बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

याजसाठी केला होता अट्टहास...

डीलिमिटेशन महत्त्वाचे, की एफसीआरए दुरुस्ती विधेयक, या कोंडीत सापडलेल्या सरकारने अखेर तेच केले जे अपेक्षित होते. इतक्या दिवसांचा सर्वांचा गोंधळ एकदाचा सार्थकी लागला. सरकार हा देश चालवते, हा समज पुन्हा एकदा गैर असल्याचे सिद्ध झाले. सत्ताहस्तांतरणास स्वातंत्र्य समजण्याच्या भ्रमाचे भोपळे अजूनही दरवर्षी १५ ऑगस्टला फुटतात; यापुढेही फुटतच राहतील. वसाहतवाद संपलाय, त्याची मानसिक गुलामगिरी व पारतंत्र्य अद्याप तसेच आहे! बाकी विद्यार्थ्यांच्या हिताचे व परीक्षेतील घोटाळे रोखण्याचे सोयरसुतक कुणालाही नव्हते व नाही. बाकी यात अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले.

अखेर जे अपेक्षित होते तेच झाले. या सत्रात काही केल्या ‘फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अ‍ॅक्ट (एफसीआरए) दुरुस्ती विधेयक, २०२६’ हे विधेयक संमत होणार नाही. ते ३१ सदस्यीय संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले आहे. पुढील सत्रात काय होईल, हे भविष्य कुणी पाहिले आहे? तोवर त्याचा तोडगा व अन्य मार्ग कसा काढायचा याचा विचार करण्यास पुरेसा वेळही सर्व बाधितांना व विरोध करणार्‍यांना मिळेल. देशाचे काय? तो तर दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करणार्‍या वसाहतवादाचा मानसिक गुलाम व दीन आहे. 

नीट आंदोलनास संशोधक सोनम वांगचुक यांचा पाठिंबा व केलेले उपोषण जेव्हा मागे घेतले तेव्हाच या सत्रात हे एफसीआरए बिल बारगळणार हे स्पष्ट झाले होते. हे काही घटनात्मक विधेयक नव्हते. सरकारकडे २७० एवढे संख्याबळही होते. या सत्रात हे बिल संमत होऊ नये, यासाठी जो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आटापिटा करण्यात आला तो यशस्वी झाला. याच्या तारा बॉस्टनशी मिळत्याजुळत्या असणे हा योगायोग अजिबात नाही. चर्च, एनजीओ, मीडिया या सर्वांवर परिणाम करणारे हे विधेयक संमत झालेले कुणालाच नको होते. 

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७६साली संमत व लागू झालेला हा कायदा, २०१०साली मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जवळपास पूर्ण बदलण्यात आला. परवान्यांचे नूतनीकरण दर ५ वर्षांनी करणे अनिवार्य झाले. २०१६-१७मध्ये राजकीय निधी नियमात बदल झाले. २०२०साली त्यात आधार कार्ड व स्टेट बँकेचे खाते अनिवार्य करण्यात आले. पण पैसा जप्त केला तरी त्यांचे कार्य सुरूच राहते हे लक्षांत आल्यावर त्या पैशातून निर्माण झालेली संपत्ती, वास्तू जप्त करण्याची नवी तरतूद करणे भाग होते. शिक्षण, आरोग्य असली कारणे देऊन आलेला पैसा नेमका कशासाठी वापरला जातोय, हे सांगणे बंधनकारक करणे आवश्यक होते; ते या दुरुस्ती विधेयकात करण्यात आले होते. 

ते आता किमान या सत्रात तरी संमत होणार नाही. याची ग्वाही तर फळांचा रस पाजताना वांगचुक यांना देण्यात आली नव्हती? वांगचुक यांच्यामागे असलेल्या चौथ्या, पाचव्या वर्तुळातील लोकांना जो वेळ हवा होता, तो मिळाला. ‘हा कायदा आधीच्या जुन्या प्रकरणांना किंवा मालमत्तांना लागू केला जाणार नाही’, असे लेखी आश्वासन सरकारने भारतीय कॅथलिक बिशप परिषद आणि इतर चर्चच्या प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळास दिले आहे. जप्त केलेली मालमत्ता ही प्रार्थना स्थळ असेल, तर त्याला हात लावला जाणार नाही. त्यामुळे आता फक्त त्या जागेत आधीपासूनच प्रार्थना घेतली जात आहे किंवा तिथे ख्रिस्तपंथी कार्यक्रम होतात, एवढेच दाखवले तरी पुरेसे आहे. तेवढा वेळ अ‍ॅडजस्ट करण्यासाठी या सत्रात हे विधेयक संमत न होणे पुरेसे आहे. एनजीओंनाही स्वत:स स्वच्छ करण्यास वेळ मिळाला आहे. 

डीलिमिटेशन महत्त्वाचे, की एफसीआरए दुरुस्ती विधेयक, या कोंडीत सापडलेल्या सरकारने अखेर तेच केले जे अपेक्षित होते. इतक्या दिवसांचा सर्वांचा गोंधळ एकदाचा सार्थकी लागला. सरकार हा देश चालवते, हा समज पुन्हा एकदा गैर असल्याचे सिद्ध झाले. सत्ताहस्तांतरणास स्वातंत्र्य समजण्याच्या भ्रमाचे भोपळे अजूनही दरवर्षी १५ ऑगस्टला फुटतात; यापुढेही फुटतच राहतील. वसाहतवाद संपलाय, त्याची मानसिक गुलामगिरी व पारतंत्र्य अद्याप तसेच आहे! बाकी विद्यार्थ्यांच्या हिताचे व परीक्षेतील घोटाळे रोखण्याचे सोयरसुतक कुणालाही नव्हते व नाही. बाकी यात अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. 


बुधवार, ५ ऑगस्ट, २०२६

या विद्यार्थ्यांनी काय पाप केले आहे?

परीक्षा घोटाळ्यांवर नेमके व नेटके उत्तर त्या परीक्षा सुधारणांत आहे; आंदोलनात नाही. आज जे विद्यार्थी राज्यस्तरावर आंदोलन करतात, त्यांना महत्त्व दिले जात नाही कारण ‘परीक्षा घोटाळा’ हा मुद्दा कधीच नव्हता व नाही. प्रत्येकाला आपली भाकरी भाजून घ्यायची आहे; विद्यार्थी उपाशी मेला काय आणि जगला काय, कुणालाही काहीही फरक पडत नाही.

नीट-यूजीची फेरपरीक्षा होऊन विद्यार्थी मार्गीही लागले आहेत. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देऊन झाला आहे. त्या समस्येवर सीजेपीला अपेक्षित समाधानही मिळाले आहे. या परीक्षा ऑनलाइन घेतल्या जातील तेव्हापासून पेपरफुटीही कदाचित बंद होईल. पण, राज्यस्तरीय परीक्षा घोटाळ्यांचे काय? एकत्रितपणे विचार केल्यास, हे राज्यस्तरीय घोटाळे नीट-यूजीपेक्षाही तितकेच भीषण आणि काही बाबतीत जास्त धोकादायक ठरतात. तरीही त्याकडे राष्ट्रीय स्तरावरील मीडियाचे लक्ष जात नाही. या विद्यार्थ्यांनी असे काय पाप केले आहे?

प्रामुख्याने झारखंड, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक येथे आता सध्या विद्यार्थ्यांची पेपरफुटीविरुद्ध आंदोलने सुरू आहेत. झारखंडमध्ये जेएसएससी-सीजीएल व जेपीएससी, उत्तर प्रदेशमध्ये आरओ/एआरओ परीक्षा आणि कर्नाटकात राज्य पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा यांत घोटाळे झाले आहेत व त्याविरुद्ध विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांना कुणीही वाली नाही. 

राज्यस्तरावर परीक्षा घोटाळे उघडकीस आल्यानंतर राज्य सरकार सहसा परीक्षा रद्द करत नाही. समित्या नेमल्या जातात, त्यांचे अहवाल, निकाल लागेपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. व्याप्ती आणि परिणाम यांचा विचार केल्यास नीटी-यूजीमुळे अंदाजे २५ लाख विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, तर (आता जिथे आंदोलने सुरू नाहीत, पण घोटाळे झाले आहेत अशी राज्ये गृहीत धरली तर) जवळपास १ ते दीड कोटी विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. 

परीक्षा घोटाळा राज्यस्तरीय असली तरी घोटाळे व परिणाम भोगावे लागलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही. तरीही त्यांचे म्हणणे राष्ट्रीय स्तरावर ऐकून घेतले जात नाही किंवा त्याला महत्त्व दिले जात नाही कारण त्यांच्यामागे ‘सिस्टम’ नाही. नीट आंदोलनास यश मिळाले ते केवळ सीजेपीने आंदोलन केले, वांगचुक यांचा पाठिंबा लाभला यामुळे असे जर कुणास वाटत असेल तर तो भ्रम आहे. त्यामागे, सर्व सिस्टममध्ये सर्वत्र मोठ्या संख्येने असलेल्या सांस्कृतिक मार्क्सवाद्यांची अभेद्य फळी आणि सोशल मीडियाचा अल्गोरिदम यांची भूमिका फार मोठी आहे. ज्या पद्धतीने हे आंदोलन झाले ते पाहता ते विद्यार्थ्यांसाठी नव्हतेच. अन्यथा, नेमके प्रश्‍न मांडले गेले असते व नेमक्या मागण्या झाल्या असत्या. प्रधानांच्या राजीनाम्याने नीटमधील घोटाळा थांबणार आहे का? ही शुद्ध राजकीय मागणी होती. 

हे आंदोलन चिघळू देणे, सीजेपीला जास्त वाव देणे हे भाजपची पुढील निवडणुकांसाठी केलेली तयारी असावी. सीजेपी हा राजकीय पक्ष झाला तर विरोधकांत वाटेकरी वाढणार आहे. आता प्रत्यक्षात ते भाजपची मते खातात, की विरोधातील मित्र पक्षांची हे येणारा निवडणूक निकालच ठरवेल. पण, यात सरकार, विरोधक, आंदोलक विद्यार्थी, त्यांच्यामागे अनेक वर्तुळांत असलेले लोक यांना नीट परीक्षेत घोटाळे होऊ नयेत याच्याशी काहीही देणेघेणे नव्हते. मग, या आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी देणारी ‘गोदी’ व ‘पिद्दी’ मीडिया तरी अपवाद कशी बरे असेल? 

प्रधानांनी राजीनामा दिला म्हणून घोटाळे व्हायचे थांबतील? किती आंदोलने करावी लागतील? त्यात संसद भवन उखडून टाकण्याचे किती प्रयत्न होतील? पण, ते खरे त्याचे उत्तर आहे का? परीक्षा घोटाळ्यांवर नेमके व नेटके उत्तर त्या परीक्षा सुधारणांत आहे; आंदोलनात नाही. आज जे विद्यार्थी राज्यस्तरावर आंदोलन करतात, त्यांना महत्त्व दिले जात नाही कारण ‘परीक्षा घोटाळा’ हा मुद्दा कधीच नव्हता व नाही. प्रत्येकाला आपली भाकरी भाजून घ्यायची आहे; विद्यार्थी उपाशी मेला काय आणि जगला काय, कुणालाही काहीही फरक पडत नाही. 



सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

भारताचे भविष्य घडवणारे युवा, जेन झी...

स्वत:चाच वापर करायला देऊन आपल्या आयुष्याचे पायपुसणे करू द्यायचे की स्वत:च्याच पायांनी जग जिंकायचे हे आता जेनझी, युवावर्गानेच ठरवायचे आहे!   अभिनंदन कनिष्क, ऋद्धेश, ऋषित, श्रेष्ठ आणि स्वरित. तुमचे आणि तुमच्या शिक्षकांचे खरेच मनापासून अभिनंदन!

आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड ही शालेय भौतिकशास्त्राची जागतिक स्पर्धा आहे. यातील छप्पन्नावी स्पर्धा कोलंबियातील बुकारामंगा येथे ५ ते १२ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा ऋद्धेश अनंत बेंडाळे, दिल्लीतल्या द्वारका येथील ऋषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी या पाचही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकले आणि भारताची ‘जेन झी’ काय आहे, ते जगाला दाखवून दिले. या निर्भेळ विजयामुळे भारत संयुक्तपणे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. चीन, रशिया, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत बरोबरी साधली.

या स्पर्धेत ३८१ विद्यार्थी आणि ८५ हून अधिक देश यात सामील झाले होते. त्यातील प्रत्येक जण आपापल्या देशातील भौतिकशास्त्राचा सर्वोत्तम विद्यार्थी होता. भारताने पाच मुलांना पाठवले होते. ते पाचही जण सुवर्णपदक घेऊन परत आले. आयपीएचओमध्ये सहभागी होण्याची ही भारताची सत्ताविसावी खेप होती.  या सर्व वर्षांमध्ये, सुमारे ४४ टक्के भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण, ४१ टक्क्यांनी रौप्य, तर १० टक्क्यांनी कांस्य पदक जिंकले आहे. गेल्या दहा वर्षांत, प्रत्येक भारतीय विद्यार्थी पदक घेऊन घरी परतला आहे. ६२ टक्के सुवर्ण, ३८ टक्के रौप्य. गेल्या दशकात एकही विद्यार्थी रिकाम्या हाताने परत आलेला नाही. एका वर्षात पाच सुवर्णपदके जिंकण्याची घटना फक्त दोनदाच घडली आहे. या वर्षी आणि याआधी २०१८साली.

स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचा हा कार्यक्रम एचबीसीएसई, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राद्वारे चालवला जातो. हे टीआयएफआरच्या अंतर्गत येते, जे अणुऊर्जा विभागाच्या अखत्यारीत येते. ते ही संपूर्ण प्रक्रिया चालवतात. एक राष्ट्रीय परीक्षा, त्यानंतर एक राष्ट्रीय ऑलिम्पियाड, मग एक कठोर निवड घेऊन पाच मुले निवडली जातात. ज्यांचे प्रशिक्षण शिबिर घेतले जाते. या टीमचे नेतृत्व एचबीसीएसई-टीआयएफआरचे प्राध्यापक अन्वेश मजूमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या डॉ. लीना जोशी यांनी केले. वैज्ञानिक निरीक्षकांमध्ये आयआयएसईआर कोलकाताचे प्राध्यापक आनंद दासगुप्ता आणि रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या निशा केळकर यांचा समावेश होता.

एक सरकारी अनुदानित केंद्र गेल्या २७ वर्षांपासून भारतीय किशोरवयीन मुलामुलींमध्ये ही प्रतिभा शांतपणे घडवत आहे. हे सार्वजनिक शिक्षण असे काहीतरी करत आहे, जे खाजगी कोचिंग इंडस्ट्री स्वतःच्या बळावर कधीच करू शकली नसती. स्पर्धेत शॉर्टकटचा कोणताही धडा नसतो. तुम्हाला वाचवणारी कोणतीही सूत्रपत्रिका नसते. कधीही न पाहिलेल्या समस्येला सोडवत विद्यार्थ्यांना बसावे लागते आणि विचार करावा लागतो. ऑलिम्पियाडच्या प्रश्नपत्रिकेचा कोणताही ज्ञात प्रकार नसतो. कोचिंग इंडस्ट्री एका गोष्टीत खूप चांगली आहे. ती विद्यार्थ्याला एखादी ज्ञात समस्या वेगाने सोडवायला शिकवते. 

नीट आंदोनामागे कोचिंग माफिया, शिक्षक, विद्यार्थी व राजकारणी होते. त्यांचा प्रत्येकाचा स्वार्थ आहे व तो साधण्यासाठी विद्यार्थी वापरून घेण्यात आले. या सर्वांना वापरणारी एक वेगळीच व्यवस्था कार्यरत होती. हे विद्यार्थ्यांच्या निमित्ताने झालेले, पण विद्यार्थ्यांसाठी नसलेले आंदोलन होते. यात ज्यांनी ज्यांनी संसद भवन उखडून टाकण्याची भाषा केली, दगडफेक केली, अर्वाच्च शिव्या घातल्या, स्वत:ला पोलिसांनी मारबडव केली याचे भांडवल केले, अपशब्दांना ट्रोल केल्याचे भांडवल केले, माफी मागायला लावली त्याचेही रडत आणि हसत भांडवल केले ते ‘जेन झी’ भारताचे भविष्य नाहीत. हे पाच विद्यार्थी व ते सर्व विद्यार्थी जे गेली सत्तावीस वर्षे जिंकले आहेत, ते युवा, ते जेनझी भारताचे भविष्य आहेत. 

स्वत:चाच वापर करायला देऊन आपल्या आयुष्याचे पायपुसणे करू द्यायचे की स्वत:च्याच पायांनी जग जिंकायचे हे आता जेनझी, युवावर्गानेच ठरवायचे आहे! 

अभिनंदन कनिष्क, ऋद्धेश, ऋषित, श्रेष्ठ आणि स्वरित. तुमचे आणि तुमच्या शिक्षकांचे खरेच मनापासून अभिनंदन!

मुलांच्या आणि भारताच्या या विजयाची ही माहिती देणार्‍या आमशेकर सरांचे मनापासून धन्यवाद! 


रविवार, २ ऑगस्ट, २०२६

या मुलांना काहीच शिक्षा होणार नाही..


भारताचे पंतप्रधान मोदी यांनी ‘मोठ्या मनाने’ विद्यार्थ्यांना, तरुण-तरुणींना माफ केले. या मुलांनी त्यांना ‘मादर*द’, ‘मेलोडी के चू*मे घुसे हुए बहन के *डे’ असे म्हटले व तरुणांचा व्यवस्थेविरुद्धचा उद्रेक म्हणून ते खपवलेही गेले. मुलांना माफ करण्यावाचून सरकारकडे अन्य कोणताही पर्याय नव्हता. जिथे अपशब्द उच्चारणार्‍या, दगड फेकणार्‍या, संसद भवनावर चाल करून जाणार्‍या एकाही विद्यार्थ्याविरुद्ध जराही कारवाई न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालय देते, तिथे माफ करण्यावाचून अन्य पर्याय उरतच नाही. प्रश्‍न संस्कृती बुडाली का? लै संस्कृती संस्कृती करणार्‍यांनी लहान मुलांना ट्रोल करू नये, वगैरे सगळे ज्ञान पाजळले जाते. तरुणांच्या या अशा भाषेचा, व्यक्त होण्याच्या पद्धतीचा उगम कशात आहे, हा खरा प्रश्‍न आहे. भारत सरकार त्यावर काय कारवाई करते? की युरोपसारखी संस्कृतीरक्षणाची स्थिती ओढवल्यावर जागे होणार आहे, कोण जाणे!

अनियंत्रित वेब सिरीज, त्यातील भाषा व तिचे ‘अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य’ म्हणत केलेले समर्थन, ‘दगडफेकीची, हिंसाचाराचीच दखल घेतली जाते’, ‘निर्भीड, बिनधास्त मत व्यक्त करायचे तर शिव्याच दिल्या पाहिजेत’, हे प्रस्थापित केलेले दोन नॅरेटिव्ह या सर्वांचा एकत्रित पगडा या मुलांवर होता. आता हे नॅरेटिव्ह कुणी प्रस्थापित केले, हा खरा मुद्दा आहे. हे नॅरेटिव्ह प्रस्थापित केले ते सांस्कृतिक मार्क्सवादींनी. हे लोक सरकारात, विरोधकांत, विद्यार्थ्यांत, न्यायव्यवस्थेत, मीडियात सर्वत्र मोठ्या संख्येने आहेत.

कुटुंबसंस्था, भाषा, परंपरा, नैतिक मूल्ये आणि शिक्षण संस्था मोडून काढणे हेच तर सांस्कृतिक मार्क्सवादाचे ध्येय आहे. प्रत्येक कॉम्रेड तसाच वागतो आणि तेच इतरांना शिकवत राहतो. कॉम्रेड अरुंधती रॉय आपल्या वडिलांना ‘*तिया’ म्हणाली होती, हे तिनेच हल्ली एका मुलाखतीत सांगितले. हाच ‘बिनधास्तपणा’ असे तरुणांना व्यवस्थित शिकवले जाते. आपल्या संस्कृतीतील प्रत्येक अभिमानाच्या गोष्टीचा अपमान करणे म्हणजे ‘पुरोगामीपण’ हे ठसवले जाते.

‘कुणाविरुद्ध कोण आहे?’ याचे अजिबात देणेघेणे यांना नसते. जो कमकुवत दिसेल त्याच्यामागे राहतात; तो वरचढ झाला, की विरुद्ध बाजूने लढतात. कायम संघर्ष हेच ध्येय असते. यांना उत्तरे नकोच असतात, फक्त प्रश्‍न उपस्थित करत राहणे हेच यांचे काम असते. याला ते ‘प्रश्‍न विचारा’ किंवा ‘क्रिटिकल थिअरी’ म्हणतात. पण, स्वत:स कधीच प्रश्‍न विचारू देत नाहीत.

इतरांची अकाउन्टिबिलिटी विचारत फिरणारा सौरभ दास, उत्पन्नाचा ज्ञात स्रोत नसतानाही दिल्लीच्या एलीट एरियात महिना किमान ८ लाखांचे भाडे देतो म्हणे; ते तो कसे काय देतो? हा प्रश्‍न एकही पत्रकार त्याला विचारत नाही. कारण, सांस्कृतिक मार्क्सवादी व त्यांचे समर्थन असलेल्यांना प्रश्‍न विचारणे चुकीचे असते, ते कुणाबद्दलही, काहीही बोलू शकतात.

या मुलांना पुढे काढून तसे बोलायला लावणारे कोण आहेत, ते शोधून त्यासाठी त्यांना जबाबदार धरणे गरजेचे आहे. शिवी देणारा, दगडफेक करतानाचा प्रत्येक व्हिडिओ पाहा; व्हिडिओ कोण काढत आहे, हे कुणालाच माहीत नाही. शिव्या हासडणार्‍या सात आठ वर्षांच्या मुलाचे कौतुक कोण करत होते व त्याला प्रोत्साहन कोण देत होते, हे शोधून काढणे गरजेचे आहे. मुलांसोबत यांना माफ करणे परवडणार नाही.

मुलांना माफ करून प्रश्‍न सुटणार नाही. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना होणे गरजेचे आहे. ‘आपण कुणालाही काहीही बोलू शकतो’, हे स्वातंत्र्य नाही याची तरी निदान त्यांना जाणीव झाली पाहिजे. त्यासाठी या विद्यार्थ्यांमागील जे एक वर्तुळ कार्यरत होते, ते सरकारने सर्वांसमोर आणावे. ज्या मुलांनी, मुलींनी शिव्या दिल्या त्यांच्या मागे कोण होते, हे त्यांनाच उघड करायला लावणे हाही एक चांगला उपाय आहे. ज्यांनी हे व्हिडिओ केले त्यांचे व्हिडिओ लोकांसमोर येणे अत्यावश्यक आहे.

जीन ग्रेसारखे हे सांस्कृतिक मार्क्सवादी एकाच वेळी अनेकांच्या मनाचा ताबा घेतात. या मुलांना काहीच शिक्षा होणार नाही, हे उघड गुपित आहे. प्रश्‍न हाच आहे, की त्यांचा वापर करणार्‍यांनाही भारताचे पंतप्रधान माफ करणार आहेत का? आजवर तरी त्याचे उत्तर ‘हो’ असेच मिळाले आहे...

शनिवार, १ ऑगस्ट, २०२६

काय होणार आहे याच्याविरुद्ध? काहीही नाही...

हिंदूंचे देव हे कुणीही यावे काहीही बोलावे याच लायकीचे उरले आहेत. शिवाचे लिंग हे ब्रह्माने तोंडात धरून तोडले व ते जमिनीवर पडले तेव्हापासून शिवलिंग पुजले जाऊ लागले, असे हा मौलाना जर्जिस अन्सारी म्हणतो. ब्रह्माने शिवाचा खतना केला, असे म्हणतो. त्याच्याविरुद्ध काहीच कारवाई होणार नाही. कारण, शिव हा हिंदूंचा देव आहे. (आता तर तो हिंदूंचाही नाही, फक्त शैवांचा किंवा लिंगायतांचा देव आहे, असे मत मांडले जात आहे).

कुराणात असलेलाच संदर्भ कोणतीही अभद्र टिप्पणी न करता नुपूर शर्माने दिला त्यावर गदारोळ माजला. सर्व मुस्लीम देशांनी भारताची कोंडी केली. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ असलेली पोस्ट शेअर केली म्हणून कन्हय्यालाल कुमार आणि उमेश कोल्हे यांचे "सर तन से जुदा" करण्यात आले. त्यासाठी न्यायाधीश महोदयांनी नुपूर शर्मालाच जबाबदार (तोंडी निरीक्षणात) धरले होते.

ईशनिंदा झाली म्हणून कुणीही हिंदू मुसलमानांसारखे "सर तन से जुदा" करत नाही. म्हणूनच बहुधा कुणीही उठतो व हिंदू देवांबद्दल काहीही बोलतो. (म्हणजे हिंदूंनी तसे करावे, असे नाही. तेही चुकीचेच आहे) आता तर पुरोगामी, आर्यभटांनी बहुजनांना भाकडकथा सांगून गुलामगिरीत ठेवले म्हणणारे, विचारवंत "शिव ही हिंदूंची देवता नाही" असे म्हणू लागले आहेत. दत्ता नायकांसारखे विचारवंत तर "शंकराच्या लिंगाची पूजा ही मूलत: पुरुषाच्या लिंगाची व स्त्रीच्या योनीची पूजा आहे" असे लिहितात. कुणीही काहीही बोलत नाही.

गणपतीबाबत फुलेंनी जी भाषा वापरली आहे, ती फुल्या देऊन छापावी लागते महाराष्ट्र सरकारला. ते लिखाण "ईशनिंदा" यात येत नाही. जिथे फुले चालतात तिथे दत्ता नायक किंवा हा मौलाना जर्जिस अन्सारी "किस झाड की पत्ती"? हिंदू देवदेवतांविषयी जी भाषा वापरतात त्याविरुद्ध काहीही होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

कारण एकच; हिंदू हा संपण्याच्याच लायकीचा आहे, त्याचे देवही....

सोमवार, २७ जुलै, २०२६

सरकार तुम्हारी है, पर सिस्टम हमारा है!

या पुढे कुठलेही आंदोलन झाले, तर ज्यांच्याविरुद्ध हे आहे, त्यांना शिव्या देणे, अर्वाच्च भाषा वापरणे हा नवीन नियम झाला आहे. ‘संपूर्ण युवावर्ग तसा नाही’, या समाधानात फार काळ राहणे अजिबात परवडणार नाही. वाळवी लागल्यावर ‘किती भाग चांगला उरला आहे’, याचा अभिमान बाळगत बसायचे नसते. ज्यांना ही वाळवी लागली आहे, त्या विद्यार्थ्यांवर काहीच, कुठेच कारवाई न करण्याची अट स्वीकारून सरकारने खूप मोठी चूक केली आहे. याचे परिणाम केवळ आंदोलनापुरतेच राहणार नाहीत. ते आपल्या घरातही जाणवू लागतील. तो दिवस दूर नाही जेव्हा रागावलेले, विरोधात गेलेले पोरगे किंवा पोरगी ‘पापा का बच्चा रोता है, पापा का ** छोटा है’ म्हणेल किंवा ‘नीम का पत्ता कडवा है’ म्हणत त्यापुढचे वाक्य स्वत:च्याच बापाबद्दल बोलेल, तेव्हाच डोळे उघडणार आहात का? आज सरकारने ‘सिस्टम’समोर लोटांगण घातले आहे, येत्या काळात पालकांना आपल्याच मुलांसमोर ते घालावे लागेल. काहीही झाले तरी विजय ‘सिस्टम’चाच असेल!

नीट आंदोलनाच्या यशाचे श्रेय घेण्याची चढाओढ लागली आहे. यात एक ‘सिस्टम’, विचारधारा अजिबात पुढे नाही आणि त्यांनाच या नीट आंदोलनाच्या यशाचे श्रेय जाते. सरकार कायम त्यांच्याचपुढे झुकते व आताही झुकले. हे सरकारचे ‘दोन पावले मागे येणे’, ‘मोदींचा मास्टरस्ट्रोक’ वगैरे अजिबात नाही. हा सरकारचा सपशेल पराभव आहे आणि ‘सिस्टम’चा विजय आहे.

वास्तविक, नीट परीक्षा घोटाळा पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने उपाययोजना आधीच सुरू केल्या होत्या. विद्यार्थी नीटची परीक्षा देऊन पुढच्या मार्गाला लागलेही होते. मग, हे आंदोलन नेमके कशासाठी झाले, हा खरेच एक मोठा प्रश्‍न आहे. समोर आलेली मुख्य मागणी ‘धर्मेंद प्रधान यांचा राजीनामा’ ही होती. ही मागणी यूजीसीच्या वेळी जे लहानसे आंदोलन झाले तेव्हापासूनची आहे. त्याला सरकारने अजिबात भीक घातली नाही. त्या आंदोलनाला देशव्यापी करण्याएवढी ‘सिस्टम’ही त्यामागे नव्हती.  

अभिजित दिपके व सीजेपी यांच्या आंदोलन सुरू करतानाच्या मागण्यांमध्ये प्रधानांचा राजीनामा व आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक भरपाई एवढेच मुद्दे होते. ज्या सोनम वांगचुक यांनी आंदोलनास पाठिंबा दिला त्यांनी भरपाई देण्यासोबत केलेली, ‘संसदेत चर्चा’ ही प्रमुख मागणी योग्य होती. याशिवाय आयसा(ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन)च्या ‘ग्रेस मार्क रद्द करणे’ ही मागणी वगळता, नीट घोटाळ्याशी संबंधित ‘मागण्या’ आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पूर्ण झाल्या होत्या. 

नीट परीक्षा घोटाळ्यातील आरोपींना लवकरात लवकर कठोर कारवाई, पुन्हा असा घोटाळा होऊ नये म्हणून ठोस उपायांची सरकारकडून कार्यवाही हे मुद्देच ‘विद्यार्थ्यांसाठी’ असलेल्या या आंदोलनात नव्हते. हे आंदोलन नीट घोटाळ्याच्या निमित्ताने झाले असले तरी ते विद्यार्थ्यांसाठी अजिबात नव्हते. ‘परीक्षा घोटाळा’ व त्यातून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान हा मुद्दा कधीच नव्हता. कुठलीही वैचारिक बैठक नसलेले अभिजित दिपकेसारखे एक बिनबुडाचे बाहुले ‘सिस्टम’च्या हाती लागले. त्याशिवाय,  एफसीआरए(फॉरेन कॉन्ट्रिब्यूशन रेग्युलेशन अ‍ॅक्ट)मधील कडक नियम, त्यातील सुधारणा आणि त्याअंतर्गत झालेली चौकशी यामुळे दुखावलेले संशोधक सोनम वांगचुक यांचीही साथ लाभली. 

कृषी आंदोलनाच्या वेळी या ‘सिस्टम’चा भाग असलेल्या न्यायव्यवस्थेने स्वत:च नेमलेल्या समितीचा अहवाल मिळाल्यानंतरही केवळ निकाल द्यायला तब्बल आठ महिने घेतले. हा कालावधी निवडणुकांची गणिते जपण्यासाठी सरकारला झुकवण्यास पुरेसा होता. शेवटी तेच झाले. संसदेत संमत झालेले कायदे रस्त्यावरील झुंडशाहीमुळे मागे घेतले गेले. हे आंदोलन सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिले तर यात जे साध्य करायचे होते त्यासाठी पुढे सरसावलेल्यांचे हेतू वेगळेच होते. जे या बाहुल्यांच्या मागे ‘कळसूत्रे’ हालवत होते, ते त्यांचे हेतू, जे रुजवायचे होते ते त्यांनी व्यवस्थित व पद्धतशीरपणे रुजवले. त्यांना नीटशीही काही देणेघेणे नव्हते व विद्यार्थ्यांशीही. विद्यार्थी हे केवळ निमित्त होते. त्यांचा वापर करून जे रुजवले ते भयानक आहे. 

‘देश का युवा रोता है, मोदी का ** छोटा है’ असली बिनडोक घोषणा देणार्‍या मुलींना मोदींसोबत आपलेही चारित्र्यहनन होते याचे भानच उरले नाही. जी गोष्ट पाहिल्याशिवाय, हात लावल्याशिवाय किंवा ‘आत’ घेतल्याशिवाय लहान आहे की मोठी हे कळत नाही, ते या मुलींना कसे कळाले? (क्षमा असावी, पण मज वदवेना स्पष्ट याहुनी भलते). पुढील पिढीच्या हातूनच मागील पिढीबद्दलचा आदर नष्ट करणे, हा ‘सिस्टम’चा हेतू साध्य झाला. विरोध असणे, तो स्पष्टपणे मांडणे हा भाग वेगळा आणि त्यासाठी गलिच्छ भाषेचा, अर्वाच्च शिव्यांचा आधार घेणे हा भाग वेगळा. ‘फकफकाट’ केला, इंग्रजीतून शिव्या हासडल्या, अर्वाच्च भाषा वापरली म्हणजे बिनधास्तपणा हा नवा ‘नॅरेटिव्ह’ या आंदोलनातून रूढ झाला. ‘त्यांना विरोध करायचा असेल तर इतरांनाही तसेच बोलावे लागेल’ या सिस्टमच्या वैचारिक सापळ्यात गोव्यातील भाजपवाले पूर्णपणे अडकले. जे कॉंग्रेसवाल्यांनी मोदींना म्हटले नव्हते(विद्यार्थ्यांनी, मुलांनी म्हटले होते) ते राहुल गांधीबाबत बोलून गोव्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘सिस्टम’चा विजय केला. 

ही ‘सिस्टम’ कोणती हे जाणून घेणे फार आवश्यक आहे. या सिस्टमचे नाव आहे ‘सांस्कृतिक मार्क्सवाद’. मार्क्सवाद किंवा साम्यवाद यांचे त्यांच्या आर्थिक सिद्धांतासोबतच राजकीय वजनही संपले. त्यानंतर उदयास आलेली ‘सिस्टम’ म्हणजे सांस्कृतिक मार्क्सवाद. आर्थिक क्रांती शक्य झाली नाही, तेव्हा डाव्या विचारवंतांनी रणनीती बदलली. त्यांनी समाजाची कुटुंबसंस्था, भाषा, परंपरा, नैतिक मूल्ये आणि शिक्षण संस्था मोडून काढण्यावर भर दिला. या विद्यार्थ्यांना आपण जे न घाबरता, बिनधास्त विरोध करतोय असे वाटते तो भ्रम आहे. उलट, बिनधास्तपणा म्हणजे विरोधापासून दूर जात गलिच्छ टीका करणे. अर्वाच्च बोलणार्‍या कुठल्याही विद्यार्थ्यास हा नीट घोटाळा, विद्यार्थ्यांचे नुकसान व त्यावरील उपाययोजना यावर विचार नीटपणे मांडता येणार नाहीत. या पुढे कुठलेही आंदोलन झाले, तर ज्यांच्याविरुद्ध हे आहे, त्यांना शिव्या देणे, अर्वाच्च भाषा वापरणे हा नवीन नियम झाला आहे. ‘संपूर्ण युवावर्ग तसा नाही’, या समाधानात फार काळ राहणे अजिबात परवडणार नाही. वाळवी लागल्यावर ‘किती भाग चांगला उरला आहे’, याचा अभिमान बाळगत बसायचे नसते. 

ज्यांना ही वाळवी लागली आहे, त्या विद्यार्थ्यांवर काहीच, कुठेच कारवाई न करण्याची अट स्वीकारून सरकारने खूप मोठी चूक केली आहे. यूजीसीच्या वेळेसच किंवा दोन दोनदा नीटचे घोटाळे झाल्यावर लगेच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्यापेक्षाही ही चूक फार मोठी आहे. याचे परिणाम केवळ आंदोलनापुरतेच राहणार नाहीत. ते आपल्या घरातही जाणवू लागतील. तो दिवस दूर नाही जेव्हा रागावलेले, विरोधात गेलेले पोरगे किंवा पोरगी ‘पापा का बच्चा रोता है, पापा का ** छोटा है’ म्हणेल किंवा ‘नीम का पत्ता कडवा है’ म्हणत त्यापुढचे वाक्य स्वत:च्याच बापाबद्दल बोलेल, तेव्हाच डोळे उघडणार आहात का? आज सरकारने ‘सिस्टम’समोर लोटांगण घातले आहे, येत्या काळात पालकांना आपल्याच मुलांसमोर ते घालावे लागेल. काहीही झाले तरी विजय ‘सिस्टम’चाच असेल!

रविवार, २६ जुलै, २०२६

लोकशाही जिंकली, अराजकता हरली!

हे लोकशाहीच्या मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करणारे विद्यार्थी आहेत बरे! यांच्यावर एफआयआर नोंदवल्यास व गुन्हे दाखल केल्यास त्यांच्या करिअरचे, आयुष्याचे वाट्टोळे होईल. त्यामुळे, आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यावर कुठेही, कोणतीही कारवाई न करण्याची अट घातली व मानवतावादी दृष्टिकोनातून सरकारने ती सहर्ष मान्यही केली. 

आंदोलक तोंडावर अभद्र बोलत असूनही शांतपणे ड्यूटी करत उभे असलेले, मार खाणारे, दगड खाणारे जे पोलीस होते त्या "नीमच्या कडव्या पत्त्यां"चे कसले मानवाधिकार आणि काय? त्यांना मार खायचाच तर पगार देते सरकार. बिचारा कुणी सामान्य, एकटा माणूस असेल तर त्याच्यावर ते या सगळ्याचा राग  काढतात. तो भारताचा असंघटित नागरिक असतो. त्याच्याकडे कुठे असते राजकीय दबाव निर्माण करणारी हिंसक शक्ती? मग, या असल्या शांततापूर्ण  आंदोलनांची हिंसक घाण पुसण्यासाठी या एकट्यादुकट्या नागरिकाचे पायपुसणे केले जाते. चालायचेच! त्याशिवाय भारत स्वच्छ होणारच नाही. 

भारतात गुन्हा हा तोवर गुन्हा नाही, जोवर त्याच्यामागे सरकारला पायावर लोळण घ्यायला लावणारा हिंसक, राजकीय दबावगट नाही. बाकी, कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कायद्यासमोर सर्व समान आहेत. 

हीच लोकशाही आहे. ती कायमच जिंकते आणि अराजकता कायमच हरते.