भारताचे पंतप्रधान मोदी यांनी ‘मोठ्या मनाने’ विद्यार्थ्यांना, तरुण-तरुणींना माफ केले. या मुलांनी त्यांना ‘मादर*द’, ‘मेलोडी के चू*मे घुसे हुए बहन के *डे’ असे म्हटले व तरुणांचा व्यवस्थेविरुद्धचा उद्रेक म्हणून ते खपवलेही गेले. मुलांना माफ करण्यावाचून सरकारकडे अन्य कोणताही पर्याय नव्हता. जिथे अपशब्द उच्चारणार्या, दगड फेकणार्या, संसद भवनावर चाल करून जाणार्या एकाही विद्यार्थ्याविरुद्ध जराही कारवाई न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालय देते, तिथे माफ करण्यावाचून अन्य पर्याय उरतच नाही. प्रश्न संस्कृती बुडाली का? लै संस्कृती संस्कृती करणार्यांनी लहान मुलांना ट्रोल करू नये, वगैरे सगळे ज्ञान पाजळले जाते. तरुणांच्या या अशा भाषेचा, व्यक्त होण्याच्या पद्धतीचा उगम कशात आहे, हा खरा प्रश्न आहे. भारत सरकार त्यावर काय कारवाई करते? की युरोपसारखी संस्कृतीरक्षणाची स्थिती ओढवल्यावर जागे होणार आहे, कोण जाणे!
अनियंत्रित वेब सिरीज, त्यातील भाषा व तिचे ‘अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य’ म्हणत केलेले समर्थन, ‘दगडफेकीची, हिंसाचाराचीच दखल घेतली जाते’, ‘निर्भीड, बिनधास्त मत व्यक्त करायचे तर शिव्याच दिल्या पाहिजेत’, हे प्रस्थापित केलेले दोन नॅरेटिव्ह या सर्वांचा एकत्रित पगडा या मुलांवर होता. आता हे नॅरेटिव्ह कुणी प्रस्थापित केले, हा खरा मुद्दा आहे. हे नॅरेटिव्ह प्रस्थापित केले ते सांस्कृतिक मार्क्सवादींनी. हे लोक सरकारात, विरोधकांत, विद्यार्थ्यांत, न्यायव्यवस्थेत, मीडियात सर्वत्र मोठ्या संख्येने आहेत.
कुटुंबसंस्था, भाषा, परंपरा, नैतिक मूल्ये आणि शिक्षण संस्था मोडून काढणे हेच तर सांस्कृतिक मार्क्सवादाचे ध्येय आहे. प्रत्येक कॉम्रेड तसाच वागतो आणि तेच इतरांना शिकवत राहतो. कॉम्रेड अरुंधती रॉय आपल्या वडिलांना ‘*तिया’ म्हणाली होती, हे तिनेच हल्ली एका मुलाखतीत सांगितले. हाच ‘बिनधास्तपणा’ असे तरुणांना व्यवस्थित शिकवले जाते. आपल्या संस्कृतीतील प्रत्येक अभिमानाच्या गोष्टीचा अपमान करणे म्हणजे ‘पुरोगामीपण’ हे ठसवले जाते.
‘कुणाविरुद्ध कोण आहे?’ याचे अजिबात देणेघेणे यांना नसते. जो कमकुवत दिसेल त्याच्यामागे राहतात; तो वरचढ झाला, की विरुद्ध बाजूने लढतात. कायम संघर्ष हेच ध्येय असते. यांना उत्तरे नकोच असतात, फक्त प्रश्न उपस्थित करत राहणे हेच यांचे काम असते. याला ते ‘प्रश्न विचारा’ किंवा ‘क्रिटिकल थिअरी’ म्हणतात. पण, स्वत:स कधीच प्रश्न विचारू देत नाहीत.
इतरांची अकाउन्टिबिलिटी विचारत फिरणारा सौरभ दास, उत्पन्नाचा ज्ञात स्रोत नसतानाही दिल्लीच्या एलीट एरियात महिना किमान ८ लाखांचे भाडे कसे काय देतो? हा प्रश्न एकही पत्रकार त्याला विचारत नाही. कारण, सांस्कृतिक मार्क्सवादी व त्यांचे समर्थन असलेल्यांना प्रश्न विचारणे चुकीचे असते, ते कुणाबद्दलही, काहीही बोलू शकतात.
या मुलांना पुढे काढून तसे बोलायला लावणारे कोण आहेत, ते शोधून त्यासाठी त्यांना जबाबदार धरणे गरजेचे आहे. शिवी देणारा, दगडफेक करतानाचा प्रत्येक व्हिडिओ पाहा; व्हिडिओ कोण काढत आहे, हे कुणालाच माहीत नाही. शिव्या हासडणार्या सात आठ वर्षांच्या मुलाचे कौतुक कोण करत होते व त्याला प्रोत्साहन कोण देत होते, हे शोधून काढणे गरजेचे आहे. मुलांसोबत यांना माफ करणे परवडणार नाही.
मुलांना माफ करून प्रश्न सुटणार नाही. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना होणे गरजेचे आहे. ‘आपण कुणालाही काहीही बोलू शकतो’, हे स्वातंत्र्य नाही याची तरी निदान त्यांना जाणीव झाली पाहिजे. त्यासाठी या विद्यार्थ्यांमागील जे एक वर्तुळ कार्यरत होते, ते सरकारने सर्वांसमोर आणावे. ज्या मुलांनी, मुलींनी शिव्या दिल्या त्यांच्या मागे कोण होते, हे त्यांनाच उघड करायला लावणे हाही एक चांगला उपाय आहे. ज्यांनी हे व्हिडिओ केले त्यांचे व्हिडिओ लोकांसमोर येणे अत्यावश्यक आहे.
जीन ग्रेसारखे हे सांस्कृतिक मार्क्सवादी एकाच वेळी अनेकांच्या मनाचा ताबा घेतात. या मुलांना काहीच शिक्षा होणार नाही, हे उघड गुपित आहे. प्रश्न हाच आहे, की त्यांचा वापर करणार्यांनाही भारताचे पंतप्रधान माफ करणार आहेत का? आजवर तरी त्याचे उत्तर ‘हो’ असेच मिळाले आहे...




