सोमवार, २७ जुलै, २०२६

सरकार तुम्हारी है, पर सिस्टम हमारा है!

या पुढे कुठलेही आंदोलन झाले, तर ज्यांच्याविरुद्ध हे आहे, त्यांना शिव्या देणे, अर्वाच्च भाषा वापरणे हा नवीन नियम झाला आहे. ‘संपूर्ण युवावर्ग तसा नाही’, या समाधानात फार काळ राहणे अजिबात परवडणार नाही. वाळवी लागल्यावर ‘किती भाग चांगला उरला आहे’, याचा अभिमान बाळगत बसायचे नसते. ज्यांना ही वाळवी लागली आहे, त्या विद्यार्थ्यांवर काहीच, कुठेच कारवाई न करण्याची अट स्वीकारून सरकारने खूप मोठी चूक केली आहे. याचे परिणाम केवळ आंदोलनापुरतेच राहणार नाहीत. ते आपल्या घरातही जाणवू लागतील. तो दिवस दूर नाही जेव्हा रागावलेले, विरोधात गेलेले पोरगे किंवा पोरगी ‘पापा का बच्चा रोता है, पापा का ** छोटा है’ म्हणेल किंवा ‘नीम का पत्ता कडवा है’ म्हणत त्यापुढचे वाक्य स्वत:च्याच बापाबद्दल बोलेल, तेव्हाच डोळे उघडणार आहात का? आज सरकारने ‘सिस्टम’समोर लोटांगण घातले आहे, येत्या काळात पालकांना आपल्याच मुलांसमोर ते घालावे लागेल. काहीही झाले तरी विजय ‘सिस्टम’चाच असेल!

नीट आंदोलनाच्या यशाचे श्रेय घेण्याची चढाओढ लागली आहे. यात एक ‘सिस्टम’, विचारधारा अजिबात पुढे नाही आणि त्यांनाच या नीट आंदोलनाच्या यशाचे श्रेय जाते. सरकार कायम त्यांच्याचपुढे झुकते व आताही झुकले. हे सरकारचे ‘दोन पावले मागे येणे’, ‘मोदींचा मास्टरस्ट्रोक’ वगैरे अजिबात नाही. हा सरकारचा सपशेल पराभव आहे आणि ‘सिस्टम’चा विजय आहे.

वास्तविक, नीट परीक्षा घोटाळा पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने उपाययोजना आधीच सुरू केल्या होत्या. विद्यार्थी नीटची परीक्षा देऊन पुढच्या मार्गाला लागलेही होते. मग, हे आंदोलन नेमके कशासाठी झाले, हा खरेच एक मोठा प्रश्‍न आहे. समोर आलेली मुख्य मागणी ‘धर्मेंद प्रधान यांचा राजीनामा’ ही होती. ही मागणी यूजीसीच्या वेळी जे लहानसे आंदोलन झाले तेव्हापासूनची आहे. त्याला सरकारने अजिबात भीक घातली नाही. त्या आंदोलनाला देशव्यापी करण्याएवढी ‘सिस्टम’ही त्यामागे नव्हती.  

अभिजित दिपके व सीजेपी यांच्या आंदोलन सुरू करतानाच्या मागण्यांमध्ये प्रधानांचा राजीनामा व आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक भरपाई एवढेच मुद्दे होते. ज्या सोनम वांगचुक यांनी आंदोलनास पाठिंबा दिला त्यांनी भरपाई देण्यासोबत केलेली, ‘संसदेत चर्चा’ ही प्रमुख मागणी योग्य होती. याशिवाय आयसा(ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन)च्या ‘ग्रेस मार्क रद्द करणे’ ही मागणी वगळता, नीट घोटाळ्याशी संबंधित ‘मागण्या’ आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पूर्ण झाल्या होत्या. 

नीट परीक्षा घोटाळ्यातील आरोपींना लवकरात लवकर कठोर कारवाई, पुन्हा असा घोटाळा होऊ नये म्हणून ठोस उपायांची सरकारकडून कार्यवाही हे मुद्देच ‘विद्यार्थ्यांसाठी’ असलेल्या या आंदोलनात नव्हते. हे आंदोलन नीट घोटाळ्याच्या निमित्ताने झाले असले तरी ते विद्यार्थ्यांसाठी अजिबात नव्हते. ‘परीक्षा घोटाळा’ व त्यातून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान हा मुद्दा कधीच नव्हता. कुठलीही वैचारिक बैठक नसलेले अभिजित दिपकेसारखे एक बिनबुडाचे बाहुले ‘सिस्टम’च्या हाती लागले. त्याशिवाय,  एफसीआरए(फॉरेन कॉन्ट्रिब्यूशन रेग्युलेशन अ‍ॅक्ट)मधील कडक नियम, त्यातील सुधारणा आणि त्याअंतर्गत झालेली चौकशी यामुळे दुखावलेले संशोधक सोनम वांगचुक यांचीही साथ लाभली. 

कृषी आंदोलनाच्या वेळी या ‘सिस्टम’चा भाग असलेल्या न्यायव्यवस्थेने स्वत:च नेमलेल्या समितीचा अहवाल मिळाल्यानंतरही केवळ निकाल द्यायला तब्बल आठ महिने घेतले. हा कालावधी निवडणुकांची गणिते जपण्यासाठी सरकारला झुकवण्यास पुरेसा होता. शेवटी तेच झाले. संसदेत संमत झालेले कायदे रस्त्यावरील झुंडशाहीमुळे मागे घेतले गेले. हे आंदोलन सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिले तर यात जे साध्य करायचे होते त्यासाठी पुढे सरसावलेल्यांचे हेतू वेगळेच होते. जे या बाहुल्यांच्या मागे ‘कळसूत्रे’ हालवत होते, ते त्यांचे हेतू, जे रुजवायचे होते ते त्यांनी व्यवस्थित व पद्धतशीरपणे रुजवले. त्यांना नीटशीही काही देणेघेणे नव्हते व विद्यार्थ्यांशीही. विद्यार्थी हे केवळ निमित्त होते. त्यांचा वापर करून जे रुजवले ते भयानक आहे. 

‘देश का युवा रोता है, मोदी का ** छोटा है’ असली बिनडोक घोषणा देणार्‍या मुलींना मोदींसोबत आपलेही चारित्र्यहनन होते याचे भानच उरले नाही. जी गोष्ट पाहिल्याशिवाय, हात लावल्याशिवाय किंवा ‘आत’ घेतल्याशिवाय लहान आहे की मोठी हे कळत नाही, ते या मुलींना कसे कळाले? (क्षमा असावी, पण मज वदवेना स्पष्ट याहुनी भलते). पुढील पिढीच्या हातूनच मागील पिढीबद्दलचा आदर नष्ट करणे, हा ‘सिस्टम’चा हेतू साध्य झाला. विरोध असणे, तो स्पष्टपणे मांडणे हा भाग वेगळा आणि त्यासाठी गलिच्छ भाषेचा, अर्वाच्च शिव्यांचा आधार घेणे हा भाग वेगळा. ‘फकफकाट’ केला, इंग्रजीतून शिव्या हासडल्या, अर्वाच्च भाषा वापरली म्हणजे बिनधास्तपणा हा नवा ‘नॅरेटिव्ह’ या आंदोलनातून रूढ झाला. ‘त्यांना विरोध करायचा असेल तर इतरांनाही तसेच बोलावे लागेल’ या सिस्टमच्या वैचारिक सापळ्यात गोव्यातील भाजपवाले पूर्णपणे अडकले. जे कॉंग्रेसवाल्यांनी मोदींना म्हटले नव्हते(विद्यार्थ्यांनी, मुलांनी म्हटले होते) ते राहुल गांधीबाबत बोलून गोव्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘सिस्टम’चा विजय केला. 

ही ‘सिस्टम’ कोणती हे जाणून घेणे फार आवश्यक आहे. या सिस्टमचे नाव आहे ‘सांस्कृतिक मार्क्सवाद’. मार्क्सवाद किंवा साम्यवाद यांचे त्यांच्या आर्थिक सिद्धांतासोबतच राजकीय वजनही संपले. त्यानंतर उदयास आलेली ‘सिस्टम’ म्हणजे सांस्कृतिक मार्क्सवाद. आर्थिक क्रांती शक्य झाली नाही, तेव्हा डाव्या विचारवंतांनी रणनीती बदलली. त्यांनी समाजाची कुटुंबसंस्था, भाषा, परंपरा, नैतिक मूल्ये आणि शिक्षण संस्था मोडून काढण्यावर भर दिला. या विद्यार्थ्यांना आपण जे न घाबरता, बिनधास्त विरोध करतोय असे वाटते तो भ्रम आहे. उलट, बिनधास्तपणा म्हणजे विरोधापासून दूर जात गलिच्छ टीका करणे. अर्वाच्च बोलणार्‍या कुठल्याही विद्यार्थ्यास हा नीट घोटाळा, विद्यार्थ्यांचे नुकसान व त्यावरील उपाययोजना यावर विचार नीटपणे मांडता येणार नाहीत. या पुढे कुठलेही आंदोलन झाले, तर ज्यांच्याविरुद्ध हे आहे, त्यांना शिव्या देणे, अर्वाच्च भाषा वापरणे हा नवीन नियम झाला आहे. ‘संपूर्ण युवावर्ग तसा नाही’, या समाधानात फार काळ राहणे अजिबात परवडणार नाही. वाळवी लागल्यावर ‘किती भाग चांगला उरला आहे’, याचा अभिमान बाळगत बसायचे नसते. 

ज्यांना ही वाळवी लागली आहे, त्या विद्यार्थ्यांवर काहीच, कुठेच कारवाई न करण्याची अट स्वीकारून सरकारने खूप मोठी चूक केली आहे. यूजीसीच्या वेळेसच किंवा दोन दोनदा नीटचे घोटाळे झाल्यावर लगेच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्यापेक्षाही ही चूक फार मोठी आहे. याचे परिणाम केवळ आंदोलनापुरतेच राहणार नाहीत. ते आपल्या घरातही जाणवू लागतील. तो दिवस दूर नाही जेव्हा रागावलेले, विरोधात गेलेले पोरगे किंवा पोरगी ‘पापा का बच्चा रोता है, पापा का ** छोटा है’ म्हणेल किंवा ‘नीम का पत्ता कडवा है’ म्हणत त्यापुढचे वाक्य स्वत:च्याच बापाबद्दल बोलेल, तेव्हाच डोळे उघडणार आहात का? आज सरकारने ‘सिस्टम’समोर लोटांगण घातले आहे, येत्या काळात पालकांना आपल्याच मुलांसमोर ते घालावे लागेल. काहीही झाले तरी विजय ‘सिस्टम’चाच असेल!

रविवार, २६ जुलै, २०२६

लोकशाही जिंकली, अराजकता हरली!

हे लोकशाहीच्या मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करणारे विद्यार्थी आहेत बरे! यांच्यावर एफआयआर नोंदवल्यास व गुन्हे दाखल केल्यास त्यांच्या करिअरचे, आयुष्याचे वाट्टोळे होईल. त्यामुळे, आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यावर कुठेही, कोणतीही कारवाई न करण्याची अट घातली व मानवतावादी दृष्टिकोनातून सरकारने ती सहर्ष मान्यही केली. 

आंदोलक तोंडावर अभद्र बोलत असूनही शांतपणे ड्यूटी करत उभे असलेले, मार खाणारे, दगड खाणारे जे पोलीस होते त्या "नीमच्या कडव्या पत्त्यां"चे कसले मानवाधिकार आणि काय? त्यांना मार खायचाच तर पगार देते सरकार. बिचारा कुणी सामान्य, एकटा माणूस असेल तर त्याच्यावर ते या सगळ्याचा राग  काढतात. तो भारताचा असंघटित नागरिक असतो. त्याच्याकडे कुठे असते राजकीय दबाव निर्माण करणारी हिंसक शक्ती? मग, या असल्या शांततापूर्ण  आंदोलनांची हिंसक घाण पुसण्यासाठी या एकट्यादुकट्या नागरिकाचे पायपुसणे केले जाते. चालायचेच! त्याशिवाय भारत स्वच्छ होणारच नाही. 

भारतात गुन्हा हा तोवर गुन्हा नाही, जोवर त्याच्यामागे सरकारला पायावर लोळण घ्यायला लावणारा हिंसक, राजकीय दबावगट नाही. बाकी, कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कायद्यासमोर सर्व समान आहेत. 

हीच लोकशाही आहे. ती कायमच जिंकते आणि अराजकता कायमच हरते.

शनिवार, २५ जुलै, २०२६

याचा विचार कराल?

"नीम का पत्ता कडवा है" या नंतरची ओळ जी जंतरमंतरवर मोदींसाठी वापरली गेली, तीच ओळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींसाठी पणजीतील मोर्चात  वापरली. सहभागी एकाही नेत्याने माइकवरून दिल्या जाणार्‍या या घोषणेस बंद करायला सांगितले नाही. 

सार्वजनिक जीवनात, स्थळी काय बोलावे याला मर्यादा असतात. महाराष्ट्रातील विचारवंतांनी, माध्यमांनी भाषणातून दिल्या जाणार्‍या शिव्यांना "ठाकरी भाषा" म्हणून गौरविले. संजय राऊत यांनी एका शिवीचा अर्थ "नॉटी", असा सांगितला होता. आता भाजपच्या कुणी त्या शिवीचा अर्थ "एजन्ट" असा सांगितला नाही, म्हणजे मिळवली. 

काँग्रेसच्या नेत्यांनी या आधी मोदींसाठी जे जे अपशब्द वापरले, तेही अयोग्यच होते व आहेत. "आमच्या नेत्याबद्दल बोलाल तर आम्हीही तेच तुमच्या नेत्याबद्दल बोलू" हा त्यावरचा उपाय नव्हे. सार्वजनिक जीवनात कुणीच ते व तसे  बोलू नये यासाठी उपाय करणे, योजणे गरजेचे आहे. याऐवजी झुंडशाही बळावली आहे. विरोध किंवा समर्थन करण्यासाठी कुठल्या तरी झुंडीचे असणे अनिवार्य झाले आहे. जे चूक आहे ते चूकच आहे, असे म्हणण्याचे धाडस झुंडीत असलेल्यांंना उरत नाही. तसे ते केले तर ती झुंडच त्याला संपवते.   

शिवी किंवा गालिप्रदान हे राग व्यक्त करण्याचे अपवादात्मक साधन आहे. सार्वजनिक ठिकाणी घोषणा देण्याचे नाही. मंचावर, मोर्चात, आंदोलनात जेव्हा याचा वापर केला जातो, तेव्हा अशा गोष्टी "नॉर्मलाइज" केल्या जातात. हे घातक आहे. जे नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या तोंडी होते, तेच आता युवकांच्या व मुलांच्या तोंडीही आले आहे. हे लांच्छनास्पद आहे. 

नेते ते कार्यकर्ते अशी फळी उभी राहते, तेव्हा चारित्र्य वरून खालच्या स्तरापर्यंत झिरपावे लागते आणि कार्य खालच्या स्तरापासून ते नेत्यापर्यंत ऊर्ध्वगामी व्हावे लागते. गणपती हे आपल्याकडे नेता, पुढारी, अधिपती कसा असावा याचे प्रतीकात्मक रूप आहे आणि कार्यकर्ता कसा असावा, याचे प्रतीकात्मक रूप म्हणजे महादेव. गणपतीचे डोळे, कान, सोंड हे सगळे नेत्याकडून अपेक्षित गुण आहेत. महादेवाला संपूर्ण निळा रंगवतात, ते चुकीचे आहे. तो गोरा आहे, कर्पूरगौर आहे. त्याचा फक्त कंठ निळा आहे. हलाहल प्राशन केले तेव्हा ते पोटात घेतले असते, तर मृत्यू ओढवला असता व बाहेर फेकले असते तर जगाचा विनाश ओढवला असता. कार्यकर्ताही असाच असावा लागतो. त्याच्या कार्यातून मिळणारे हलाहल पोटातही घ्यायचे नसते व बाहेरही फेकायचे नसते. 

नेता व कार्यकर्ता होणे म्हणूनच खूप कठीण असते. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यावी लागते. आंदोलनाचे नेते, समर्थक व मोर्चाचे नेते व कार्यकर्ते ती घेतील?

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

विद्यार्थ्यांच्या तोंडी ही भाषा?

या मुलीचे वय काय असावे? ती ज्या घोषणा देतेय किंवा त्याचा अर्धा भाग म्हणतेय व इतर जमलेले तो पुरा करत आहेत, त्याचा अर्थ काय होतो, हे तिला माहीत नाही का? निश्चितच माहीत आहे. ती कुणाला उद्देशून ते म्हणतेय हे महत्त्वाचे नाही, ती तसे म्हणतेय व ते चुकीचे आहे. तो व्हिडिओ न पाहण्यासारखा व न ऐकण्यासारखा आहे. https://x.com/Radhika_Khera/status/2080295061670256787   म्हणून त्याचा फक्त स्क्रीनशॉट घातला आहे.  https://x.com/SaffronQueen_/status/2080204857785319609 ही युवती भारताचे भविष्य असेल तर मग विचारायलाच नको.  https://x.com/BefittingFacts/status/2080503410043076793 या व्हिडिओतील लहान मुलगा जे म्हणतोय किंवा त्याच्याकडून वदवून घेतले जात आहे, ते अक्षम्य आहे. हे सगळे मोदींविरोधात आहे; राहुल गांधींविरोधात असते तरीही ते अजिबात क्षम्य नाही. कुठल्याच व्यक्तीच्या विरोधात हे योग्य नाही. ज्या वयात शिकायचे त्या वयातील पोरांकडून हे म्हणवून घेतले जातेय? 

युवावर्गाच्या तोंडी शिव्या देणे "नॉर्मलाइज" करून ठेवले आहे. हे कूल आहे, असेच त्यांना वाटते. बहुतांश वेबसिरीजमध्ये दर वाक्यागणिक शिव्या हासडल्या जातात. प्रेम व राग व्यक्त करण्याचे ते सशक्त माध्यम म्हणून रुजवले गेले आहे. शिव्या काय कोकणातही, गावातही दिल्या जातात, हे त्याचे समर्थन असू शकत नाही. उद्या याच मुलीच्या आईवडिलांना संबोधताना कुणी असे शिव्या देऊन उल्लेख केले तर याच मुलीला ते चालतील का? हीच मुलगी आपल्या आईवडिलांशी याच अर्वाच्चसूचक भाषेत बोलली व तिचे मित्रमैत्रिणी पुढील वाक्य पुरे करू लागल्या तर आईवडिलांना ते चालेल का? त्यातही इतका बिनडोकपणा चालतो की, एक वयस्क, शहरी बाई "मोदी मेरे ***(इंग्रजीत प्रेमाचे दिवस) पे" म्हणते. https://x.com/dharmendrpatel_/status/2080299393014698271 

हा विरोध नाही, ही निर्बुद्ध विकृती आहे.  

विविध विचारधारेच्या विद्वानांना एकमेकांवर आरोप करताना, मुद्दे खोडून काढताना, आपले मुद्दे मांडताना त्यांच्या तरुण वयातही ऐकले आहे. मुद्दे पटत नसले तरी सांगायची पद्धत आवडायची व त्यामागची तळमळ जाणवायची. त्यांचे न घाबरता व परिणामांची पर्वा न करता बोलणे भावायचे. पण, कितीही राग असला तरी त्यांच्या तोंडी ही गलिच्छ भाषा कधीच नव्हती. आवेगात चुकून आलाच एखादा अपशब्द तर ते आवरायचे. क्षमा मागायचे व पुन्हा बोलू लागायचे. त्यांच्या रागाची तीव्रता पोहोचायची. त्यांचा निर्भिडपणा भिडायचा. 

निर्भीडपणा, बिनधास्तपणा व्यक्त करण्यासाठी शिवी हासडली पाहिजे व ते किती कूल आहे हे वारंवार ठसवले गेले आहे. त्याला प्रतिउत्तर देताना मर्यादा येतात. त्याच पातळीवर जावे लागते किंवा गप्प राहावे लागते. या समस्येला आज उत्तर नाही. याला उत्तर त्यांचीच मुले त्यांना त्याच भाषेत देऊ लागतील, तेव्हा मिळेल. तोवर उशीर झालेला असेल. 


गुरुवार, २३ जुलै, २०२६

नीट आंदोलनाच्या हेतूचे तीन तेरा

विद्यार्थ्यांवर पोलीस अत्याचार करत असल्याचे व्हिडिओ दिल्लीतील आंदोलनाच्या बाजूने असलेले लोक पाठवतात, तर आंदोलनाच्या विरोधात असलेले लोक विद्यार्थ्यांचे असभ्य वर्तन, अश्‍लील व शिवराळ भाषा आणि पोलिसांवर केलेली दगडफेक यांचे व्हिडिओ पाठवतात. मूळ मुद्दा काय होता, याचाच सर्वांना विसर पडला आहे. हे आंदोलन नीट न हाताळले गेल्यामुळे त्याच्या हेतूचेच तीन तेरा वाजले आहेत. 

मुळात आंदोलन सुरू झाले होते ते नीट परीक्षा घोटाळा, त्यातून झालेल्या आत्महत्या व त्यांची नैतिक जबाबदारी घेत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची. तीनही मुद्दे अगदी बिनतोड व रास्त होते. पण, आंदोलन ज्या दिशेने गेले ते पाहता, त्यातील मूळ महत्त्वाच्या मुद्द्यांशी कुणालाच काहीच सोयरसुतक उरले नाही.  

आंदोलनादरम्यान हवशे, नवशे व गवशे जे काही बडबडत होते, त्याचा आणि नीटचा काडीइतकाही संबंध नव्हता. एकही दिवस त्यावरील उपाययोजना, त्यांचा आराखडा यावर चर्चा गाजली नाही. प्रत्येक असंबद्धाचे अजेंडे मात्र गाजले. ‘माय जेंडर माय चॉइस’, ‘सीताचा पती-नीताचा पती’, अर्धा कापलेला टीशर्ट घालून नाचणारे बाईच्या वेषातील पुरुष, अर्वाच्च शिव्या, दगडफेक, राजकीय वक्तव्ये, बोलावून आलेले राज्यकर्ते आणि बरेच काही. आंदोलन परीक्षा-घोटाळाविरोधी न राहता सरकारविरोधी झाले. 

‘नीट’ ही परीक्षा जेव्हा ‘ऑल इंडिय प्री-मेडिकल टेस्ट’ (एआयपीएमटी) होती, तेव्हाही २०१५साली त्यात पहिला मोठा घोटाळा उघडकीस आला होता. त्यावेळेसही सहा लाख विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा द्यावी लागली होती. त्यावेळेस स्वतंत्र शिक्षण मंत्रालय नव्हते, ते खाते तेव्हा तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे होते. घोटाळा झाला त्यानंतर त्याचे नाव बदलून ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्टरन्स टेस्ट) करण्यात आले. २०१६साली नीट परीक्षा झाली तेव्हाही पेपरफुटीचे आरोप झाले होते पण फेरपरीक्षा झाली नाही. त्यानंतर हे खाते प्रकाश जावडेकर यांच्याकडे आले व त्यानंतर ते धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे आहे. धर्मेंद्र प्रधान शिक्षणमंत्री असतानाही नीट परीक्षेमध्ये दोनदा घोटाळे झाले. 

२०१५ ते २०२६ या अकरा वर्षांच्या कालावधीत एआयपीएमटी व नंतर नीट परीक्षा घोटाळ्यांची मूळ कार्यपद्धती बहुतांशी तीच आहे. उलट, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ती आता अधिक ’हाय-टेक’ आणि वेगाने पसरणारी झाली आहे. पूर्वी कर्मचारी, अधिकारी एवढ्यापुरता प्रामुख्याने मर्यादित असलेल्या या घोटाळ्याची व्याप्ती आता कोचिंग-क्लास माफिया, संस्थागत टोळ्या व विद्यार्थी एवढी वाढली आहे. ती अधिक शिस्तबद्ध झाली आहे. पूर्वी हरियाणा व मध्य प्रदेशातील टोळ्या होत्या, त्यात आता महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान असे बहुराज्यीय संघटित स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यावर असंख्या राजकारणी, शिक्षक, विद्यार्थी, कोचिंगवाल्यांचे पोट भरते. 

या संघटित टोळ्यांचे कायदेशीर संरक्षण करणारी व्यवस्था म्हणजे परीक्षा केंद्र. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि व्यावसायिक संस्था या सहकार कायद्यांतर्गत येतात किंवा खाजगी ट्रस्टद्वारे चालवल्या जातात. परीक्षा घेणार्‍या या संस्थांवर एनटीए किंवा यूजीसेचे थेट नियंत्रण नसते. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्यास, एनटीए त्या संस्थेची मान्यता थेट रद्द करू शकत नाही; कारण ती मान्यता राज्य शिक्षण मंडळ किंवा सहकार विभागाकडून मिळालेली असते. याच कायदेशीर पळवाटेचा फायदा परीक्षा घोटाळे करणारे घेतात. हे परीक्षा घोटाळा करणारे विविध राजकीय पक्षांशी जोडलेले असतात. त्यामुळे, सगळे राजकीय पक्ष या मुद्द्याचे राजकरण करण्यास टपलेले असतात. 

सध्या नीट परीक्षा ओएमआर शीटवर ऑफलाइन पद्धतीने एकाच दिवशी घेतली जाते. यामुळे लाखो प्रश्नपत्रिकांची छपाई आणि वाहतूक करावी लागते, जिथे पेपर लीकचा धोका सर्वाधिक असतो. जेईई परीक्षेप्रमाणे नीट परीक्षादेखील ऑनलाइन व विविध टप्प्यांत घेतली गेल्यास भौतिक स्वरूपात पेपर लीक होण्याची शक्यता संपुष्टात येईल. रँडम पेपर प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाल्यास पेपरी लीक होऊन त्याचा लाभ घेणेच कठीण होईल. विद्यार्थी स्वत:च परीक्षा देतोय याची खात्री करण्यासाठी ‘बायोमेट्रिक’ व्यवस्था व त्याच्यामिश्रणातून कोड जनरेशनची व्यवस्था असायला हवी. म्हणजे उत्तरपत्रिकी कुणाची हे ओळखण्याची काहीच सोय उरता कामा नये. याशिवाय सर्व परीक्षा केंद्रांचे सरकारीकरण करणे अत्यावश्यक आहे. यूपीएससी किंवा जेईईप्रमाणे पात्रता परीक्षा व मुख्य परीक्षा अशा दोन भागांत परीक्षा घेतल्यास एकाच परीक्षेत पुढील भविष्य ठरण्याची भीतीही कमी होईल. या उपायांचे प्रत्येक परीक्षेनंतर पुनरावलोकन होणेही गरजेचे आहे. 

हे उपाय पहिला परीक्षा घोटाळा उघडकीस आला तेव्हाच होणे गरजेचे होते. पण, प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याची सवय लागलेल्यांना प्रश्‍न सुटणे गैरसोयीचे ठरते. आतासुद्धा धर्मेंद्र प्रधान जाऊन जितेंद्र प्रधान आला काय किंवा बीजेपी जाऊन सीजेपी आली काय, नीट परीक्षा पद्धतीतच बदल केले जात नाहीत, तोवर घोटाळे होतच राहणार. 

सामाजिक, शैक्षणिक मुद्दा असलेली आंदोलने जेव्हा राजकीय शय्यासोबत करू लागतात, तेव्हा नव्या औरस व अनौरस पक्षांचा जन्म होण्यापलीकडे फारसे काही हाती लागत नाही. भ्रष्टाचार विरोधात अण्णा हजारेंनी आंदोलन केले, आम आदमी पक्षाचा जन्म झाला; पण, भ्रष्टाचार सुरूच आहे. तो संपवण्यासाठी करायची उपाययोजना यावर विचार व कृती झालीच नाही. आताही या आंदोलनातून सीजेपीचे राजकीय बारसे होईल. नीट व अन्य परीक्षांचे घोटाळे सुरूच राहतील. जी आंदोलने, चळवळी मूळ मुद्द्याशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिली, तीच सफल झाली आहेत. बाकी सगळी आंदोलने राजकारण्यांची पायपुसणी झाली.

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची दिशा, ‘नीट घोटाळा पुन्हा होऊ नये’ या वाटेने न जाता ‘सरकार उलथवून टाकणे’ याकडे वळली आहे. अगदी मोठमोठे विचारवंतही मूळ प्रश्‍नाचे योग्य उत्तर मांडण्याऐवजी रस्त्यावर उतरून आंदोलनातून मार्ग काढण्यास जास्त महत्त्व देतात. या विचारवंतानी लोकांचे ‘रस्त्यावर येणे’ प्रतिष्ठित करून ठेवले आहे. यातून फार फार तर मंत्रिपदाची खांदेपालट घडेल किंवा सत्तापरिवर्तन होईल. पण, मूळ प्रश्‍न काही केल्या सुटणार नाही. उलट, ज्या तोंडी विद्या व हाती लेखणी असायला हवी, त्या तोंडी शिव्या व हाती दगड मात्र आले आहेत!

मंगळवार, २१ जुलै, २०२६

आंदोलनांचे हेतू, कृती व परिणाम

सोनम वांग्चुक यांच्या आंदोलनाचे, उपोषणाचे जे व्हायचे तेच झाले. उपोषणास बसलेल्या माणसासमोरच समर्थक जेवणावर ताव मारू लागले तेव्हाच या उपोषणामागचा हेतू व त्याचे परिणाम यांची कल्पना आली होती. ‘हाय क्या लोग मेरा साथ निभाने निकले’, असे अमजद इस्लाम अमजद जे एका गझलमध्ये म्हणतो, नेमकी तीच भावना सोनम यांची झाली असावी. थोडेसे कठोर वाटेल, पण यात त्यांचा मृत्यूच अनेकांना अपेक्षित होता. सोनम यांच्या हौतात्म्यावरच पुढची वाटचाल अवलंबून होती. जेव्हा क्रांती किंवा आंदोलन हे 'सामूहिक त्यागावरून' घसरून केवळ 'एकाच माणसाच्या त्यागावर' अवलंबून राहते, तेव्हा त्या आंदोलनाचा पराभव किंवा शोकांतिका आधीच ठरलेली असते.

सोनम वांग्चुक यांच्या आंदोलनाचे, उपोषणाचे जे व्हायचे तेच झाले. उपोषणास बसलेल्या माणसासमोरच समर्थक जेवणावर ताव मारू लागले तेव्हाच या उपोषणामागचा हेतू व त्याचे परिणाम यांची कल्पना आली होती. ‘हाय क्या लोग मेरा साथ निभाने निकले’, असे अमजद इस्लाम अमजद जे एका गझलमध्ये म्हणतो, नेमकी तीच भावना सोनम यांची झाली असावी. थोडेसे कठोर वाटेल, पण यात त्यांचा मृत्यूच अनेकांना अपेक्षित होता. सोनम यांच्या हौतात्म्यावरच पुढची वाटचाल अवलंबून होती. जेव्हा क्रांती किंवा आंदोलन हे 'सामूहिक त्यागावरून' घसरून केवळ 'एकाच माणसाच्या त्यागावर' अवलंबून राहते, तेव्हा त्या आंदोलनाची शोकांतिका आधीच ठरलेली असते. यातून कुणाचे काय साधते, हाच खरा प्रश्न आहे. 

आंदोलनाचा हा सगळा प्रवास, त्यातल्या चित्रविचित्र कठपुतळ्या पाहिल्या आणि त्यामागे असलेल्या अदृश्य हातांची जाणीव झाली. उपोषण इतके दिवस लांबले तरी सरकारचे त्यात हस्तक्षेप न करणे, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अपेक्षित गर्दी न जमणे, दिपके यांचे अनेकांना त्यासाठी आवाहन करणे, अनेक राजकीय व्यक्तींचे तिथे येणे-जाणे, त्यांच्या घोषणा, सैनी यांचे जनहित याचिका दाखल करणे, न्यायालयाने त्यांना इस्पितळात हलवण्याचा आदेश देणे, अन्य पर्याय नसल्याने सरकारचे त्यांना इस्पितळात हलवणे, याच दरम्यान अनेक ठिकाणाहून लोकांची लाखोंच्या संख्येने जंतरमंतरला धाव घेणे, संसद उखडून टाकण्याची भाषा करणे, ‘धर्मेश प्रधानचा राजीनामा नकोच सरकारच उलटवू’, अशा घोषणा देणे, हा सगळा घटनाक्रम पाहिला तर अनेक अदृश्य वर्तुळे व हात दिसू लागतात.

पर्यावरण, लडाख ते नीटचा घोटाळा व धर्मेश प्रधान यांचा राजीनामा हा प्रवास काही विचित्र संकेतांकडे बोट दाखवतो. सोनम वांग्चुक यांचे पर्यावरणाचे मुद्दे, त्यांनी त्यासाठी केलेले प्रयोग व त्यांचे प्रामाणिक हेतू याविषयी शंका घेण्याचे अजिबात कारण नाही. त्यांना देशद्रोही वगैरे ठरवण्याचेही काहीच कारण नाही. त्यांची पर्यावरणाची तळमळही न्याय्यच आहे. त्यांचे त्यासाठी सरकारविरुद्ध उभे ठाकणे हेही योग्यच आहे. खरी समस्या इथून पुढे सुरू होते. इथवरचे वर्तुळ हे स्थानिक व योग्य असते. यानंतर अनेक वर्तुळे सुरू होतात व त्यातील अनेकांचा अदृश्य सहभाग कृतीची दिशा ठरवतो आणि परिणाम त्यांना हवे तसेच घडत जातात. या लोकांच्या कृतीला विरोध म्हणजे प्रामाणिक हेतू असलेल्या व्यक्तीस व त्याच्या कार्यास विरोध असे हीच माणसे पद्धतशीरपणे पसरवतात. 

सोनम वांग्चुक यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ येणार्‍यांचा प्रमुख व एकमेव मुद्दा हाच असायला हवा होता की, ‘नीट परीक्षा घोटाळा व धर्मेश प्रधान यांचा राजीनामा’. पण, ते सोडून तिथे सगळे सुरू होते. उपोषणस्थानी जेवणे, एलजीबीटींचे हिडीस नाचणे, ‘बस नाम रहेगा अल्लाह का’ म्हणणे, मूळ मुद्दा सोडून राजकारण्यांची त्यांच्या सोयीची वक्तव्ये करणे, हे सर्व प्रकार तिथे यथेच्छ घडले. प्रत्येक जण तिथे आपापले हेतू घेऊनच सामील होत होता. ज्या हेतूसाठी उपोषण सुरू झाले त्याचे कुणालाच सोयरसुतक नव्हते. हे सगळे हवशे, नवशे आणि गवशे तिथे स्वत:ची प्रसिद्धी करायला आले होते. 

जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळण्याच्या नादात अशी अनेक आंदोलनांचा व तळमळ असलेल्या प्रामाणिक माणसांचा गैरवापर झाला आहे. भारतातील याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ‘नर्मदा बचाव आंदोलन’! एकट्या अमेरिकेत ९०,०००पेक्षा जास्त लहान-मोठी धरणे बांधली गेली आहेत. युरोपमधील नद्यांवरही प्रचंड प्रमाणात धरणे बांधून त्यांनी सिंचन आणि जलविद्युत क्षेत्रात स्वयंपूर्णता मिळवली आहे. भारताचे ’सरदार सरोवर’ असो किंवा इथिओपियाचे ’ग्रँड रेनेसां डॅम’ असो, आंतरराष्ट्रीय एनजीओ आणि जागतिक बँकेने विकसनशील देशांमधील मोठ्या प्रकल्पांना पर्यावरणविरोधी ठरवून त्यांचा निधी रोखला. परंतु, अमेरिका किंवा युरोपातील अशा मोठ्या धरणांना हटवण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी कधीही जागतिक पातळीवर अशा तीव्र मोहिमा चालवल्या गेल्या नाहीत. अन्यत्र जिथे कोळसा निर्मितीस पर्यावरणाच्या नावावर प्रचंड मोठा विरोध केला जातो, तिथेच युरोपमध्ये ऊर्जेचे संकट निर्माण झाले, तेव्हा जर्मनीने स्वतःचे बंद केलेले कोळसा प्रकल्प पुन्हा सुरू केले. एवढेच नाही, तर ’लुत्झराथ’ हे संपूर्ण गाव उद्ध्वस्त करून तेथे ’गार्झवाइलर’ या कोळशाच्या महाकाय उघड्या खाणीचा विस्तार केला. युगांडा आणि टांझानिया दरम्यान होणार्‍या ’ईस्ट आफ्रिकन क्रूड ऑइल पाइपलाइन’ या प्रकल्पाविरोधात युरोपियन युनियनची संसद आणि आंतरराष्ट्रीय एनजीओंनी प्रचंड मोहीम चालवली आणि आफ्रिकेने तेलाचा वापर करू नये असा सल्ला दिला. अगदी त्याच काळात, अमेरिकेने अलास्कासारख्या अत्यंत संवेदनशील पर्यावरणीय भागात ’विअलो प्रोजेक्ट’ या महाकाय तेल उत्खनन प्रकल्पाला मंजुरी दिली. तमिळनाडूमधील ’कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पा’विरोधात अनेक वर्षे तीव्र आंदोलने झाली. फ्रान्स आपल्या एकूण विजेपैकी सुमारे ७०% वीज अणुऊर्जेपासून तयार करतो. संपूर्ण युरोप आणि अमेरिकेत शेकडो अणुभट्ट्या गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत आहेत. त्यांच्याविरोधात तोंडीलावण्यापुरता विरोध होतो. पण, विकसनशील देशांतील प्रकल्पांना मात्र पर्यावरणाचे कारण पुढे करून तीव्र विरोध होतो, त्याला लगेच आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी दिली जाते.

सोनम वांग्चुक हे मूलत: राजकीय नेते नसून एक 'गांधीवादी विचारवंत आणि संशोधक' आहेत. त्यामुळे, आपला वापर होऊ न देता कार्य सिद्धीस नेणे त्यांना जमत नाही. वांग्चुक यांच्या लडाखमधी बर्फाच्या प्रकल्पात प्लास्टिकचा अतोनात वापर झाला तेव्हा पर्यावरणाची हानी झाली नाही. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिथे कुठलाही प्रकल्प सुरू होतो, तेव्हा मात्र पर्यावरणाची हानी होते व ती आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजते. हे उगाच घडत नाही. सोनम यांची तळमळ चुकीची आहे का? निश्‍चितच नाही, पण त्यांचा होणारा आंतरराष्ट्रीय वापर त्यांना टाळता येत नाही, हे वास्तव आहे. वास्तविक कुठलाही व्यावसायिक लाभाचा प्रकल्प होण्यास विरोध करून पर्यावरणाची हानी झाली तरीही राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रकल्पांना सोनम वांग्चुक यांनी पाठिंबा देणे रास्त ठरले असते. 

पर्यावरण, सामाजिक कार्य, मानवाधिकार, आदी क्षेत्रांत कार्यरत असणारी माणसे त्यांच्या हेतूशी निश्‍चितच प्रामाणिक असतात. पण, त्यांचा हेतू जेव्हा आंदोलनाचे रूप घेतो, तेव्हा त्यावरचा त्यांचा ताबा सुटतो. सोनम वांग्चुक यांचा पर्यावरण रक्षणाचा हेतू निश्‍चितच प्रामाणिक आहे. पण, त्यांनी जे उपोषण व आंदोलन आरंभले ते त्यांच्या ताब्यात राहिले नाही. सरकारलाही हे प्रकरण चिघळलेलेच हवे होते. विरोधकांच्या ‘हाता’सही ‘गवताची मुळे’ घेऊन ‘झाडू’ मारत ‘झुरळां’ना जागा करून द्यावी, असे ‘आप’ले वाटले. ज्या ‘नीट’च्या घोटाळ्यामुळे हे सुरू झाले, ती परीक्षा होऊन त्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवासही सुरू झाला आहे. हा घोटाळा नेमका कसा झाला, तो पुन्हा होऊ नये व अभ्यास करणार्‍या गुणवान विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काय होणे अपेक्षित आहे, याचा विचार झालाच नाही. तसा तो होणे कुणाच्याच सोयीचे नाही. त्याऐवजी आंदोलन व उपोषण सर्वांची पोटे भरणारे ठरते! 

त्यामुळे, उपोषणामागील हेतूची तळमळ अप्रामाणिक नाही, हेतूही नाही. कृती ताब्यात न राहिल्याने व त्यात संबंध नसलेल्यांचे हेतू घुसल्याने परिणाम मूळ हेतूनुसार होत नाहीत. यातून काहीच साध्य होत नाही किंवा भलत्यांचेच साधते.


शनिवार, १८ जुलै, २०२६

बस नाम रहेगा अल्लाह का?

सीजेपीच्या आंदोलनात सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला आलेल्या नंदिता नारायण यांनी ‘नाम रहेगा अल्लाह का..’ या ओळी मुद्दाम व जाणीवपूर्वक म्हटल्या. त्यांनी नंदिता राशिद अन्सारी हे पूर्ण नाव सांगून त्या ओळींचा अर्थ सांगितला असता, तर कदाचित कुणीच त्याकडे लक्षही दिले नसते. तिने ‘नाम रहेगा अल्लाह का’ म्हणणे यावर आक्षेप अजिबात नाही; ती जो त्याचा अर्थ सांगते व स्वत:च्या सांगण्याचे समर्थन करते ते केवळ चुकीचेच आहे, असे नव्हे तर घातकही आहे.

सीजेपीच्या आंदोलनात सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला आलेल्या नंदिता नारायण यांनी ‘बस नाम रहेगा अल्लाह का..’ या ओळी मुद्दाम व जाणीवपूर्वक म्हटल्या. त्यांनी नंदिता राशिद अन्सारी हे पूर्ण नाव सांगून त्या ओळींचा अर्थ सांगितला असता, तर कदाचित कुणीच त्याकडे लक्षही दिले नसते. तिने ‘बस नाम रहेगा अल्लाह का’ म्हणणे यावर आक्षेप अजिबात नाही; ती जो त्याचा अर्थ सांगते व स्वत:च्या सांगण्याचे समर्थन करते ते केवळ चुकीचेच आहे, असे नव्हे तर घातकही आहे.

फैज अहमद फैज या पाकिस्तानी कवीची ‘लाज़िम है कि हम भी देखेंगे’ या नज्म(कविता)मधील ती ओळ आहे. डाव्यांची ही अतिशय आवडती कविता आहे व जिथे त्यांची सत्ता नाही, तिथे ही कविता ते म्हणतातच. नंदिता यांनी खास करून ही ओळ म्हणण्यामागेही ‘या ओळीचा सर्वांत जास्त त्रास उजव्या विचारसरणीच्या लोकांना होतो’ हेच कारण आहे. त्यांनी त्यानंतर जो अर्थ सांगितला आहे; न त्याचा काही संबंध वेदान्त तत्त्वज्ञानाशी आहे, ना ‘अहं ब्रह्मास्मि’ याच्याशी. आधीच्या कडव्यातील ओळी फार महत्त्वाच्या आहेत : 

जब अर्ज़-ए-ख़ुदा के काबे से
सब बुत उठवाए जाएँगे

(अल्लाहची जमीन असलेल्या काबामधून जेव्हा सर्व मूर्ती काढून टाकल्या जातील) ‘अर्ज़-ए-ख़ुदा’ म्हणजे अल्लाहची भूमी, जमीन, काबा हा प्रदेश. बुत म्हणजे मूर्ती. 

यात डावे असे सांगतात, की फैज अहमद फैज हे स्वतः कम्युनिस्ट (नास्तिक/डाव्या) विचारसरणीचे कवी होते. त्यांनी ही नज्म पाकिस्तानचे हुकूमशहा जनरल झिया-उल-हक यांच्या विरोधात लिहिली होती. जगात कुणीही मुसलमान कितीही डावा असला, तरी तो कधीच अल्लाह व इस्लामच्या विरुद्ध लिहीत नाही. डावे सांगतात तोच अर्थ जरी धरला तरी फैज झिया-उल-हकला मूर्तिपूजक म्हणतोय. दोघांचेही सुन्नी मुसलमान असणे, आड येत नाही. अल्लाहपेक्षा स्वत:ला मोठा समजणारा म्हणून तो झिया-उल-हकवर टीका करतोय. त्याचे राज्य जाऊन लोकशाही यावी असे म्हणत नाही. मूर्तिपूजक(मुसलमान असूनही) असलेल्या झिया-उल-हकची सत्ता जाऊन अल्लाहशी प्रामाणिक असलेल्या लोकांची (अहल-ए-सफा) सत्ता येईल, असे पुढे फैज म्हणतो. हे ‘अहल-ए-सफा’, ‘असहब-ए-सुफ़्फ़ा’ यावरून आलेले आहे. ‘असहब’ म्हणजे अनुयायी, साथीदार व मित्र आणि ’सुफ़्फ़ा’ म्हणजे चबुतरा किंवा ओटा. मदिनेतील मशिदीच्या (मस्जिद-ए-नबवी) मागील बाजूस प्रेषित मोहम्मद यांनी गरीब, निर्वासित आणि घरदार नसलेल्या अनुयायांसाठी एक सावलीचा ओटा (सुफ़्फ़ा) बनवला होता. तिथे राहून जे लोक केवळ कुराण शिकायचे आणि अहोरात्र प्रार्थना करायचे, त्यांना ’असहब-ए-सुफ़्फ़ा’ म्हणतात. त्यावरूनच कदाचित 'सुफी' हा शब्द आला असावा. अशा लोकांची सत्ता येईल व मूर्तिपूजक असलेल्या झिया-उल-हक यांची सत्ता जाईल, असा त्याचा अर्थ आहे. 

झिया-उल-हक हा हुकूमशहा होता, त्यामुळे त्याविरुद्ध लिहिलेली ही कविता आहे, असे सांगितले जाते. डावे जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा ते सत्तेत असलेल्यांना ‘हुकूमशहा’, ‘नाझी’, ‘हिटलर’, ‘फासिस्ट’ अशी बिरुदे लावतात. डाव्यांची सत्ता जिथे असते, तिथल्या हुकूमशहांविरुद्ध एक अक्षर ते काढत नाहीत. तिथे ‘नाम रहेगा अल्लाह का’ म्हणत नाहीत. फैज यांनी झिया-उल-हक यांच्याविरुद्ध लिहिले; पण, तेच काम रशियात स्टॅलिन करत होता, त्याविरुद्ध एक शब्द लिहिला नाही. त्यामुळे, जुलमी हुकूमशाही जाऊन लोकांचे राज्य येऊ दे, अशी भावना त्यामागे अजिबातच नाही व तसा त्याचा मूळ संदर्भही नाही. 

दुसरा एक तर्क हे डावे देतात त्याचा संदर्भ याच कवितेतील दुसर्‍या कडव्यात आहे. 

उठ्ठेगा अनल-हक़ का नारा
जो मैं भी हूँ और तुम भी हो

अनल-हक़ हा शब्द अना(मी) + अल् (तो) + हक़ (अल्लाह किंवा सत्य) मिळून ’अनल-हक़’ हा शब्द बनतो. पण, इस्लाम ‘मी अल्लाह’ हा विचार मानतच नाही. अगदी सुफीही ’सर्व काही देव आहे’ असे म्हणत नाहीत; उलट ते ’फक्त एका अल्लाहचेच अस्तित्व खरे आहे’, असे म्हणतात (’वह्दत-उल-वुजूद’). आपल्याकडेही अनेक विचारवंतांचा हाच घोळ आहे. ‘सगळे देव सारखे आहेत’, असे ख्रिश्‍चनिटी व इस्लामचे म्हणणे आहे, असे ते सांगतात. ख्रिश्‍चनिटी व इस्लाम असे कधीच म्हणत नाही. ते म्हणतात ‘देव येकूच. राम कृष्ण आहाय पोळोय ते देव न्हूय, ते सोंत’(देव एकच आहे. राम, कृष्ण वगैरे देव नव्हे, ते संत). 

‘सगळे देव सारखे’ आणि ‘देव एकच आहे’ यात जो फरक आहे, तोच ‘अनल-हक़’ व ‘अहं ब्रह्मास्मि’मध्ये आहे. अहं ब्रह्मास्मि याचा अर्थ मीच ब्रह्म आहे असा होतो. हे सत्य जाणण्यासाठी कोणत्याही विश्वासाची किंवा देवावर श्रद्धा ठेवण्याची गरज नसते. माझ्यातील जाणीव आणि संपूर्ण विश्‍वात भरून राहिलेली जाणीव (शुद्ध चैतन्य) एकच आहे, वेगळी नाही. अनल-हक़ची भाषा करणारा सूफीवादी साधक स्वतःला अल्लाह मानत नाही. एक अद्वैत विचार आहे, तर दुसरा विचार द्वैत आहे. दोन्ही वेगळे आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा: अल्लाह म्हणजे देव; पण ब्रह्म म्हणजे देव नाही. जेव्हा इस्लाम ‘एकच अल्लाह आहे, त्याशिवाय अन्य कुणीच नाही’ असे म्हणतो तेव्हा तो वेदान्ती किंवा हिंदू ज्याला ‘ब्रह्म’ म्हणतात त्याबद्दल बोलत नाही; तो देवाबद्दल बोलतो. आपल्याकडे देव व धर्म वेगवेगळे आहेत. आपल्याकडे देव देव करणारा अधार्मिक असू शकतो व देवालाही न मानणारा धार्मिक असू शकतो. अल्लाहला व कुराणला न मानणारा मुसलमान असू शकेल का? 

डावे विचारवंत दोन्ही गोष्टी एकच म्हणतात, पण त्या तशा नाहीत. त्यातील मूलभूत फरक ओळखून त्यांच्यापासून सावध राहणे आवश्यक आहे. डावे हे डावेच असतात; ते कधीही ‘प्राणिप्रेमी’, ‘पर्यावरणप्रेमी’, ‘मानवतावादी’, ‘लोकशाहीवादी’, ‘सत्तेविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणारे’, ‘विज्ञाननिष्ठ’, ‘नास्तिक’ वगैरे नसतात. असलेच तर जिथे सत्ता नाही तिथेच असतात. डावे विचारवंत जेव्हा लोकशाही देशात किंवा इतर राजवटींमध्ये असतात, तेव्हा ते ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’, ‘लोकशाही’, आणि ‘मानवी हक्कां’चे सर्वांत मोठे कैवारी बनतात. स्वतःची सत्ता आल्यानंतर ते सर्वांत आधी याच स्वातंत्र्याचा गळा घोटतात. जिथे गळा कापला जाण्याची शक्यता असते तिथे तो काढत नाहीत आणि जिथे तशी शक्यता अजिबातच नसते तिथे ‘नाम रहेगा अल्लाह का’ जोरजोरात म्हणतात!