रविवार, २१ डिसेंबर, २०२५

आम्हांला काय त्याचे?

दीपेश चंद्र दास नावाचा ३० वर्षांचा माणसाला झुंडीने मारण्यात आले, फरफटत ओढून झाडाला बांधण्यात आले व जाळण्यात आले. असे दर दिवशी बांगलादेशात घडते. मारणारे मुस्लीम असतात व मरणारे हिंदू असतात. मानवाधिकार नसलेले कुत्रे मेले काय व जगले काय? काय फरक पडतो?

रविवार आहे. झाले जेवण? बघितलात टीव्ही, केली चर्चा निवडणुकीवर, बांधलेत अंदाज कोण निवडून येतील याचे? हरकत नाही. आता वामकुक्षी घ्या. स्वस्थ झोपा. एक साधी कुठे तरी दूर घडलेली घटना  सांगायची होती. हळहळही व्यक्त करू नका. काहीच करू नका. कॉंग्रेसचे असाल तर भाजपचे सरकार का जाब विचारत नाही, म्हणून भक्तांची ठासा आणि भाजपचे असाल तर गेल्या सत्तर वर्षांचा हिशेब काढत मुस्लीम लांगुलचालनावर भाष्य करत गुलामांची ठासा. वाटल्यास एआयने केलेले मीम शेअर करा.  पुन्हा झोपी जा. काहीच घडले नाही.

दीपेश चंद्र दास नावाचा ३० वर्षांचा माणसाला झुंडीने मारण्यात आले, फरफटत ओढून झाडाला बांधण्यात आले व जाळण्यात आले. असे दर दिवशी बांगलादेशात घडते. मारणारे मुस्लीम असतात व मरणारे हिंदू असतात. मानवाधिकार नसलेले कुत्रे मेले काय व जगले काय? काय फरक पडतो? 

१९२१साली मोपलात झाले; बाकीच्या देशातले सगळे हिंदू ‘आमच्या इथे नाही घडले?’. तेच १९२४साली कोहाटमध्ये झाले;बाकीच्या देशातले सगळे हिंदू ‘आमच्या इथे नाही घडले?’. १९२५साली कलकत्त्यात घडले; बाकीच्या देशातले सगळे हिंदू ‘आमच्या इथे नाही घडले?’. १९२९साली बॉम्बेमध्ये घडले; बाकीच्या देशातले....(कंटाळा आला कॉपी पेस्टचा). १९४६साली कलकत्ता; बाकीच्या..... १९४६साली नौखालीत(इथे तर कुणालाच ते ‘दंगे’, ’दंगल’ असे शब्दही लावता येणार नाही. कारण गांधी चार महिने तळ ठोकून होते व चार महिने त्यांच्यासमोर केवळ हिंदू कापले गेले.); बाकीच्या..... १९४७साली फाळणी; बाकीच्या...... १९६१साली जबलपूरमध्ये; बाकी.... १९६९साली अहमदाबादमध्ये; बाकी.... १९७०साली जळगावमध्ये; बाकी.... १९८३साली आसाममध्ये; बाकी.... १९८९साली बिहारमध्ये; बाकी...... १९९०साली काश्मीर(हिंदूंना काही पडलेलेच नाही, सर्वोच्च न्यायालयासही काही पडून गेलेले नाही. हिंदू मानवाधिकार असलेला माणूस थोडाच आहे? तो तर सेक्युलर नसलेला कम्युनल आहे); बा...... (इथून आजवर जे लहानसहान घडतेय, ते आणि ‘बा’च्या पुढे ‘की’ व नंतरचे लिहिण्याचाही कंटाळा आलाय.) 

जाऊ द्या हो! काय आणि किती मनावर घ्यायचे? 

आम्ही हिंदूं कुत्र्याच्या मौतीनेच मरण्याच्या लायकीचे आहोत! हे एकदा मान्य केले, की आपल्या घरातल्या कुणाला तरी जमावाने ओढून फरफटत बाहेर नेऊन जाळले, तरी काही वाटणार नाही. चितेच्या लाकडाचा खर्च तरी वाचला, म्हणून समाधान मानू आम्ही हिंदू. नौखालीत मरेपर्यंत बलात्कार केला किंवा १४जणांनी बलात्कार करूनही वाचली म्हणून जिवंत असताना करवतीने तुकडे केले; तर आमच्या कुटुंबातील कुणा स्त्रीचे नाही ना केले, असे म्हणून गप्प बसणारे आम्ही स्वत:च्या कुटुंबातील मुलीच्या बाबतीत असे घडले तर आम्ही हिंदू ‘चला लग्नाचा खर्च वाचला’, यावर समाधान मानू. सेक्युलरिजम जिवंत राहिला पाहिजे यावर गप्पा हाणू, चर्चासत्र करू. 

आम्हांला काय त्याचे? 

मराठी क्वॉरावरील पोस्ट : https://qr.ae/pCU5Ik

1 टिप्पणी: