंपन्यांना बाहेरच्या देशांमध्ये विक्रीसाठी ‘हलाल सर्टिफिकेट’ मिळवावे लागते. त्याबद्दल आक्षेप नाही. पण, भारतात विक्रीसाठी ते का लागते, असा प्रश्‍न विचारण्याचे धाडस सरकारला आजवर झाले नाही. ’फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया’ (एफएसएआय)सारखी मानके देणारी सरकारी संस्था काय लोणचे घालायला ठेवली आहे? जे सरकार करू शकत नाही, तेच टीसीएस, लेन्स्कार्ट यांसारख्या हजारो बहुराष्ट्रीय कंपन्या करू शकत नाहीत. कारण, सेबीने केलेल्या सक्तीमुळे २०२५-२६पर्यंत भारतातील सर्वोच्च ५०० सूचीबद्ध (Listed) कंपन्यांना ईएसजी अहवाल देणे बंधनकारक आहे. २०२६-२७पर्यंत ही संख्या वाढून १,००० कंपन्यांपर्यंत जाणार आहे. म्हणजेच, शेअर बाजारातील जवळपास सर्व मोठ्या कंपन्या आता या ’ईएसजी’च्या साच्यात अडकल्या आहेत!

कम्युनिस्ट सदस्य अनेकदा शैक्षणिक संस्था, प्रसारमाध्यमे आणि सांस्कृतिक क्षेत्रात ’इतिहासतज्ज्ञ’, ‘विचारवंत’, ’चळवळीतले कार्यकर्ते’ म्हणून सक्रिय असतात, तसेच आता कॉर्पोरेट जगात ESG (Environmental, Social, and Governance) आणि DEI (Diversity, Equity, and Inclusion) च्या नावाखाली नवीन प्रकारचे ’तज्ज्ञ’ तयार होत आहेत. हे लोक स्वतःला ’इन्क्लुजन एक्सपर्ट’ किंवा ’एथिक्स कन्सल्टंट’ म्हणतात. साम्यवादी लोक ’लोकशाही’, ’समानता’ आणि ’क्रांती’ या शब्दांचा वापर करतात, तसेच ईएसजीमध्ये ’विविधता’ (Diversity) आणि ’धार्मिक समानता’ (Religious Equity) या ‘गोंडस’ शब्दांचा वापर करून कंपन्यांच्या अंतर्गत धोरणांवर नियंत्रण मिळवले जाते. जशी डाव्या विचारांची एक 'इकोसिस्टम' असते (जिथे एक विचारवंत दुसऱ्याच्या पुस्तकाची स्तुती करतो आणि त्याला पुरस्कार मिळवून देतो), तशीच एक जागतिक इकोसिस्टम या निर्देशांकांच्या (उदा. REDI Index) मागे काम करत आहे. हे लोक एकमेकांना रेटिंग देतात. मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना (MNCs) या रेटिंगवर अवलंबून राहावे लागते, कारण त्यांचे गुंतवणूकदार  हे रेटिंग बघूनच पैसे लावतात.

ख्रिश्‍चनिटी व इस्लाम यांनी पंथप्रसार करण्याचे मध्ययुगीन धोरण केव्हाच बदलले आहे. आधुनिक काळात त्यासाठी पुरोगामी, सेक्युलर लोकशाहींचा यथेच्छ वापर करून घेतला जातो. त्याच पद्धतीने सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा वापर करून घेतला जात आहे. 

यावर अत्यंत कठोर उपाय कंपन्यांनाच करावा लागेल. एक तर ईएसजी व रेडीच्या मानांकनाचे नियम भारतात लागू होणार नाहीत, हे स्पष्टपणे सांगावे लागेल. सेबीला एसजी अनिवार्य करताना रेडीचे नियम काढून टाकावे लागतील. सरकार व कंपन्यांनाच त्याबाबत पुढाकार घ्यावा लागेल. लोकांनाही केवळ टिळे लावणे व इस्लामीकरण, ख्रिस्तीकरणाच्या तक्रारी करून पुरेसे होणार नाही. मते मागायला येतील तेव्हा आधी हे करा मग मत देतो, असे सांगावे लागेल. अन्यथा ख्रिस्तीकरणाच्या व इस्लामीकरणाच्या या फॅक्टर्‍या हिंदू धर्म संपवल्याशिवाय काही थांबणार नाहीत. 


बुधवार, १५ एप्रिल, २०२६

रोमी कोकणी ही वेगळी भाषा आहे का?

कोकणी ही भाषा एकच असली, तरी तिच्या पाच लिपी आहेत व त्यातली एक रोमी किंवा रोमन आहे. तांत्रिकदृष्ट्या हा मुद्दा बरोबर आहे. पण, ख्रिश्चन तसे मानतात का? या प्रश्नाचे उत्तर "नाही" असेच आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते लक्षांत येईल.   ईशान्य भारतात जेव्हा ख्रिस्तीकरण झाले तेव्हा सक्तीने या भाषांसाठी रोमन लिपी लागू करण्यात आली. त्या भाषांचा मूळ सांस्कृतिक पोत बदलला. अनेक शब्द बदलले. नवीन शब्द रूढ झाले. रोमन ही केवळ लिपी न राहता रोमी कोकणीसारखीच तिथेही रोमी कोकबोरोक ही भाषा म्हणून विकसित झाली. भाषेचा मूळ 'सांस्कृतिक गाभा' बदलला. एकदा गाभा बदलला की सांस्कृतिक, पांथिक, सामाजिक, भौगोलिक सगळ्या अस्मिताही आपोआप चिकटतात. प्रत्येक भाषिक वेगळेपण,  "वेगळे व्हायचेय मला" हा उद्घोष करू लागते.

कोकणी ही भाषा एकच असली, तरी तिच्या पाच लिपी आहेत व त्यातली एक रोमी किंवा रोमन आहे. तांत्रिकदृष्ट्या हा मुद्दा बरोबर आहे. पण, ख्रिश्चन तसे मानतात का? या प्रश्नाचे उत्तर "नाही" असेच आहे. https://www.facebook.com/reel/1276236410688728 येथे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते लक्षांत येईल. 

ईशान्य भारतातील, विशेषतः मणिपूर, नागालँड, मिझोराम येथे स्थानिक भाषांच्या बाबतीत चर्च आणि मिशनरि यांनी काही स्थानिक भाषांसाठी रोमन लिपी सुरू केली. आसामी भाषेसाठी ब्राह्मी लिपीपासून विकसित झालेल्या 'कामरूपी' शैलीतून उगम पावलेली स्वतःची स्वतंत्र 'आसामी लिपी' होती. प्राचीन ताइ घराण्याच्या अहोम भाषेला 'अहोम लिपी'  होती. लेपचा भाषेची 'लेपचा लिपी' होती. चकमा लोकांच्या भाषेसाठी 'चकमा लिपी' होती. मोनपा, खंबा आणि सिक्कीममधील सिक्कीमी भाषेसाठी तिबेटी लिपी होती. ताइ खामती भाषेसाठी लिकताइ लिपी होती. 'लिंबू' भाषेसाठी 'किरात सिरीजंगा' ही लिपी होती. याशिवाय  मिझो, नागा, खासी या बोली भाषा होत्या, ज्यांना लिपी नव्हती. 

ईशान्य भारतात जेव्हा ख्रिस्तीकरण झाले तेव्हा सक्तीने या भाषांसाठी रोमन लिपी लागू करण्यात आली. त्या भाषांचा मूळ सांस्कृतिक पोत बदलला. अनेक शब्द बदलले. नवीन शब्द रूढ झाले. रोमन ही केवळ लिपी न राहता रोमी कोकणीसारखीच तिथेही रोमी कोकबोरोक ही भाषा म्हणून विकसित झाली. ख्रिस्तीकरणामुळे या भाषांमध्ये पांथिक विधी, नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक मूळ शब्द बदलून त्या जागी इंग्रजी किंवा लॅटिन शब्दांचे प्राकृत रूप रूढ झाले. यामुळे भाषेचा मूळ 'सांस्कृतिक गाभा' बदलला. एकदा गाभा बदलला की सांस्कृतिक, पांथिक, सामाजिक, भौगोलिक सगळ्या अस्मिताही आपोआप चिकटतात. प्रत्येक भाषिक वेगळेपण,  "वेगळे व्हायचेय मला" हा उद्घोष करू लागते.  

हाच मुद्दा धरून मी अनेक कोकणी लेखकांना, रोमी कोकणी वेगळी भाषा आहे का, असे विचारले होते. बहुतेक सर्वांचे म्हणणे होते, की भाषा एकच आहे. फक्त लिपी वेगळी आहे. त्यात "गुलाब" या रोमन लिपीतून निघणार्‍या कोकणी मासिकाचे संपादक फाऊश्त दि कॉश्ता यांनीही तेच सांगितले. कोकणी अकादमीने दोन्ही रोमन व देवनागरीसाठी वेगवेगळे नियम मानक करून दिले आहेत. त्यावर एक प्रश्न उपस्थित झाला की मग "रोमी कोकणी" अशी शब्दयोजना का केली जाते? आणि भाषा एकच असेल तर लिपीनुसार वेगळी मानके का? ("सगल्यांक देवाची दया आनी मोग कळचो"  हे "sagalyaank devachi daya ani moga kalacho" असेच त्याचे लिप्यंतर होईल. तेही होताना उच्चारास जवळ जाणारे होतील. भाषेचे नियम बदलणार नाहीत. )

ज्या भाषा अनेक लिपीत लिहिल्या जातात त्यांची ओळखही लिपीवरून करून दिली जात नाही. त्यामुळे, रोमी कोकणी असे संबोधन खटकते. आता प्रत्येक ठिकाणची कोकणी वगळी असे खूळ आले तर विचारायलाच नको. कर्नाटकी, मंगळूरी, कुंदापुरी, कारवारी, हल्याळी, भटकळी अशा वेगवेगळ्या कोकणी भाषा झाल्या तर अनवस्था ओढवेल. त्यातही कॅथलिक आणि हिंदू यांचे वेगळेपण हा आणखी एक घोळ व्हायचा. 

कुठेही गेले तरी कोकणी एकच व तिची लिपीही एकच हे योग्य सूत्र आहे. कोकणीतील 'ळ', 'ण', 'ठ'  ही अक्षरे देवनागरीत जशीच्या तशी वाचून उच्चारली जातात, तिथे रोमन लिपीसारखा संभ्रम होत नाही. मराठी व कोकणीसाठी  देवनागरी हीच नैसर्गिक व योग्य लिपी आहे; रोमन नाही. 

भाषा किंवा लिपी हे केवळ माध्यम आहे, असे मानणे चुकीचे.  भाषा हे संवादाचे माध्यम नाही. भाषा, लिपी म्हणजे संस्कृतीची नाळ. विचार करण्याची पद्धत किंवा विचारप्रवाह.  तो बदलला, की सगळेच बदलते.

सोमवार, १३ एप्रिल, २०२६

वारकरी आणि ‘पवार’करी

वारकरी संप्रदायाला धोका प्रतिगामी, धार्मिकांचा नाही, तर आत घुसलेल्या पुरोगामी व ‘पवार’कर्‍यांचा आहे. त्यांची घुसखोरी वेळीच रोखली नाही, तर विठ्ठलाच्या भक्तीऐवजी हे समतेचे, समानतेचे खूळ माजेल. समृद्ध परंपरा असलेला वारकरी संप्रदाय मूळ वारीच्या वाटेवरून भरकटेल. वारकर्‍यांची पाऊले पंढरीच्या वाटेनेच जायला हवीत, बारामतीच्या वाटेने नव्हे!
विठ्ठलाची वारी करणार्‍यांचा संप्रदाय म्हणजे वारकरी. ‘वैष्णव’, ‘माळकरी’ अशी नावे असलेला हा संप्रदाय भागवत धर्माखाली येतो. विठ्ठल या लोकदैवताचे विष्णू हे वैदिकीकरण असल्याचे रा. चि. ढेरे, दुर्गा भागवत वगैरे म्हणत असले तरी ते तसे नाही. कारण, त्यांचा हा सिद्धांत आर्य आक्रमणावर पूर्णपणे बेतलेला नसला, तरी साम्यवाद आणि समाजवादाने पेरलेल्या वर्ग विभागणीत व वर्गसंघर्षात आहे. ते वेगळेपण मानल्यामुळे त्यांना समन्वयाचा सिद्धांत मांडावा लागतो. एकाच रूपाचे भिन्न ठिकाणी वेगवेगळे रूप असे ते मानायला तयार नाहीत कारण त्यांची वैचारिक बैठकच तशी नाही. 

एकात्म तत्त्व, देवता विचार हा वेदांपासून ते आजपर्यंत एकसंध, अखंड व सातत्याने प्रवाही विचार आहे. तेहतीस प्रकारच्या निसर्गदेवतांमध्ये देवचार, क्षेत्रपाल, प्राणी, झाडे, पक्षी, वारूळ, मूर्ती सगळे येते. त्यात विठ्ठलही येतो आणि गोव्यातली सांतेरही येते. विठ्ठल हा ‘बहुजनांचा देवू’ आहे असा विचार जेव्हा हे विचारवंत मांडतात तेव्हा त्यांना विठ्ठलाशी काही देणेघेणे नसते, त्याचा संबंध बहुजनांशी जोडून इतरांना वेगळे किंवा आक्रमक ठरवण्याचा असतो. सांतेर असलेली शांतादुर्गा झाली हे लोकदैवतेचे, निसर्गदेवतेचे ‘ब्राह्मणीकरण’ आहे, असा विचार मांडतात. पण, खांडोळ्याच्या सांतेरीचे (वारुळाचे) मूर्तीरूप कुणी केले, याचे उत्तर मात्र देणे टाळतात. ते ब्राह्मणांनी केले नाही तर तिला भजणार्‍या मूळ स्थानिकांनीच केले, हे ते सांगत नाहीत. एकाच शक्तीरूपाचे विविध प्रकारे झालेले प्रकटीकरण हे मान्य करावे लागते. तसे केले तर पुरोगामी, समाजवादी, साम्यवादी वर्गसंघर्ष मांडता येत नाही. 

शरद पवारांनी हल्लीच केलेले वक्तव्य हा त्याचाच पुढील भाग आहे. ‘वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोाकांची घुसखोरी झाली आहे. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे’, असे जे शरद पवार म्हणत आहेत, त्या वारकरी संप्रदायाला पुरोगाम्यांशी काही देणेघेणे नाही. वारकरी संप्रदाय हा पूर्णतः आस्तिक्यभावावर आणि विठ्ठलभक्तीवर आधारलेला आहे. वारीत चालणारा वारकरी सामाजिक बदलासाठी नाही, तर ’विठ्ठल भेटी’साठी चालतो.

वारकरी संप्रदाय भक्तिमार्गी धार्मिकांचा व प्रतिगामींचाच आहे. त्यात पुरोगामी घुसले आहेत. सोबत समाजवादी, निधर्मी, साम्यवादी, हे लोकही घुसले आहेत. हे लोक समतेच्या, समानतेच्या, सामाजिक सुधारणेच्या गप्पा हाणतात. अभंगांचे तोडून मोडून अर्थ सांगतात. गेल्यावर्षी ते ‘अल्ला देवे, अल्ला पिलावे’ प्रकरणही असेच पुरोगामी घुसल्याचे ज्वलंत उदाहरण होते. अनेक साम्यवादी कीर्तनकार, प्रवचनकार (त्यांच्या प्रोफाइलवरही तसेच लिहिले होते) समतेच्या, समानतेच्या गप्पा हाणत होते. 

वारकरी संप्रदायाचा मूळ उद्देश हा ’विठ्ठल भेटी’ची आस आणि ’मोक्ष’ किंवा ’सायुज्यकता’ प्राप्त करणे हाच आहे. नामस्मरण, कीर्तन आणि वारी ही साधने चित्तशुद्धीसाठी आहेत. ती पुरोगामित्व, सामाजिक समतेचा राजकीय जाहीरनामा मांडण्यासाठी नाहीत. एखाद्या संस्थेत, संप्रदायात घुसून ताबा मिळवणे व नष्ट करणे हे सांस्कृतिक मार्क्सवादाचे लिखित ध्येय आहे. त्याचे राजकीय फायदे ओळखून गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पुरोगामी, ‘पवार’करी वार्‍या करू लागले. प्रारंभी ‘ग्यानबा तुकाराम’ याला पर्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी आरंभला होता. संतांची जातवार विभागणी या लोकांनीच केली. त्यामुळे भजन, कीर्तनात ज्ञानदेव, एकनाथ नकोसे होऊ लागले. पण, त्याला फारसा पाठिंबा मिळाला नाही. मग, तुकारामाच्या खुनाचे तर्कट लढवण्यात आले. ‘सदेह स्वर्गा’त जाणे तर्काला पटत नसल्याने त्यांचा खूनच झाला, असा तर्कट मांडण्यात आले. श्रद्धेच्या प्रत्येक मुळावर घाव घालताना, त्याची जातवार मांडणी करताना तोंडी समतेच्या व समानतेच्या गोष्टी कायम ठेवल्या.

मुळात वैयक्तिक सुधारणेवर भर असलेला वारकरी संप्रदाय व संत हे धार्मिकच आहेत. त्या अर्थाने ते प्रतिगामीही आहेत. त्यांना समतेच्या चळवळीचे पाईक करण्याचा कुणी प्रयत्न करू नये. ते वारकरी संप्रदायाच्या मूळ गाभ्याशी जुळेनासे झाले तशी ‘भक्ती चळवळ’ नावाची नवी वळवळ विचारवंतांनी  सुरू केली. मग, प्राचीन काळापासून असलेली व वारकरी संप्रदायाचा मूलाधार असलेली भक्तिसूत्रे जी अनेक ऋषीमुनींनी लिहिली त्याचे काय? याचे उत्तर कुणीही देत नाही. 

वारकरी संप्रदायाला धोका प्रतिगामी, धार्मिकांचा नाही, तर आत घुसलेल्या पुरोगामी व ‘पवार’कर्‍यांचा आहे. त्यांची घुसखोरी वेळीच रोखली नाही, तर विठ्ठलाच्या भक्तीऐवजी हे समतेचे, समानतेचे खूळ माजेल. समृद्ध परंपरा असलेला वारकरी संप्रदाय मूळ वारीच्या वाटेवरून भरकटेल. वारकर्‍यांची पाऊले पंढरीच्या वाटेनेच जायला हवीत, बारामतीच्या वाटेने नव्हे!