हिंदूंचा प्रत्येक सण हा त्यांना उपदेश देण्याचा उत्सव झाला आहे. असे का घडते? हे कुणी मुद्दाम करते का? पारतंत्र्यात हे मुद्दाम करण्यात आले. नंतर त्याची इतकी सवय झाली, की हिंदू स्वत:च ते काम करू लागले. हिंदू म्हटले, की त्यांच्या संस्कृतीच्या अभिमानाचे प्रत्येक स्थळ निंदा, गलिच्छ शिव्या हासडण्यासाठीच आहे, हे खुद्द हिंदूंनाच प्रामाणिकपणे वाटते. माणूस मेल्यावर त्याला जाळायचे, पुरायचे असते. संस्कृती, धर्म मेल्यावर त्याचे काय करायचे, हे हिंदूंना माहीत नाही. हिंदूंनी एकही संस्कृती जगभरात संपवली नाही. त्यामुळे, विल्हेवाट कशी लावतात हे त्यांना माहीत नाही.
आमच्या शेजारी एका मुलाला शेंगांची भाजी फार आवडायची. एक दिवस घरी ती भाजी केली नाही, म्हणून तो हॉटेलात जाऊन बटाट्याची भाजी खाऊन आला. वयाने त्याच्याहून मोठा असलेला त्याचाच एक मित्र, जे पानात वाढलेले असे ते विनातक्रार जेवत असे. शेंगांची भाजी आवडणार्या मुलाचा आग्रह तेवढ्यापुरता न राहता प्रत्येक गोष्टीत व्हायचा. आश्चर्य म्हणजे तो पुरवला जायचा. ‘त्याला तेच हवे’ याचे कौतुक व्हायचे. त्याच्या मित्राच्या बाबतीत मात्र, ‘त्याला काहीही चालते’, असे म्हटले जाऊ लागले. नेमके तेच हिंदूंबाबत घडत गेले.
विचारवंत, राजकारणी, तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, राज्यघटना, देश, राज्ये, माध्यमे, जाहिराती सगळे हिंदूंना सुधारण्याच्या मागे लागले. हिंदू किती व कसे मागासलेले होते व आहेत, हेच शिकवले गेले. चांगले, वाईट प्रत्येक समाजात असते, हे ना शिक्षणतज्ज्ञांना कधी पटले, ना भारतीय राज्यघटनेला. फक्त हिंदू संस्थांमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार राज्यघटना सरकारला देते. फक्त ‘हिंदू पर्सनल लॉ’ थेट व स्पष्टपणे ओव्हरराइड करणारे किमान दोन तीन तरी कायदे आहेत. एकही नागरी कायदा - मुलीचे लग्नाचे वय ठरवणाराही - ‘हा कायदा सर्व (त्यात सगळे आले) पर्सनल लॉ ओव्हरराइड करतो’, असे थेट व स्पष्टपणे म्हणत नाही. त्यामुळे, मानसिकताच अशी तयार झाली की जे जे वाईट, त्याज्य, घाणेरडे आहे ते हिंदूंमध्येच आहे.
जाहिरातविश्व तरी त्यापासून दूर कसे राहील? बहुसंख्याकांच्याच सणाला त्यांनाच डोस पाजून त्यांनाच आपले उत्पादन विकण्याची स्पर्धा सुरू झाली. दिवाळीआधी उत्पादनांच्या जाहिरातीत बायका त्यांच्या घरात सुतक असल्यासारखा चेहरा केलेल्या दिसू लागल्या. काकणे, कुंकू, टिळा, दिवा हे सगळे हळूहळू नाहीसे होऊ लागले. त्याऐवजी उपदेशाचे डोस सुरू झाले. आता तर पाळी इथवर आली आहे, की आवाज बंद करून जाहिरात पाहिली तर ती रक्षाबंधनाची आहे, की कंडोमची तेही कळणार नाही. सख्या भावाला रतिसुख देऊन त्याच्याकडून राखी बांधून घेणारी एखादी कंडोमची जाहिरात आली, तरीही अजिबात आश्चर्य वाटणार नाही. उलट, ‘सख्खे नातेही सुखाच्या आड येत नाही’ वगैरे बोधामृतही पाजले जाईल. छातीचा बराचसा भाग उघडा घालून रक्षाबंधन करणारी बहीण जाहिरातीत दिसली. कुठेही निरांजने नाहीत, कुंकू, टिळा नाही, ओवाळणे नाही. दिसते काय? जे भावाने पाहू नये ते! वरून ‘कपड्यावरून संस्कृती ठरत नाही’, ‘तिने कुठले कपडे घालावे, हे तुम्ही कोण ठरवणार?’ वगैरे लगेच सुरू झाले. ‘या रक्षाबंधनाला माझे रक्षण करा: गो लेदर फ्री’ असे लिहिलेले व गायीचे चित्र असलेले होर्डिंग २०२०साली पेटाने देशभर लावले होते. कुठली बहीण गायीच्या चामड्याची राखी बांधते आपल्या भावाला?
हेच मुस्लीम व ख्रिश्चन सणांच्या जाहिरातींबद्दल पाहा; तिथे सणांमागची भूमिका, संस्कृती, पेहराव यांचा आदर लक्षांत घेऊनच जाहिरात केली जाते. बकरी ईदला ‘बकरीचे रक्षण करा’, ‘त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे’ वगैरे बोधामृत पाजले जात नाही. नाताळला व नवीन वर्षाच्या वेळेस वाजणारे फटाके प्रदूषण करत नाहीत, असेच भारतीय न्यायव्यवस्थेसही प्रामाणिकपणे वाटते!
टोकाचे आग्रही असू नये, हे जितके खरे तितकेच आपल्या व्यक्तिमत्त्वावरच घाला घालणेही सहन करू नये हेही खरे आहे. कुराण जाळले तर गळे कापले जातात. त्या भीतीने कुणी ते जाळत नाही. मनुस्मृती दरवर्षी जाळली जाते. कुणाच्याच घरात ती असत नाही, त्यामुळे कुणालाही काहीही फरक पडत नाही. गीता, वेद, उपनिषदे जाळू लागतील तेव्हाही हिंदू गप्पच बसतील. नालंदा जाळलेल्या जागी घेऊन जाणार्या रेल्वेच्या स्थानकास खिलजीचे नाव आहे, तेच व तसेच याबाबतीतही घडेल.
‘हिंदू खतरे मे’ कधीच नव्हता आणि नाहीही. मेलेल्या कोंबड्यास आगीचे भय नसते. संस्कृतीचा जीव जात नाही आणि हिंदू धर्म कधीच मेलाय; फक्त कुजून घाण येईपर्यंत ठेवायचा की त्याआधी जाळायचा, हेच काय ते ठरवायचे बाकी आहे. तेही काम बहुधा जगभर अनेक संस्कृती संपवणारेच करतील. तोवर जीव जात नसलेल्या संस्कृतीच्या अभिमानावर व स्वधर्माच्या प्रेतावर दररोज होणारे बलात्कार निमूटपणे सहन करत वाट पाहणे, एवढेच हिंदूंच्या हाती उरले आहे!

३ टिप्पण्या:
भयाण असले तरी खरे आहे. तुमच्या सर्व लेखांचे पुस्तक काढा. गरज आहे त्याची
परखड लेख.
परंतु असे का होते ? यावर उपाय काय ? हेही सांगा.
टिप्पणी पोस्ट करा